World Cup 2011: टीम इंडियाने आजच्याच दिवशी जिंकला होता वनडे वर्ल्डकपचा दुसरा खिताब

मुंबई: टीम इंडिया(team india)ने आजच्याच दिवशी म्हणजेच २ एप्रिल २०११ रोजी फायनलमध्ये श्रीलंकेला हरवत वनडे वर्ल्डकपचा(oneday world cup) दुसरा खिताब जिंकला होता. एमएस धोनीच्या नेतृत्वात भारताने वनडे वर्ल्डकप २०११(ODI World Cup 2011) चा खिताब आपल्या नावे केला होता. गौतम गंभीरच्या ९७ धावा आणि कर्णधार धोनीची नाबाद ९१ धावांच्या खेळीमुळे भारताला हा विजय साकारता आला होता.


मुंबईच्या वानखेडे मैदानावरील धोनीचा तो विजयी षटकार आजही क्रिकेट चाहत्यांच्या ठणठणीत लक्षात आहे. या विजयासोबतच तब्बल २८ वर्षांनी भारताने पुन्हा एकदा वनडे वर्ल्डकप हातात घेतला होता. याआधी १९८३मध्ये कपिल देवच्या नेतृत्वात भारतीय संघाने पहिल्यांदा वनडे वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर २०११मध्ये धोनीच्या धुरंधरांनी २८ वर्षांनी या खिताबावर आपले नाव कोरले होते.


 


या सामन्यात कर्णधार धोनीला प्लेयर ऑफ दी मॅचने सन्मानित करण्यात आले होते. तर युवराज सिंह प्लेयर ऑफ दी सीरिज ठरला होता. हा वर्ल्डकप अविस्मरणीय असाच आहे. यानंतर आतापर्यंत टीम इंडियाला कोणताही वर्ल्डकप जिंकता आलेला नाही.



असा रंगला होता फायनलचा सामना


वानखेडे मैदानावर फायनल सामन्यात श्रीलंका पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरली होती. त्यांनी ५० षटकांत ६ विकेट गमावत २७४ धावा केल्या होत्या. संघासाठी महेला जयवर्धनेने ८८ चेंडूत १३ चौकारांच्या मदतीने नाबाद १०३ धावांची खेळी साकारली होती. याशिवाय कुमार संगकाराने ६७ बॉलमध्ये ५ चौकारांच्या मदतीने ४८ धावा केल्या होत्या. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने ४८.२ षटकांत विजय आपल्या नावे केला होता. संघासाठी गौतम गंभीरने १२२ बॉलमध्ये ९ चौकारांच्या मदतीने ९७ धावांची मोठी खेळी केली होती. याशिवाय धोनीने ७९ बॉलमध्ये ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ९१ धावा केल्या होत्या. धोनीसोबत युवराज सिंहने २४ बॉलमध्ये २ चौकारांच्या मदतीने नाबाद २१ धावा केल्या होत्या.

Comments
Add Comment

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए

राष्ट्रीय खोखोपटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती

मुंबई : राष्ट्रीय खोखोपटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना

WPL 2026 Final: बंगळूरची विजयी घोडदौड दिल्ली थांबवू शकणार का?

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. रॉयल चॅलेंजर्स

IND vs PAK : "आयसीसीचे मुख्यालय भारतात असते तर बॉम्बने उडवले असते..."; पाकिस्तानी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात उतरेल,

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीची स्थगिती कायम, रोहित पवारांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली  : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार

IND vs PAK : पाकिस्तान नेहमीप्रमाणे "यू-टर्न" घेईल; सुनील गावस्कर यांची पाकिस्तानवर टीका

मुंबई: टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान सरकारने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.