World Cup 2011: टीम इंडियाने आजच्याच दिवशी जिंकला होता वनडे वर्ल्डकपचा दुसरा खिताब

  81

मुंबई: टीम इंडिया(team india)ने आजच्याच दिवशी म्हणजेच २ एप्रिल २०११ रोजी फायनलमध्ये श्रीलंकेला हरवत वनडे वर्ल्डकपचा(oneday world cup) दुसरा खिताब जिंकला होता. एमएस धोनीच्या नेतृत्वात भारताने वनडे वर्ल्डकप २०११(ODI World Cup 2011) चा खिताब आपल्या नावे केला होता. गौतम गंभीरच्या ९७ धावा आणि कर्णधार धोनीची नाबाद ९१ धावांच्या खेळीमुळे भारताला हा विजय साकारता आला होता.


मुंबईच्या वानखेडे मैदानावरील धोनीचा तो विजयी षटकार आजही क्रिकेट चाहत्यांच्या ठणठणीत लक्षात आहे. या विजयासोबतच तब्बल २८ वर्षांनी भारताने पुन्हा एकदा वनडे वर्ल्डकप हातात घेतला होता. याआधी १९८३मध्ये कपिल देवच्या नेतृत्वात भारतीय संघाने पहिल्यांदा वनडे वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर २०११मध्ये धोनीच्या धुरंधरांनी २८ वर्षांनी या खिताबावर आपले नाव कोरले होते.


 


या सामन्यात कर्णधार धोनीला प्लेयर ऑफ दी मॅचने सन्मानित करण्यात आले होते. तर युवराज सिंह प्लेयर ऑफ दी सीरिज ठरला होता. हा वर्ल्डकप अविस्मरणीय असाच आहे. यानंतर आतापर्यंत टीम इंडियाला कोणताही वर्ल्डकप जिंकता आलेला नाही.



असा रंगला होता फायनलचा सामना


वानखेडे मैदानावर फायनल सामन्यात श्रीलंका पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरली होती. त्यांनी ५० षटकांत ६ विकेट गमावत २७४ धावा केल्या होत्या. संघासाठी महेला जयवर्धनेने ८८ चेंडूत १३ चौकारांच्या मदतीने नाबाद १०३ धावांची खेळी साकारली होती. याशिवाय कुमार संगकाराने ६७ बॉलमध्ये ५ चौकारांच्या मदतीने ४८ धावा केल्या होत्या. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने ४८.२ षटकांत विजय आपल्या नावे केला होता. संघासाठी गौतम गंभीरने १२२ बॉलमध्ये ९ चौकारांच्या मदतीने ९७ धावांची मोठी खेळी केली होती. याशिवाय धोनीने ७९ बॉलमध्ये ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ९१ धावा केल्या होत्या. धोनीसोबत युवराज सिंहने २४ बॉलमध्ये २ चौकारांच्या मदतीने नाबाद २१ धावा केल्या होत्या.

Comments
Add Comment

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता

दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजची पहिल्या स्थानी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने पुन्हा एकदा क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात एकही कसोटी सामना झाला नाही, त्यामुळे