Sanjay Nirupam : खिचडी घोटाळ्याचा ‘मास्टरमाइंड’ राऊतच!

संजय निरुपमांनी थेट आकडेवारीच सांगितली


मुंबई : मुंबईतील खिचडी घोटाळ्याचा (Khichadi scam) खरा मास्टरमाइंड संजय राऊत (Sanjay Raut) हाच आहे. राऊतांच्या कुटुंबियांकडून एक कोटी रुपयांची दलाली करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी नेते संजय निरूपम (Sanjay Nirupam) यांनी केला आहे. यावेळी निरूपम यांनी घोटाळ्यात राऊतांनी त्यांची पत्नी, भाऊ आणि मुलीच्या नावाने पैसे घेतल्याचाही दावा निरूपम यांनी केला. यावेळी निरूपम यांनी अमोल किर्तीकरांसह ठाकरे गटावर (Thackeray Group) जोरदार हल्लाबोल केला.


मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना निरूपम म्हणाले की, आज ८ एप्रिल असून, उत्तर पश्चिमचे उमेदवार अमोल किर्तीकरांना खिचडी घोटाळ्याच्या चौकशीसाठी ईडीने आज बोलवले आहे. त्यामुळे इंडिया आघाडीने दिलेला ठाकरे गटाचा उमेदवार आणि त्यांचे नेते किती मोठे चोर आहेत हे जनतेला कळले पाहिजे.


संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे सूत्रधार असून, पत्राचाळ घोटाळ्यात त्यांनी पत्नीच्या नावे पैसे घेतल्याचेही निरुपम यांनी यावेळी सांगितले.


संजय राऊत यांची मुलगी निकिता हिच्या खात्यात ३ लाख ५० हजार, ५ लाख, तीन लाख अशी रक्कम जमा झाली. तसेच संदीप राऊत यांच्या खात्यात ५ लाख, १ लाख २५ हजार रुपये जमा झाले. सुजीत पाटकर यांच्या खात्यात १४ लाख, १४ लाख, १० लाख, १ लाख ९० हजार, १ लाख ९० हजार जमा झाल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.


खिचडी घोटाळ्यात ईडीने राऊतांना अटक केली पाहिजे असे म्हणत हा निर्दयी गुन्हा आहे. शिवसेना जी गरजूंना मदत करत होती अशा शिवसेनेचा झेंडा घेऊन फसवणूक करण्याचे काम राऊतांनी केले आहे. महाविकास आघाडीचा उमेदवारही खिचडी चोर असून ज्यांनी त्यांना उमेदवारी दिली तेही चोर आहेत, असे संजय निरुपम यांनी म्हटले आहे. अशा लोकांना पराभूत करा आणि त्यांना घरी बसवा, असे आवाहनही निरूपम यांनी केले आहे.

Comments
Add Comment

Dombilvli: डोंबिवलीत शॉरमावालीच्या स्टॉलवर राज ठाकरेंचा फोटो, अविनाश जाधवांनी दिलेला शब्द पाळला

डोंबिवली: मनसे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनी डोंबिवलीत शॉरमा विकणाऱ्या एकता सावंत या मराठी व्यावसायिका

एका खटक्यात दादर पूर्व रेल्वे स्थानक परिसर साफ

चोरबाजारासह अनधिकृत फेरीवाले आणि गर्दुल्ल्यांवर कारवाई मुंबई :  दादर पूर्व रेल्वे स्थानकासमोरील जागेत मागील

Mumbai Pune Expressway Traffic: तब्बल ३२ तासानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक पूर्ववत

मुंबई: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक तब्बल ३२ तासांनंतर पूर्ववत झाली आहे. मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या

गोरेगाव मुलुंड पश्चिमेतील उड्डाणपूल प्रकल्पाला गती, मुंबई मेट्रो ४च्या खालून जाणार पूल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : तानसा जलवाहिनी ते नाहूर रेल्वे पूल येथपर्यंतचा १.८९ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल

महापालिकेच्या आपला दवाखान्यामध्येही मुख कर्करोगाची तपासणी

गर्भाशय मुख आणि स्तन कर्करोगाचे दवाखान्यांसह प्रसुतीगृहांमध्ये तपासणी शिबीर मुंबई (विशेष प्रतिनिधी)

गोरेगावात लिफ्टमध्ये हायड्रोजन फुग्यांचा स्फोट; तीन जण थोडक्यात बचावले

मुंबई : मुंबईतील गोरेगाव परिसरात हायड्रोजन गॅस भरलेल्या फुग्यांमुळे मोठा धोका निर्माण झाल्याची घटना समोर आली