Sanjay Nirupam : खिचडी घोटाळ्याचा ‘मास्टरमाइंड’ राऊतच!

संजय निरुपमांनी थेट आकडेवारीच सांगितली


मुंबई : मुंबईतील खिचडी घोटाळ्याचा (Khichadi scam) खरा मास्टरमाइंड संजय राऊत (Sanjay Raut) हाच आहे. राऊतांच्या कुटुंबियांकडून एक कोटी रुपयांची दलाली करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी नेते संजय निरूपम (Sanjay Nirupam) यांनी केला आहे. यावेळी निरूपम यांनी घोटाळ्यात राऊतांनी त्यांची पत्नी, भाऊ आणि मुलीच्या नावाने पैसे घेतल्याचाही दावा निरूपम यांनी केला. यावेळी निरूपम यांनी अमोल किर्तीकरांसह ठाकरे गटावर (Thackeray Group) जोरदार हल्लाबोल केला.


मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना निरूपम म्हणाले की, आज ८ एप्रिल असून, उत्तर पश्चिमचे उमेदवार अमोल किर्तीकरांना खिचडी घोटाळ्याच्या चौकशीसाठी ईडीने आज बोलवले आहे. त्यामुळे इंडिया आघाडीने दिलेला ठाकरे गटाचा उमेदवार आणि त्यांचे नेते किती मोठे चोर आहेत हे जनतेला कळले पाहिजे.


संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे सूत्रधार असून, पत्राचाळ घोटाळ्यात त्यांनी पत्नीच्या नावे पैसे घेतल्याचेही निरुपम यांनी यावेळी सांगितले.


संजय राऊत यांची मुलगी निकिता हिच्या खात्यात ३ लाख ५० हजार, ५ लाख, तीन लाख अशी रक्कम जमा झाली. तसेच संदीप राऊत यांच्या खात्यात ५ लाख, १ लाख २५ हजार रुपये जमा झाले. सुजीत पाटकर यांच्या खात्यात १४ लाख, १४ लाख, १० लाख, १ लाख ९० हजार, १ लाख ९० हजार जमा झाल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.


खिचडी घोटाळ्यात ईडीने राऊतांना अटक केली पाहिजे असे म्हणत हा निर्दयी गुन्हा आहे. शिवसेना जी गरजूंना मदत करत होती अशा शिवसेनेचा झेंडा घेऊन फसवणूक करण्याचे काम राऊतांनी केले आहे. महाविकास आघाडीचा उमेदवारही खिचडी चोर असून ज्यांनी त्यांना उमेदवारी दिली तेही चोर आहेत, असे संजय निरुपम यांनी म्हटले आहे. अशा लोकांना पराभूत करा आणि त्यांना घरी बसवा, असे आवाहनही निरूपम यांनी केले आहे.

Comments
Add Comment

'उबाठा' गटाला पुन्हा खिंडार? निम्म्याहून अधिक खासदार शिवसेनेच्या वाटेवर

- कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच 'धमाका' होणार; एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यांनातर घडामोडींना वेग मुंबई :

महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक २०२६ एकमताने मंजूर

मुंबई : राज्यातील पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने

‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा

नक्षलग्रस्त भागात सागवान तस्करांचा धुमाकूळ; वनमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

मुंबई : नक्षलग्रस्त भागातील मौल्यवान सागवान लाकडाची तस्करी करणार्‍या संघटित टोळ्यांना राजकीय पाठबळ मिळत आहे,

मालाडमध्ये प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनात घोटाळा- चौकशी समिती गठीत; अहवाल प्राप्त होईपर्यंत प्रकल्पाला स्थगिती

मुंबई : मालाड पूर्वमधील प्रकल्प बाधितांच्या (पीएपी) पुनर्वसनात घोटाळा झाल्याची बाब बुधवारी विधानसभेत चर्चेला

मुंबईतील जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनात त्रुटी ठेवणार नाही; मंत्री पंकजा मुंडेंनी विधान परिषदेत मांडली ठोस भूमिका

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या केईएम (KEM), नायर आणि कूपर या प्रमुख रुग्णालयांमधील जैववैद्यकीय कचऱ्याची