Surya Grahan 2024: सोमवारी किती वाजता लागणार सूर्यग्रहण, जाणून घ्या भारतात दिसणार का हे ग्रहण

  886

मुंबई: २०२४ या वर्षातील पहिले सूर्यग्रहण सोमवारी ८ एप्रिलच्या रात्री लागणार आहे. सूर्यग्रहण ही खगोलीय घटना आहे. जेव्हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यात चंद्र येतो तेव्हा या घटनेला सूर्यग्रहण म्हणतात. सूर्यग्रहण वैज्ञानिक आणि धार्मिक दोनही कारणांमुळे महत्त्वाची आहे. ८ एप्रिलला लागणाऱ्या सूर्यग्रहणाबाबत मनात अनेक प्रश्न आहेत. जसे हे सूर्यग्रहण कुठे-कुठे दिसणार आहे. किती वाजता हे सूर्यग्रहण लागेल. भारतात याचा सूतक काळ मान्य असणार का?



किती वाजता लागणार सूर्यग्रहण?


भारतीय वेळेनुसार वर्षातील पहिले सूर्यग्रहण ८ एप्रिलला रात्री ९ वाजून १२ मिनिटांपासून ते ९ एप्रिल रात्री २ वाजेपर्यंत असणार आहे. याचा कालावी ५ तास १० मिनिटांचा असेल.



भारतात दिसणार का सूर्यग्रहण?


८ एप्रिलला लागणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. हे सूर्यग्रहण पश्चिम युरोप, पॅसिफिटक, अटलांटिक, मेक्सिको, उत्तर अमेरिका(अलास्का सोडून), कॅनडा, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिकेच्या उत्तर भागांमध्ये, इंग्लंडच्या उत्तर पश्चिम क्षेत्र आणि आयर्लंडमध्ये दिसेल.



भारतात सूतक काळ असणार3का?


साधारणपणे सूर्यग्रहण लागण्याच्या १२ तास आधी सूतक काळ लागू होतो. या कालावधीत कोणतीही शुभ अथवा मंगल कार्ये केली जात नाहीत. दरम्यान, ८ एप्रिलचे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे या दरम्यान सूतककाळही मान्य असणार नाही.

Comments
Add Comment

कपिल शर्माच्या कॅनडा येथील कॅफेवर जोरदार फायरिंग, Video पोस्ट करत गँगस्टरने घेतली जबाबदारी

मुंबई: प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडा येथील सरे शहरातील कॅफेवर पुन्हा एकदा गोळीबार केल्याची घटना समोर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अमेरिकेच्या वाढीव टॅरिफबाबत उच्चस्तरीय बैठक

मुंबई : अमेरिकेने वाढवलेल्या टॅरिफचा महाराष्ट्रावर काय परिणाम होऊ शकतो, याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री

इतिहासाचे विकृतीकरण खपवून घेतले जाणार नाही – आशिष शेलार

‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाचे पुनर्परीक्षण करावे -राज्य शासनाची केंद्र सरकारला विनंती मुंबई : ‘इतिहासाचे

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना ३६८ कोटी ८६ लाख ८५ हजार मदतीच्या निधीस मान्यता

मुंबई : नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्यास राज्य शासन प्राधान्य देत आहे. राज्यात

नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठागौरी विसर्जन दिवशी मुंबईत शासकीय कार्यालयांना सुटी

मुंबई : सन २०२५ या वर्षातील गोपाळकाला (दहीहंडी) व अनंत चतुर्दशी या ऐवजी नारळी पौर्णिमा व ज्येष्ठागौरी विसर्जन

बलात्काराची खोटी तक्रार दाखल करुन १ कोटींची खंडणी वसूल केल्याप्रकरणी माजी बँक कर्मचारी गजाआड!

मुंबई : मुंबईतील चारकोप पोलिसांनी माजी बँक कर्मचारी डॉली कोटकला अटक केली आहे. तिच्यावर आपल्या माजी प्रियकरावर, जो