Manmohan Singh: राज्यसभेत दिसणार नाहीत मनमोहन सिंग, ३३ वर्षानंतर होणार रिटायर

नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेस खासदार डॉ. मनमोहन सिंह(manmohan singh) आता संसदेचे उच्च सदन राज्यसभेत दिसणार नाहीत. असे यासाठी कारण ते ३३ वर्षांनी रिटायर होत आहेत. बुधवारी ३ एप्रिलला त्यांच्या दीर्घ आणि शानदार संसदीय खेळीची सांगता होईल. आर्थिक सुधारणांचे सूत्रधार मानले जाणारे ९१ वर्षीय मनमोहन सिंह ऑक्टोबर १९९१मध्ये पहिल्यांदा राज्यसभेचे सदस्य बनले होते. ते १९९१ ते १९९६ दरम्यान नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये अर्थ मंत्री आणि २००४ ते २०१४ या कालावधीत देशाचे पंतप्रधान होते.


खास बाब म्हणजे एकीकडे त्यांची ही खेळी संपत असताना काँग्रेसच्या सोनिया गांधी पहिल्यांदा राज्यसभेत पोहोचत आहेत. सोनिया गांधी पहिल्यांदा राजस्थानातून राज्यसभेत प्रवेश करतील. तर मनमोहन सिंह यांच्यासह राज्यसभेतून कमीत कमी ५४ सदस्यांचा कार्यकाळ मंगळवारी आणि बुधवारी समाप्त होईल. यातील काही राज्यसभेत परतणार नाहीत.



काँग्रेस प्रमुख मल्लिकार्जुन खरगेने माजी पंतप्रधानांना लिहिले पत्र




मनमोहन सिंह यांच्यासोबत कोण होत आहे रिटायर?


केंद्री शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, पशुपालन आणि मस्यपालन मंत्री परषोत्तम रूपाला, सूचना प्रोद्योगिक राज्य मंत्री राजीव चंद्रशेखर, परराष्ट्र राज्य मंत्री व्ही मुरलीधरन, सूक्ष्म-लघु आणि मध्य उद्योग मंत्री नारायण राणे, सूचना आणि प्रसारण राज्य मंत्री एल मुरुगन यांचा राज्यसभेचा कार्यकाल मंगळवारी पूर्ण झाला.


पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा कार्यकाल बुधवारी समाप्त होईल. अश्विनी वैष्णव सोडून हे सर्व केंद्रीय मंत्री लोकसभा निवडणूक लढवत आहे ज्यांना राज्यसभेत आणखी एक कार्यकाल देण्यात आलेला नाही.

Comments
Add Comment

Income Tax Return भरणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी...

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आयकर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत