Onion Export: १५ रुपयांचा कांदा परदेशात चक्क १२० रुपयांना!

  111

दलाल मालामाल पण व्यापारी व शेतकऱ्यांचे हाल


अबू धाबी : संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे कांद्याची निर्यात होत असल्याने महाराष्ट्रातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांनी १२ ते १५ रुपये किलोने कांदा विकला असून तोच कांदा यूएईच्या दुकानात निर्यात केल्यानंतर १२० रुपये किलोने विकला जात असल्याचा आरोप केला आहे.


निवडणुकीच्या (Election) काळात कांद्याचे वाढलेले भाव पाहता सरकारने डिसेंबरमध्ये कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. मात्र, काही देशांच्या विशेष मागणीनुसार सरकार काही अटींच्या आधारे कांद्याच्या निर्यातीवर सूट देते. कांद्याच्या निर्यातीवर दीर्घकाळ बंदी असताना, संयुक्त अरब अमिराती सारख्या बाजारपेठेत सरकारने परवानगी दिलेली काही शिपमेंट कवडीमोल भावात विकली गेल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी नाराजीचा सूर मारला आहे. तसेच जागतिक बाजारपेठेत किमती वाढल्या आहेत, त्यामुळे निवडक आयातदार प्रचंड नफा कमावत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार जागतिक स्तरावर कांद्याचे दर प्रति टन ३००-४०० डॉलरच्या दरम्यान आहेत. तर अलिकडच्या काही महिन्यांत, युएई सारख्या प्रमुख बाजारपेठेतील किमती प्रति टन १५०० डॉलरपर्यंत वाढल्या आहेत. भारत, पाकिस्तान आणि इजिप्तने लादलेल्या निर्यात निर्बंधांमुळे किमतीत आणखी भर झाली असून देशात अलीकडील शिपमेंटची किमत प्रति टन ५०० डॉलर ते ५५० डॉलर इतकी असल्याचे निर्यातदारांनी सांगितले.


कांदा निर्यातदारांचे म्हणणे आहे की युएई आयातदारांना अशा शिपमेंट्सद्वारे आधीच ३०० कोटींहून अधिक नफा मिळाला आहे. याचा थेट फायदा यूएईच्या व्यापाऱ्यांना होत आहे. ही निर्यात सहकार मंत्रालयाच्या अंतर्गत सरकारी मालकीची संस्था नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड (NCEL) मार्फत केली जात आहे.

Comments
Add Comment

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे