Surya Grahan 2024: सोमवारी किती वाजता लागणार सूर्यग्रहण, जाणून घ्या भारतात दिसणार का हे ग्रहण

मुंबई: २०२४ या वर्षातील पहिले सूर्यग्रहण सोमवारी ८ एप्रिलच्या रात्री लागणार आहे. सूर्यग्रहण ही खगोलीय घटना आहे. जेव्हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यात चंद्र येतो तेव्हा या घटनेला सूर्यग्रहण म्हणतात. सूर्यग्रहण वैज्ञानिक आणि धार्मिक दोनही कारणांमुळे महत्त्वाची आहे. ८ एप्रिलला लागणाऱ्या सूर्यग्रहणाबाबत मनात अनेक प्रश्न आहेत. जसे हे सूर्यग्रहण कुठे-कुठे दिसणार आहे. किती वाजता हे सूर्यग्रहण लागेल. भारतात याचा सूतक काळ मान्य असणार का?



किती वाजता लागणार सूर्यग्रहण?


भारतीय वेळेनुसार वर्षातील पहिले सूर्यग्रहण ८ एप्रिलला रात्री ९ वाजून १२ मिनिटांपासून ते ९ एप्रिल रात्री २ वाजेपर्यंत असणार आहे. याचा कालावी ५ तास १० मिनिटांचा असेल.



भारतात दिसणार का सूर्यग्रहण?


८ एप्रिलला लागणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. हे सूर्यग्रहण पश्चिम युरोप, पॅसिफिटक, अटलांटिक, मेक्सिको, उत्तर अमेरिका(अलास्का सोडून), कॅनडा, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिकेच्या उत्तर भागांमध्ये, इंग्लंडच्या उत्तर पश्चिम क्षेत्र आणि आयर्लंडमध्ये दिसेल.



भारतात सूतक काळ असणार3का?


साधारणपणे सूर्यग्रहण लागण्याच्या १२ तास आधी सूतक काळ लागू होतो. या कालावधीत कोणतीही शुभ अथवा मंगल कार्ये केली जात नाहीत. दरम्यान, ८ एप्रिलचे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे या दरम्यान सूतककाळही मान्य असणार नाही.

Comments
Add Comment

Bomb Threat : मुंबई प्रेस क्लबला बॉम्बची धमकी; एका ईमेलमुळे खळबळ

- सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर मुंबई : मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला असून मुंबई प्रेस क्लबला (Mumbai Press Club) धमकीचा

मुंबई महापालिकेत विरोधकांची हवा गुल... काय आहे कारण जाणून घ्या

मुंबई: मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आली असली तरी उबाठा आणि काँग्रेसच्या रुपात सक्षम विरोधी पक्ष असतानाही

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली