Ghatkopar to Versova Metro : तांत्रिक बिघाडामुळे ऐन उन्हाळ्यात मेट्रोने केले प्रवाशांचे हाल

घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो धावतायत १५ ते २० मिनिटे उशिरा


मुंबई : उन्हाळ्यात अंगाची काहिली होत असताना अनेकजण एसी लोकल किंवा मेट्रोचा पर्याय निवडतात. मात्र, गर्दीच्या वेळी झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ऐन उन्हाळ्यात घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोसेवा काही काळ रखडली होती. आता ही सेवा पूर्ववत झाली असली तरी सर्व मेट्रो १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी झाली आहे.


घाटकोपर-वर्सोवा ट्रेन सेवेमध्ये सकाळी तांत्रिक बिघाड झाला होता. यावेळी काही काळासाठी मेट्रो सेवा पूर्णपणे रखडली होती. त्यामुळे मुंबईकरांचे ऐन गर्दीच्या वेळी हाल झाले. मेट्रो प्रशासनाने तांत्रिक बिघाड झाल्याचं कारण सांगितलं. यानंतर काही वेळाने रखडलेली मेट्रो सेवा पुन्हा सुरु झाली.



काही प्रवासी मेट्रोमध्ये अडकून होते


सकाळी ऑफिस आणि कॉलेज किंवा इतर कामानिमित्त लोकल आणि मेट्रो प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यात अचानक तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो रखडली आणि यामुळे अनेक प्रवाशांची वाताहत झाली. सकाळी मेट्रो काही काळासाठी रखडली होती, त्यामुळे प्रवासी बराच वेळ मेट्रोमध्ये अडकून होते. अनेक प्रवाशांना कार्यालयात पोहोचायला उशिर झाला.

Comments
Add Comment

Marijuana Cultivation : भांडुप जलाशय टेकडीवर गांजाची शेती, भाजप नगरसेविकेने आणली निदर्शनास

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भांडुप जलाशय टेकडी येथील डोंगराळ भागात काही समाजकंटकांनी बेकायदेशीररित्या गांजाची

BMC Staff : महानगरपालिका कर्मचारीच स्व-गणना सदिच्छादूत

मेट्रो, रेल्वे, बस स्थानक, सार्वजनिक ठिकाणी स्व-गणना संदर्भात जनजागृती  मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आतापर्यंत

Water Cut : ग्रॅण्टरोड, गिरगांव भायखळा, महालक्ष्मी,वरळी आदी काही भागांमध्ये शुक्रवारीही पाणीपुरवठा राहणार बंद

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : डॉ. ई. मोझेस मार्गावरील फेमस स्टुडिओसमोर असलेल्या १६५० मिलिमीटर व्यासाच्या मुख्य

BJP : शुक्रवारपासून भाजप नालेसफाईच्या पाहणी मोहिमेवर..

मुंबई अध्यक्ष, पालकमंत्री, नगरसेवक महापालिका अधिकाऱ्यांसमवेत करणार पाहणी मुंंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील

SSC Result : कधी आहे दहावीचा निकाल ? आली मोठी अपडेट

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावीच्या परीक्षेचा निकाल

Mumbai Pydhonie Family News : ना कलिंगड, ना बिर्याणी, उंदिर मारण्याच्या औषधामुळे पायधुनीतील 'त्या' चौघांचा मृत्यू

मुंबई : पायधुनी भागात २६ एप्रिल रोजी एकाच कुटुंबातील चार जणांचा बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यू झाला