water shortage: पालघर जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट

पालघर : यंदा कमी पाऊस झाल्याने धरणात पाणी साठले नाही. अगोदरच कमी पाणी असल्याने जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट होते. पालघर जिल्ह्यात असलेल्या धरणांमध्ये चाळीस टक्केच पाणीसाठा असल्याने काही दिवसांत जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट येणार आहे.


पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाच्या धामणी, कवडास, ढेकाळे, कुरंझे, अस्वाली या धरणांमधील पाणीसाठ्यात घट झाली आहे. अजूनही पावसाला अडीच ते तीन महिने असल्याने पालघरसह वसई-विरार महापालिका व मीरा- भाईंदर महापालिकेला येत्या काही दिवसांत पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. आगामी दोन-अडीच महिन्यांत दोन्ही महापालिकेतील पाणीपुरवठ्यात कपात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


जिल्ह्यातील सर्वात मोठे असलेल्या सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणात सध्या ४० टक्के पाणीसाठा असून या धरणामधून जिल्ह्यातील शेतीसाठी पाणी सोडले जाते. त्यामुळे अजूनही काही दिवस कालव्यामार्फत शेतीसाठी पाणी सोडले जाणार असल्याने मेपर्यंत जिल्ह्यासह वसईवर आणि मीरा-भाईंदर महापालिकेला पाणीटंचाई भासणार असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.


Comments
Add Comment

Devendra Fadnavis : पाऊस २३ जूननंतरच, पाणी जपून वापरा!

सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना; मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा मुंबई : राज्यात मान्सूनचे आगमन

Gadchiroli to Australia : लॉयड्स मेटल्सची चौथी 'ग्लोबल एज्युकेशन' बॅच; गुणवंत विद्यार्थ्यांसाठी संधी

गडचिरोली: गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि नक्षलवादग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आता जागतिक पंख

Nitesh Rane : मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाच्या विकासकामांना वेग देण्यावर भर

मुंबई, : राज्यातील मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाशी संबंधित विविध प्रकल्प, धोरणे आणि पायाभूत सुविधांच्या कामांचा

Jalna School : विद्यार्थ्यांच्या नृत्यात दहशतवाद्याचा फोटो; 'किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूल' वादाच्या भोवऱ्यात

परतूर (जालना): जालना जिल्ह्यातील परतूर येथील एका नामांकित शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनादरम्यान आयोजित नृत्याच्या

Chandrashekhar Bawankule : राज्यातील नद्या आणि नाल्यांच्या खोलीकरणासाठी नवीन योजना आणणार

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्याबाबत निर्णय मुंबई : राज्यातील नद्या व

Chandrashekhar Bawankule : कौटुंबिक वाटणीची मोजणी आता अवघ्या २०० रुपयांत

 महसूल मंत्री बावनकुळे यांचा निर्णय; मोजणीसाठी ९० आणि ३० दिवसांचा नवा 'डेडलाईन' फॉर्म्युला मुंबई : राज्य शासनाने