लोकसभा निवडणुकीसाठी ४४० मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात महिलांसाठी विशेष मतदान केंद्र असणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्याचे आदेश दिले असून राज्यात यावेळी ४४० मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत.

ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण ३६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे असणार आहे. जळगावमध्ये३३, नाशिक आणि रत्नागिरीमध्ये ३०, मुंबई उपनगरमध्ये २६ महिला नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत. तर वाशिम, सिंधुदुर्ग, गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी प्रत्येकी तीन महिला व्यवस्थापित मतदान केंद्र असतील.


या मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वजण महिला असतील. लैंगिक समानता आणि मतदान प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महिलांनी चालविलेले महिला मतदान केंद्र असणार आहेत. सर्व महिला नियंत्रित मतदान केंद्रात कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही तसेच मतदान केंद्रातील कुठल्याही खास राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर टाळण्याचे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.


'महिला नियंत्रित मतदान केंद्र' स्थापन करण्याच्या निर्णयामुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. महिला नियंत्रित मतदान केंद्रावर अधिकारी,कर्मचारी महिला असतील. महिला मतदान केंद्र निवडताना केंद्राची सुरक्षितता लक्षात घेतली जाणार आहे. संवेदनशील केंद्र टाळून तहसील कार्यालय, पोलीस स्टेशननजीकच्या केंद्रांची तसेच ज्या मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांचा कायम संपर्क राहील, अशा केंद्राची या विशेष प्रयोगाकरिता निवड करण्यात येणार आहे.


जिल्हानिहाय महिला नियंत्रित मतदान केंद्र : अहमदनगर १२, अकोला ६, अमरावती ८, औरंगाबाद २०, बीड ६, भंडारा ७, बुलढाणा १४, चंद्रपूर६, धुळे ५, गोदिंया ४, हिंगोली ६, जालना ५, कोल्हापूर १०, लातूर ६, मुंबई शहर १०, नागपूर १२, नांदेड २०, नंदुरबार ४, उस्मानाबाद १६, पालघर ६, परभणी ४, पुणे २१, रायगड ७, सांगली ८, सातारा १६, सोलापूर २२, वर्धा ८ आणि यवतमाळ ७ असे असणार आहेत.

Comments
Add Comment

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट शेतात; दरेगावात स्वतःच्या हाताने लावली ३००० स्ट्रॉबेरी रोपे अन् म्हणाले, 'माझे पाय'...

सातारा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांच्या दोन दिवसांच्या सातारा दौऱ्यादरम्यान राजकीय

‘टेस्ला मोमेंट’ चाकणमध्ये सुरू : मुख्यमंत्री फडणवीस

पुण्यात बॅटरीची अदलाबदल करता येणाऱ्या इलेक्ट्रिक ट्रकचे अनावरण पुणे : बॅटरीची अदलाबदल करता येणाऱ्या

रास्तभाव धान्य दुकानातून धान्य उचला

२० तारखेपर्यंत घेण्याचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आवाहन अलिबाग : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत

जिल्ह्यातील आशा सेविकांचे ४ महिन्यांपासून रखडले मानधन

अलिबाग : शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्याबरोबरच आपत्कालीन परिस्थितीत रात्रीचा दिवस काम

राहुरीचे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव

“कोकण हा शिवसेनेचा श्वास, शिवसेना कोकणी माणसाचा विश्वास” - एकनाथ शिंदे

रत्नागिरी : रत्नागिरीतील शिवसैनिकांचा उत्साह पाहून महायुतीचा भगवा जिल्हा परिषदेवर फडकणारच, ही काळ्या दगडावरची