Water Break: शाळेत विद्यार्थ्यांना मिळणार ३ 'वॉटर बेल'!

शरीर हायड्रेट राहण्यासाठी विशेष उपक्रम


विशाखापट्टणम : उन्हाचा वाढता कडाका त्यातच विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचं ओझं घेऊन मुलं शाळेत जातात. उन्हात अंगाची लाही करत गरमीमध्ये मुलं शिक्षण घेतात. अशावेळी बहुतांश मुलं तहान लागल्यावरचं पाणी पितात. या सर्व गोष्टींचा विचार करत आंध्र प्रदेशातील (Andhra pradesh) शिक्षण विभागाने शालेय मुलांकरता विशेष उपक्रम राबवला आहे.


विद्यार्थ्यांचे शरीर हायड्रेट रहावे व त्यांच्या आरोग्यालाही फायदा होण्यासाठी हा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमाला 'वॉटर बेल' असे नाव देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना शाळेत ३ 'वॉटर ब्रेक' देण्यात येणार आहेत. आंध्र पदेशातील शालेय विभागाने विद्यार्थ्यांना सकाळी ९:४५, १०:०५ आणि ११:५० यावेळी पाणी पिण्यासाठी ब्रेक दिला जाईल. जेणेकरून मुलांना पाणी पिण्याची आठवण होईल. तसेच राज्यातील सर्व शाळकरी मुलांना पाणी पिण्यासाठी ३ 'वॉटर ब्रेक' घेणे अनिवार्य असणार आहे.



उन्हाळ्यात असे राहिल शरीर हायड्रेट



  • उन्हाळ्यात घामाद्वारे शरीरातले पाणी अधिक प्रमाणात बाहेर पडले जाते. त्यामुळे शरीराची पाण्याची पातळी राखण्यासाठी दररोज निदान ८ ग्लास पाणी प्यायला हवे.

  • कलिंगड, संत्री, स्ट्रॉबेरी, अननस, मनुका, पीच असे हंगामी फळांचे सेवन केल्याने शरीरातील पाण्याची पातळी राखण्यास मदत होते.

  • तसेच भाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पोषक घटकही मिळतात. त्यामुळे काकडी, पालक, दुधी भोपळा, वांगी, ब्रोकोली, कोबी, टोमॅटो, फ्लॉवर अशा भाज्यांचे सेवन करण्याचा तज्ज्ञ सल्ला देतात.

Comments
Add Comment

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उत्तराखंडात बर्फवृष्टी, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

दार्जिलिंग (वृत्तसंस्था): ऑक्टोबरच्या उत्तराखंडात सुरुवातीलाच मोठ्या बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. चाळीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी

भारतीय वायु दलाचा ९३वा वर्धापन दिन! हवाई दलाच्या शौर्याचे प्रदर्शन करणारे 'हे' चित्रपट पाहाच

वायु मार्गाद्वारे देशाचे रक्षण करणाऱ्या हवाईदलाचा आज ९३ वा वर्धापन दिन आहे. स्वातंत्र्यापूर्व काळात

मोदी सरकारची रेल्वेच्या २४ हजार ६३४ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी, महाराष्ट्राच्या वर्धा - भुसावळ तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय समितीने रेल्वे

बिलासपूरमध्ये भूस्खलनाचा भीषण अपघात; बसवर दरड कोसळल्याने १५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, बचाव कार्य सुरू

बिलासपूर: हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर

दिवाळी-छटसाठी देशभरात धावणार १२ हजार विशेष गाड्या

नवी दिल्ली  : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार यंदा दिवाळी आणि छट यांसारख्या सणांच्या