मुंबई शहरातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत – जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांचे निर्देश

Share

मुंबई : “लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ मध्ये लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मुंबई शहरातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. त्यासाठी विविध उपक्रम राबवावेत”, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. संजय यादव यांनी दिले.

भारत निवडणूक आयोग यांच्या सूचनेप्रमाणे जिल्हा स्वीप समिती गठित करण्यात आली आहे. या समितीची बैठक मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी समितीच्या सदस्यांनी सदर निर्देश दिले.

या बैठकीत श्री. यादव म्हणाले की, “सर्व शासकीय विभागांनी एकत्र येऊन निवडणुकीत अधिकाधिक मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रवृत्त करावे, विविध माध्यमांतून मतदान जनजागृतीपर विशेष मोहिम राबवावी. तसेच मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या उद्दिष्ट्यपूर्तीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. लोकसभा निवडणूकीसाठी जास्तीत – जास्त नवमतदार नोंदणी करुन लोकशाहीच्या या सर्वांत मोठ्या उत्सवामध्ये सहभागी करून घ्यावे. नागरिकांना मतदारयादीमध्ये नाव नोंदविण्याची संधी अजूनही आहे, मतदारांनी मतदारयादीत आपले नाव तपासून घ्यावे आणि आपले नाव नसेल तर मतदारनोंदणीसाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळावर किंवा Voter Helpline Mobile App वर तसेच मतदार मदत क्रमांक १९५० यावर संपर्क करावा.

तसेच याबाबत काही अडचणी येत असतील, तर मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे मतदारांसाठी मतदार हेल्पलाइन क्रमांक ०२२-२०८२-२६९३ सुरू करण्यात आला आहे. मतदारांनी या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. संजय यादव केले.

श्री. यादव म्हणाले की, समितीच्या सदस्यांनी स्वतःसह कुटुंबियांनाही मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे. परिसरातील इतर नागरिकांनाही मतदान करण्याचे आवाहन करावे. तसेच मतदानाच्या दिवशी शासनाने दिलेल्या सवलतीचा लाभ घेत मतदारांनी आवर्जून मतदान करावे. यावेळी जिल्हाधिकारी श्री. संजय यादव यांनी स्वीप समितीच्या सदस्यांना मतदानाचा हक्क बजावण्याबाबत शपथ दिली.

या बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा प्रमुख समन्वय अधिकारी (स्वीप) फरोग मुकादम, उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे यांच्यासह समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

या बैठकीला पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई विद्यापीठ, स्वयंसेवी संस्था, नशामुक्ती विभाग, समाजकल्याण व कामगार विभाग, राष्ट्रीय छात्र सेना, नेहरु युवा केंद्र व प्रसारमाध्यम कक्ष अशा विविध शासकीय विभागांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.

Recent Posts

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

10 minutes ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

31 minutes ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

1 hour ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

2 hours ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

2 hours ago

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

3 hours ago