water shortage: पालघर जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट

पालघर : यंदा कमी पाऊस झाल्याने धरणात पाणी साठले नाही. अगोदरच कमी पाणी असल्याने जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट होते. पालघर जिल्ह्यात असलेल्या धरणांमध्ये चाळीस टक्केच पाणीसाठा असल्याने काही दिवसांत जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट येणार आहे.


पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाच्या धामणी, कवडास, ढेकाळे, कुरंझे, अस्वाली या धरणांमधील पाणीसाठ्यात घट झाली आहे. अजूनही पावसाला अडीच ते तीन महिने असल्याने पालघरसह वसई-विरार महापालिका व मीरा- भाईंदर महापालिकेला येत्या काही दिवसांत पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. आगामी दोन-अडीच महिन्यांत दोन्ही महापालिकेतील पाणीपुरवठ्यात कपात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


जिल्ह्यातील सर्वात मोठे असलेल्या सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणात सध्या ४० टक्के पाणीसाठा असून या धरणामधून जिल्ह्यातील शेतीसाठी पाणी सोडले जाते. त्यामुळे अजूनही काही दिवस कालव्यामार्फत शेतीसाठी पाणी सोडले जाणार असल्याने मेपर्यंत जिल्ह्यासह वसईवर आणि मीरा-भाईंदर महापालिकेला पाणीटंचाई भासणार असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.


Comments
Add Comment

Marathi :मराठीचे धिंडवडे काढणारा 'तो' फलक अखेर हटवला

 'प्रहार'च्या वृत्तानंतर प्रशासनाला जाग मुंबई : मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर मराठी भाषेची आणि व्याकरणाची

Minister Nitesh Rane : मत्स्यव्यवसाय विभागाने आर्थिक काटकसर करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : मत्स्यव्यवसाय विभागाच्या कामकाजात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि आर्थिक शिस्त यांना सर्वोच्च प्राधान्य

Police misguidance : दारूचा नाद लई बेक्कार ! थेट पोलिसांना कॉल केला अन...

अकोला : दारूच्या नशेत वाघापूर येथील एका तरुणाने चक्क पोलिसांना फोन केला आणि खोटी माहिती दिल्याचा प्रकार समोर आला

Nitesh Rane : ऐतिहासिक महत्त्व अबाधित ठेवून मोती तलावाचे पुनरुज्जीवन करणार - पालकमंत्री नितेश राणे

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीचे वैभव असलेल्या प्रसिद्ध मोती तलावाचे मूळ ऐतिहासिक महत्त्व आणि वारसा

Mahayuti : विधान परिषदेच्या पुण्याच्या जागेसाठी महायुतीतच चुरस

जिल्ह्यात महायुतीचे ७३४ सदस्य आहेत. मात्र, आपल्या या पारंपरिक हक्काच्या जागेवर दावा सांगणारा अजित पवार गट आणि

Pune Porsche Car Accident Case : पुणे पोर्शे अपघात प्रकरणात नवा वाद! जामिनावर सुटल्यानंतर अग्रवाल कुटुंबाची जंगी पार्टी, VIDEO व्हायरल

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडलेल्या बहुचर्चित पोर्शे कार अपघात प्रकरणाने देशभरात खळबळ उडवून दिली होती.