Mumbai Indians: मुंबईचे सलग पराभव होत असतानाही हार्दिकला सेहवागचा पाठिंबा

  44

मुंबई : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ सध्या केवळ त्यांच्या मैदानातील कामगिरीमुळेच नाही, तर नेतृत्वबदलामुळेही सातत्याने चर्चेत आहे. सध्या चालू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२४ (IPL 2024) स्पर्धेत मुंबईचा संघ हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली खेळत आहे. आयपीएलच्या १७व्या हंगामापूर्वी मुंबईने ५ वेळचा आयपीएल विजेता कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) काढून हार्दिककडे नेतृत्व सोपवण्यात आले. ही गोष्ट अनेक चाहत्यांच्या पसंतीस पडलेली नाही. त्यातच आता मुंबई इंडियन्सला सलग तीन पराभवांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे हार्दिकवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.


राजस्थानविरुद्धचा सामना मुंबईच्या संघाने गमावल्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीने हार्दिक पंड्याची कर्णधारपदावरुन उचलबांगडी केली जाऊ शकते असं मत 'क्रिक बझ'शी बोलताना व्यक्त केलं. मात्र त्याच चर्चेत सहभागी असणाऱ्या विरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) त्यावर दिलेली प्रतिक्रिया सध्या क्रिकेट प्रेमींमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.



यापूर्वीही अनेक संघांचे नेतृत्व बदल झाले


यापूर्वीही २ संघांनी कर्णधार बदलले आहे, पंजाब व चेन्नईने असे केले आहे. चेन्नईने जडेजाला कर्णधारपद दिले होते आणि नंतर धोनीने पुन्हा कर्णधाराची जबाबदारी स्विकारली. पण हे हंगाम चालू असताना घडले होते. मला वाटत नाही की मुंबई इंडियन्स आत्ता कर्णधार बदलण्याचा विचार करत असतील. तुम्ही तीनच सामन्यानंतर कर्णधार बदलू शकत नाही. त्यामुळे संघाला योग्य संदेश जात नाही. मात्र, सात सामन्यांनंतर जेव्हा स्पर्धा अर्ध्यात असेल, तेव्हा ते कामगिरीच्या आधारावर निर्णय घेऊ शकतात, असे सेहवागने म्हटले.



रोहितच्या नेतृत्वात सलग पाच सामन्यांमध्ये पराभव


मुंबईचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली असतानाही सलग पाच सामने पराभूत झाला होता. तेव्हा ५-० अशी परिस्थिती होती. त्यानंतरही त्यांनी पुढच्या टप्प्यात आगेकूच केली होती. त्यामुळे ते हार्दिकबरोबरची सध्याची परिस्थिती संयमाने हाताळतील. मुंबई संघ सध्या ०-३ वर आहे. मात्र यानंतरही हे अंतर वाढत राहिलं तर ती संघ व्यवस्थापनाच्या संयमाची परीक्षा ठरेल," असं सेहवाग म्हणाला.

Comments
Add Comment

डीनो मोरियाच्या ईडी चौकशीत सुशांत–दिशा हत्या प्रकरणाचे धागेदोरे उलगडणार?

मुंबई : बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया, एकेकाळचा बॉलीवूड अभिनेता आणि आज एक संशयित घोटाळेबाज! मुंबईच्या मीठी नदी

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

Lavani Gaurav Awards 2025: पडद्यामागील कलाकारांचा होणार सन्मान, यंदाचे लावणी कलावंत महासंघाचे पुरस्कार जाहीर

मुंबई: लावणी कलावंत महासंघ, मुंबई यांचा ११ वा वर्धापनदिन आणि पुरस्कार सोहळा २०२५ मंगळवार, दिनांक २४ जून, २०२५ रोजी

"जय जय स्वामी समर्थ" च्या १५०० भागांच्या निमित्ताने, पुण्यातील धनकवडी मठात दीड हजार लाडूंचे वाटप!

अक्षय मुडावदकर आणि नचिकेत बर्वे यांच्या हस्ते स्वामी भक्तांना १५०० बेसन लाडूचे प्रसादरूप वाटप  पुणे: कलर्स

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Marathi Movie: 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' महेश मांजरेकर दिग्दर्शित सिनेमाचं पोस्टर रिलीज

Marathi Movie: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त, महेश मांजरेकर दिग्दर्शित बहुप्रतिक्षित ‘पुन्हा