Mobile Phone: मोबाईल उशीच्या खाली ठेवून झोपता का? तर हे जरूर वाचा

  73

मुंबई: संशोधनातून समोर आले आहे की दिवसांतून दोन ते तीन तास फोन वापरल्यास कोणतीही समस्या होणार नाही. मात्र त्यापेक्षा अधिक स्क्रीन टाईम वापरल्यास गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. रात्री झोपण्याच्या वेळेस मोबाईल फोन दूर ठेवला पाहिजे.

आजकाल प्रत्येक वेळेस मोबाईल आपल्यासोबत असतो. मोठ्यांपासून ते लहानांपर्यंत दिवसभर ते डोळे फोनमध्येच व्यस्त असतात. मात्र याचा आरोग्यावर खराब परिणाम होत आहे. मोबाईलचे रेडिएशन आपल्या मेंदूवर परिणाम करतात. यामुळे अनेक आजारांचा धोकाही वाढतो. इतकंच की ब्रेन कॅन्सरही होऊ शकतो.

आरोग्य तज्ञांच्या मते यापासून बचावासाठी स्मार्टफोनचा वापर कमी करावा लागेल. तर रात्री झोपताना डोक्याच्या जवळ अथवा उशीच्या खाली मोबाईल ठेवून झोपू नये.

WHOनुसार स्मार्टफोनमधून निघणारे आरएफ रेडिएशन ब्रेन कॅन्सर म्हणजेच ग्लिओमाचा धोका वाढवत आहेत. मोबाईल फोनमधून निघणारे आरएफ रेडिएशन मेंदूचा रिअॅक्शन टाईम, स्लीप पॅटर्न आणि मेंदूच्या कार्यक्षमतेवर चुकीचा परिणाम करतात.

तसेच मोबाईल फोन सातत्याने पँटच्या खिशात ठेवल्याने इन्फर्टिलिटी म्हणजेच प्रजनन क्षमतेलाही नुकसान होते. जर दिवसातून दोन ते तीन तास फोन वापरला तर अनेक समस्यांपासून वाचता येते. अधिकचा स्क्रीन टाईम गंभीर आजार निर्माण करू शकतात.

झोपताना फोन दूर ठेवला पाहिजे. तसेच झोपण्याच्या कमीत कमी एक तास आधी फोनचा वापर केला नाही पाहिजे.
Comments
Add Comment

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न

Face Mask : चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील एक फळभाजी!

मुंबई : आपल्या सर्वांनाच आपली त्वचा चमकदार हवी असते. यासाठी आपण बाजारात असलेल्या महागड्या उत्पादनांचाही वापर