Kokan Railway: कोकण चाकरमान्यांसाठी खुशखबर! प्रवासाची धावपळ थांबणार

उन्हाळी हंगामात अतिरिक्त ट्रेन धावणार


मुंबई : उन्हाळ्याची सुट्टी पडताच अनेक जण आपल्या गावी किंवा बाहेर फिरायला जातात. लाखो प्रवाशांचा धुमाकुळ तसेच गाड्यांची अतिरिक्त गर्दी पाहून यावेळी कोकण रेल्वेने (Kokan Railway) उन्हाळी हंगामात (Summer season) विविध मार्गांवर विशेष गाड्या (special trains) चालवण्याचा निर्णय घेतला आहे.


एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची रेलचेल दिसून येत आहे. अशातच उन्हाळ्यात चाकरमान्यांची धावपळ होऊ शकते. यामुळे नियोजित मार्गांवर धावणाऱ्या गाड्यांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी होण्याची शक्यता असते. त्यामुळं प्रवाशांची हैराणी थांबवण्यासाठी कोकण रेल्वेकडून ७ एप्रिल ते ६ जून या कालावधीत या विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.


पहिल्या टप्प्यात उधना जंक्शन - मंगळुरु जंक्शन (09057) ही विशेष द्विसाप्ताहिक गाडी चालवली जाणार आहे. उधना जंक्शन - मंगळुरु जंक्शन (09057) ही गाडी ७ एप्रिल ते ५ जून या कालावधीत प्रत्येक बुधवार आणि रविवारी उधना जंक्शन येथून रात्री ८ वाजता सुटणार. तर, दुसऱ्या दिवशी सांयकाळी ७ वाजता मंगळुरू जंक्शनला पोहोचेल. त्याचप्रमाणे मंगळुरू जंक्शन-उधना जंक्शन (09058) ही विशेष द्विसाप्ताहिक गाडी ८ एप्रिल ते ६ जून यादरम्यान प्रत्येक गुरुवारी आणि सोमवारी चालवली जाणार आहे.


उधना जंक्शन-मंगळुरु जंक्शन गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव या स्थानकांवर थांबेल. ही गाडी एकूण २३ डब्यांची असून त्यात तीन वातानुकूलित कोच असणार आहेत, अशी माहिती कोकण रेल्वेने दिली आहे.


Comments
Add Comment

Coronation of Shivaji Maharaj : शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे'

रायगड : दुर्गराज रायगडावर तिथीनुसार २७ जून २०२६ रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला

Mantri Nitesh Rane : कोकणातील तीर्थस्थळे जलमार्गांनी जोडणार!

मंत्री नितेश राणे यांची संकल्पना; आंगणेवाडी, कुणकेश्वर, गणपतीपुळे, पाली बल्लाळेश्वर मंदिराचा समावेश मुंबई :

Narendra Modi : सिंधुदुर्ग आणि नाशिक जागतिक पर्यटन स्थळे म्हणून विकसित करणार!

नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडला रोडमॅप; २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट

Mumbai-Goa Highway Accident : उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर...

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पोलादपूरजवळ झालेल्या या अपघातात दोन

Raigad Crime :मुंबईकर मुलीची माणगावमध्ये निर्घृण हत्या, मृतदेह जंगलात फेकला, परिसरात भीतीचं वातावरण

MANGAON : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून

Konkan Railway Alert : मांडवी, तेजस, मत्स्यगंधासह अनेक गाड्यांच्या वेळेत १५ जूनपासून मोठे बदल...

Mumbai-Goa Trains : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. पावसाळ्याचा विचार