Mumbai Indians: मुंबईचे सलग पराभव होत असतानाही हार्दिकला सेहवागचा पाठिंबा

मुंबई : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ सध्या केवळ त्यांच्या मैदानातील कामगिरीमुळेच नाही, तर नेतृत्वबदलामुळेही सातत्याने चर्चेत आहे. सध्या चालू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२४ (IPL 2024) स्पर्धेत मुंबईचा संघ हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली खेळत आहे. आयपीएलच्या १७व्या हंगामापूर्वी मुंबईने ५ वेळचा आयपीएल विजेता कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) काढून हार्दिककडे नेतृत्व सोपवण्यात आले. ही गोष्ट अनेक चाहत्यांच्या पसंतीस पडलेली नाही. त्यातच आता मुंबई इंडियन्सला सलग तीन पराभवांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे हार्दिकवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.


राजस्थानविरुद्धचा सामना मुंबईच्या संघाने गमावल्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीने हार्दिक पंड्याची कर्णधारपदावरुन उचलबांगडी केली जाऊ शकते असं मत 'क्रिक बझ'शी बोलताना व्यक्त केलं. मात्र त्याच चर्चेत सहभागी असणाऱ्या विरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) त्यावर दिलेली प्रतिक्रिया सध्या क्रिकेट प्रेमींमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.



यापूर्वीही अनेक संघांचे नेतृत्व बदल झाले


यापूर्वीही २ संघांनी कर्णधार बदलले आहे, पंजाब व चेन्नईने असे केले आहे. चेन्नईने जडेजाला कर्णधारपद दिले होते आणि नंतर धोनीने पुन्हा कर्णधाराची जबाबदारी स्विकारली. पण हे हंगाम चालू असताना घडले होते. मला वाटत नाही की मुंबई इंडियन्स आत्ता कर्णधार बदलण्याचा विचार करत असतील. तुम्ही तीनच सामन्यानंतर कर्णधार बदलू शकत नाही. त्यामुळे संघाला योग्य संदेश जात नाही. मात्र, सात सामन्यांनंतर जेव्हा स्पर्धा अर्ध्यात असेल, तेव्हा ते कामगिरीच्या आधारावर निर्णय घेऊ शकतात, असे सेहवागने म्हटले.



रोहितच्या नेतृत्वात सलग पाच सामन्यांमध्ये पराभव


मुंबईचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली असतानाही सलग पाच सामने पराभूत झाला होता. तेव्हा ५-० अशी परिस्थिती होती. त्यानंतरही त्यांनी पुढच्या टप्प्यात आगेकूच केली होती. त्यामुळे ते हार्दिकबरोबरची सध्याची परिस्थिती संयमाने हाताळतील. मुंबई संघ सध्या ०-३ वर आहे. मात्र यानंतरही हे अंतर वाढत राहिलं तर ती संघ व्यवस्थापनाच्या संयमाची परीक्षा ठरेल," असं सेहवाग म्हणाला.

Comments
Add Comment

Jalna Murder Case : आयुष्याची नवीन सुरुवात करण्यासाठी ठरवलेला दिवसच ठरला अंतिम, पोटच्या मुलानेच केली निघृण हत्या

जालना जिल्ह्यामधील अंबड तालुक्यात एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. पोटच्या मुलानेच आपल्या

Dhurandar 2 : बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई, आता 'या' OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार धुरंधर २

मुंबई : रणवीर सिंहच्या धुरंधर सिनेमानं जगभरात धुमाकूळ घातला असून सिनेमा रिलीज होऊन २१ दिवस उलटले असतानाही

Matka King : दमदार स्टारकास्ट असणाऱ्या नागराज मंजुळेंच्या 'मटका किंग'चा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : मराठी सिनेविश्वात सैराट, फॅन्ड्री, नाळ यांसारख्या सिनेमांमधून मातीतल्या वास्तववादी कथा

Shantecha Karte Chalu Aahe : लक्ष्मीकांत बेर्डेंचं अजरामर विनोदी नाटक, पुन्हा रंगभूमी गाजवण्यासाठी सज्ज

मुंबई : रंगभूमीवर काही नाटकं प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहातात. यांपैकीच'शांतेचं कार्टं चालू आहे' हे एक

Gayatri Datar : लोकप्रिय अभिनेत्रीसोबत घडला 'हा' धक्कादायक प्रकार, पोस्ट शेअर करत दिली माहिती

मुंबई : 'तुला पाहते रे' मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री गायत्री दातार ( Gayatri Datar) सध्या तिच्या वैयक्तिक

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास