‘ज्ञानवापी’च्या तळघरात पूजा सुरूच राहणार

Share

वाराणसी न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यास ‘सर्वोच्च’ नकार

नवी दिल्ली : ज्ञानवापी मशिदीच्या ‘व्यास तहखाना’ या तळघरात हिंदू पक्षाला पूजेला परवानगी देण्याच्या वाराणसी न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यास सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने दोन्ही समुदायांना धार्मिक प्रार्थना करता याव्यात यासाठी पक्षकारांना ज्ञानवापी परिसरात यथास्थिती राखण्याचे आदेश दिले आहेत.

वाराणसी जिल्हा न्यायालयाने ३१ जानेवारी रोजी हिंदूंना ज्ञानवापी मशिदीच्या दक्षिणेकडील ‘व्यास तहखाना’मध्ये पूजेची परवानगी दिली होती. या आदेशाला आव्हान देणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली होती. उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले होते की, १५५१ पासून या ठिकाणी हिंदू प्रार्थना केल्या जात असल्याचे दर्शविणारा भक्कम पुरावा आहे. १९९३ मध्ये तोंडी आदेशाद्वारे हिंदू प्रार्थना थांबवणे उत्तर प्रदेश सरकारकडून बेकायदेशीर आहे, अशी टिप्पणीही उच्च न्यायालयाने केली होती. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

आज सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, ‘व्यास तहखाना’बाबत दिलेला आदेश यथास्थिती राखणे योग्य आहे. जेथे पूजा केली जाते त्या तळघरात प्रवेश करणे आणि मुस्लीम प्रार्थना करणारे क्षेत्र वेगळे आहे. जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुस्लीम समुदायांकडून नमाज अदा केली जात आहे. तेहखान्यातील पूजा केवळ हिंदू धर्मगुरूंपुरतेच मर्यादित आहे, हे लक्षात घेऊन यथास्थिती राखणे महत्त्वाचे आहे. दोन्ही समुदाय वरील अटींमध्ये धार्मिक पूजा करू शकतात. या प्रकरणी मुस्लीम पक्षांनी दाखल केलेल्या अपिलावर न्यायालयाने हिंदू पक्षांनाही नोटीस बजावली आहे. जुलैमध्ये हे प्रकरण विचारासाठी सूचिबद्ध केले आहे.

जिल्हा न्यायालयाने दिली होती पूजेला परवानगी

वाराणसी जिल्हा न्यायालयाने ३१ जानेवारी २०२४ रोजी ज्ञानवापी मशिदीच्या दक्षिणेकडील तळघरात पुजाऱ्यांना पूजेला परवानगी दिली होती. १ फेब्रुवारीच्या मध्यरात्री मशिदीच्या आवारात धार्मिक विधी पार पडले.नंतर दक्षिणेकडील तळ भक्तांसाठी खुले करण्यात आले होते. वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयाने याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळत उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी, असे स्पष्ट केले होते. अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीच्या वतीने अलाहाबाद उच्च न्यायालयाने याचिका दाखल केली होती. ती न्यायालयाने फेटाळल्यानंतर या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

Recent Posts

टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत काही चाहते आजारी तर काही झाले जखमी

मुंबई: वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष काही क्रिकेट चाहत्यांसाठी मात्र भारी ठरला. खरंतर, भारतीय…

20 mins ago

Team india: बीसीसीआयकडून टीम इंडियाला १२५ कोटींचे बक्षीस

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…

8 hours ago

Indian player: विश्वविजेत्या संघातील मुंबईकर खेळाडूंसाठी शिंदे सरकारकडून बक्षीस जाहीर

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…

9 hours ago

Shubh: शुभ काम करण्याआधी का खातात दही-साखर, हे खरंच शुभ असतं का?

मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…

10 hours ago

नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अखेर १२ वर्षानंतर कार्यान्वीत

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…

10 hours ago

Video: मरीन ड्राईव्हवर गर्दीत अडकली अ‍ॅम्ब्युलन्स, चाहत्यांनी असा दिला रस्ता

मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…

11 hours ago