काव्यरंग

पोस्टमनदादा


पोस्टमनदादा पोस्टमनदादा
रोज रोज वाटता पत्र
खुशालीचा निरोप देत
बनता सर्वांचे मित्र
खाकीचा जाड पोशाख
शोभून दिसतो अंगावर
जाड पिशवी उघडून
पत्र वाटता भराभर
काळजीने बजावता तुम्ही
आपले चोख काम
ऊन असो, पाऊस असो
मुळीच नसतो आराम
सायकलची घंटा वाजवित
येता तुम्ही दारी
मनीऑर्डर दिली की
आम्हा खुशी होते भारी
पोस्टमनदादा पोस्टमनदादा
सांग ना मला खरं
तुम्हाला कसे हो माहीत
प्रत्येकाची घरं?
- रवींद्र व्ही. चालीकवार, महागाव, जि. यवतमाळ.

वरदान


काय गुन्हा माझा
सांग ना रे देवा
मन रोपटे प्रेमाचे
हाच तुझा ठेवा

ह्या आसमंती रे
चंद्र तारके वसती
फक्त या धरती
बीज तुझे रुजती

का ठेवतोस दुरावा
ऊन पाऊस वारा
लिवून सर्व सृष्टी
शृंगाराचा पसारा

देते सर्वस्व दान
हरपून तिचे प्राण
नव्याने जन्म घेते
ठेव जरा जाण.

नाही कुठेच रुजतं
अंकुर हिरवळीचे
अहोभाग्य समज
वरदान धरतीचे.
- सोनाली जगताप

आई


आई गं आई, बरं का गं बाई
माझा तुझा वाढदिवस करशील की नाही?
शोभा-शिला-शुभा, जोशांची विभा
सर्वांच्या आधी येईल आई...
लाल-लाल पाट, चांदीचं ताट,
ताटाच्या भोवती रांगोळीचा थाट...
मुले-मुली येतील, गोल-गोल बसतील
गोड-गोड लाडू मज्जेत खातील
बुंदीचे लाडू जेवायला वाढू,
वाढदिवसाला सेल्फी काढू...

नाव : शौर्या सुमीत कासारे
इयत्ता : पहिली
शाळेचे नाव : सोशल सर्व्हिस लीग मराठी प्रायमरी स्कूल, मुंबई, परेल
Comments
Add Comment

पितृसेवा

महाभारतातील मोतीकण; भालचंद्र ठोंबरे एकदा महर्षी व्यासांना त्यांच्या सर्व शिष्यांनी प्रश्न केला की हे भगवान, या

‘ये जंग क्यों है?’

नॉस्टॅल्जिया; श्रीनिवास बेलसरे ताजमहाल’(१९६३) ही तशी प्रेमकथा, पण साहिर लुधियानवी नावाच्या चिंतनशील कवीने १९६३

मायेचं चैत्रगौर

स्पंदन; अश्विनी शिंदे - भोईर भारतीय माणूस म्हणजे उत्सवप्रिय. सणांमध्ये...उत्सवांमध्ये रमणारा. आज आपल्या सणवार

मनभावन चैत्रगुढी

स्मृतीगंध; लता गुठे मुंबईसारख्या महानगरात सिमेंटच्या जंगलात राहताना कधी ऋतू बदलतो समजतही नाही; परंतु ग्रामीण

भारताची भविष्योन्मुख वाटचाल

विशेष; प्रा. सुखदेव बखळे गेल्या काही दशकांमध्ये देशातील वीजमागणी झपाट्याने वाढत आहे. पण जीवाश्म इंधनांवर

दीर्घकालीन युद्धाची सावली

विश्वभ्रमण; प्रा. जयसिंग यादव इराण-अमेरिकेतील संघर्ष केवळ शस्त्रांचा किंवा सामर्थ्याचा नाही, तर राजकारण,