Kedarnath Badrinath temple : शिव आणि विष्णूभक्तांसाठी आनंदाची बातमी! लवकरच उघडणार केदारनाथ-बद्रीनाथचे दरवाजे

  65

केदारनाथ धाम दर्शनाला कसे जायचे?


डेहराडून : भारतात हिंदूंसाठी धार्मिक महत्त्व (Hindu Religion) असलेल्या मंदिरांपैकी केदारनाथ आणि बद्रीनाथ ही महत्त्वाची मंदिरे (Kedarnath Badrinath temple) आहेत. केदारनाथ हे शंकराचे (Lord Shiva) मंदिर तर बद्रीनाथ हे विष्णूचे (Lord Vishnu) मंदिर आहे. उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) असलेली ही दोन्ही मंदिरे हिवाळ्यात ६ महिने बंद असतात. त्यामुळे शिव आणि विष्णूभक्तांना या मंदिराचे दरवाजे पुन्हा उघडण्याची उत्सुकता लागून राहते. याबाबत एक आनंदाची बातमी आहे. या दोन्ही मंदिरांचे दरवाजे पुन्हा उघडण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.


बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीच्या माहितीनुसार, २०२४ मध्ये केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यंदा श्री केदारनाथ धामचे दरवाजे १० मे रोजी सकाळी ७ वाजता उघडतील. तर १२ मे २०२४ रोजी सकाळी ६ वाजता ब्रह्म मुहूर्तावर बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले जातील. हिवाळ्यात मंदिर ६ महिने बंद असते. या महिन्यांत श्री हरी विष्णू विश्रांतीसाठी येथे वास्तव्य करतात असे मानले जाते.


समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार, ६ मे रोजी पंचमुखी डोली श्री केदारनाथ धामसाठी रवाना होणार आहे. यानंतर विविध थांब्यांवरून ती ९ मे रोजी सायंकाळी केदारनाथ धाम येथे पोहोचेल. दर्शनासाठी तुम्ही नोव्हेंबरपर्यंत प्रवासाला जाऊ शकता. कारण यानंतर केदारनाथ धाम ६ महिने बंद आहे. गेल्या वर्षी केदारनाथ धामचे दरवाजे २५ एप्रिल २०२३ रोजी उघडण्यात आले होते आणि ते १५ नोव्हेंबर २०२३ रोजी बंद करण्यात आले होते.



केदारनाथ धाम दर्शनाला कसे जायचे?


रेल्वेने - केदारनाथचे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन ऋषिकेश आहे. केदारनाथपासून ऋषिकेश रेल्वे स्टेशन २१६ किलोमीटर अंतरावर आहे.


रस्त्याने - उत्तराखंडमधील डेहराडून, ऋषिकेश, हरिद्वार, पौरी, टिहरी, उत्तरकाशी, श्रीनगर आणि चमोली या प्रसिद्ध ठिकाणांहून गौरीकुंडला जाण्यासाठी बस आणि टॅक्सी सहज उपलब्ध आहेत.


गौरीकुंड राष्ट्रीय महामार्ग १०९, जो रुद्रप्रयाग ते केदारनाथला जोडतो.


हवाई मार्गे - केदारनाथचे सर्वात जवळचे विमानतळ जॉली ग्रांट आहे जे २३८ किलोमीटर अंतरावर आहे.



Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )