Archana Patil : अर्चना पाटील ठरल्या महायुतीच्या धाराशिवमधील उमेदवार

ठाकरे गटाच्या ओमराजे निंबाळकरांना देणार जोरदार टक्कर


मुंबई : महायुतीमध्ये (Mahayuti) धाराशिव (Dharashiv) हा मतदारसंघ अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) सुटला असून या ठिकाणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आणि धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चना पाटील (Archana Patil) यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. अर्चना पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.


महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाचे जे खासदार निवडून येऊ शकतात त्यामध्ये धाराशिवच्या ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांचे नाव घेतले जाते. ठाकरे गटाकडून यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही पुन्हा एकदा ओमराजे निंबाळकर यांच्यावरच विश्वास दाखवला गेला. त्यामुळे आता महायुती त्यांच्याविरोधात कोणता उमेदवार रिंगणात उतरवणार, याची सर्वांना उत्सुकता होती. ही उत्सुकता अखेर संपली असून महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अर्चना पाटील (Archana Patil) यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे.


अर्चना पाटील यांनी निवडणूक लढवण्यासाठी आज सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर सुनील तटकरे यांनी अर्चनाताईंची उमेदवारी जाहीर केली. आतापर्यंत महायुतीमधील तिन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांची घोषणा स्वतंत्र व्यासपीठांवर केली होती. परंतु, अर्चना पाटील यांच्या लोकसभा उमेदवारीची घोषणा हे महायुतीतील तिन्ही पक्षांचे नेते उपस्थित असताना होत आहे, असे सुनील तटकरे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

AI Smart Glasses : एआय स्मार्ट चष्म्यांचा गैरवापर रोखण्यासाठी राज्य सरकार स्थापन करणार तज्ज्ञ समिती

AI Smart Glasses : मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित स्मार्ट चष्मे, स्मार्ट गॉगल्स आणि इतर वेअरेबल (अंगावर परिधान करता

Bishnoi : बिश्नोई टोळीसह भाडोत्री गुंडांचा बंदोबस्त करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; परदेशातील 'व्हीपीएन कॉल्स' आणि 'मास्किंग'चे जाळे उद्ध्वस्त करणार मुंबई : परदेशात

विकास करार रद्द झाल्यास मुद्रांक शुल्क परतावा बंद

महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक विधानसभेत सादर; महसुलाचे नुकसान टाळण्यासह तरतुदींचा गैरवापर

Uday Samant : मुंबईतील अनधिकृत नळजोडण्यांवर ९० दिवसांत होणार मोठी कारवाई

पाणीचोरी रोखण्यासाठी सरकारची विशेष मोहीम - मंत्री सामंत मुंबई : मुंबई शहरातील पाणीटंचाई आणि पाणीचोरीच्या

Labour Minister Adv. Akash Fundkar : माथाडी कामगारांच्या समस्यांवर समन्वयाने तोडगा काढावा

कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचे निर्देश महिंद्रा लॉजिस्टिक्समधील कामगारांच्या मागण्यांबाबत बैठक मुंबई :

Devendra Fadnavis : लवकर पूर्ण होतील अशी जलसंधारणाची कामे प्राधान्याने पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

नादुरुस्त कोल्हापुरी बंधारे दुरुस्तीची मोहीम राबवा मुंबई : विविध हवामान संस्थांनी या वर्षीच्या