Surya Grahan 2024: सोमवारी किती वाजता लागणार सूर्यग्रहण, जाणून घ्या भारतात दिसणार का हे ग्रहण

मुंबई: २०२४ या वर्षातील पहिले सूर्यग्रहण सोमवारी ८ एप्रिलच्या रात्री लागणार आहे. सूर्यग्रहण ही खगोलीय घटना आहे. जेव्हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यात चंद्र येतो तेव्हा या घटनेला सूर्यग्रहण म्हणतात. सूर्यग्रहण वैज्ञानिक आणि धार्मिक दोनही कारणांमुळे महत्त्वाची आहे. ८ एप्रिलला लागणाऱ्या सूर्यग्रहणाबाबत मनात अनेक प्रश्न आहेत. जसे हे सूर्यग्रहण कुठे-कुठे दिसणार आहे. किती वाजता हे सूर्यग्रहण लागेल. भारतात याचा सूतक काळ मान्य असणार का?



किती वाजता लागणार सूर्यग्रहण?


भारतीय वेळेनुसार वर्षातील पहिले सूर्यग्रहण ८ एप्रिलला रात्री ९ वाजून १२ मिनिटांपासून ते ९ एप्रिल रात्री २ वाजेपर्यंत असणार आहे. याचा कालावी ५ तास १० मिनिटांचा असेल.



भारतात दिसणार का सूर्यग्रहण?


८ एप्रिलला लागणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. हे सूर्यग्रहण पश्चिम युरोप, पॅसिफिटक, अटलांटिक, मेक्सिको, उत्तर अमेरिका(अलास्का सोडून), कॅनडा, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिकेच्या उत्तर भागांमध्ये, इंग्लंडच्या उत्तर पश्चिम क्षेत्र आणि आयर्लंडमध्ये दिसेल.



भारतात सूतक काळ असणार3का?


साधारणपणे सूर्यग्रहण लागण्याच्या १२ तास आधी सूतक काळ लागू होतो. या कालावधीत कोणतीही शुभ अथवा मंगल कार्ये केली जात नाहीत. दरम्यान, ८ एप्रिलचे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे या दरम्यान सूतककाळही मान्य असणार नाही.

Comments
Add Comment

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा

शरद पवारांसाठी राज्यसभा सोडण्यास उबाठा गटाचा नकार

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी राज्यसभा सोडण्यास उबाठा गटाने नकार दिल्यामुळे महाविकास आघाडीत संघर्ष

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक

एआय तंत्रज्ञानाने रोखणार वाघ-बिबट्यांचे हल्ले; प्रवीण दरेकरांच्या सूचनेवर सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्रप्रकल्पात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) सहाय्याने राबवण्यात आलेला