Balbharti: वह्यांच्या कोऱ्या पानांवर बालभारतीचा तब्बल 'इतक्या' कोटींचा खर्च!

या निर्णयाचा फायदा किती?


पुणे : यंदाच्या वर्षी राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं वाढणार ओझं कमी करण्यासाठी पाठ्यपुस्तकांमध्येच कोरी पाने जोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे सुरुवातीला स्वागत करण्यात आले. मात्र तरीही विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयासाठी स्वखर्चाच्या विविध वह्या बनवायला सांगितले गेल्यामुळे या निर्णयाचा खरंच फायदा होतं आहे की त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं आणखी वाढलं आहे, असा प्रश्न उद्भवत आहे. शिवाय त्यासाठी तब्बल कोटींच्या घरात खर्च झाल्याचं समोर आले आहे.


यंदाच्या शैक्षणिक वर्षात वह्यांची कोरी पाने जोडलेली एकात्मिक पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीसाठी राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने (बालभारती) ७१ कोटी ४० लाख २६ हजार रुपये खर्च केले आहेत. राज्यातील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वह्यांची पाने जोडलेली चार भागांतील एकात्मिक पाठ्यपुस्तके शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून पथदर्शी स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली. यासाठी बालभारतीने तब्बल ७१ कोटी ४० लाख २६ हजार रुपयांचा खर्च केला.


खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडील अखर्चित १५ कोटी ४५ लाख सात हजार २३० रुपयांचा निधी वापरण्यास मंजुरी दिली आहे. याशिवाय शिक्षण विभागाकडील निधी बालभारतीला खर्चाची प्रतिपूर्ती म्हणून देण्यास सरकारने मान्यता दिली.

Comments
Add Comment

World's Most Expensive Mango : जळगावातील सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याने पिकवला जगातील महागडा आंबा

जळगाव : जळगाव जिल्ह्यात अनेक वर्षे पोलीस सेवेत कार्यरत राहून स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून

Monsoon 2026 : अखेर तारीख ठरली! 'या' तारखेपासून महाराष्ट्रात दाखल होणार मान्सून

मुंबई : राज्यासह संपूर्ण देशात सध्या प्रचंड उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. मे महिन्याच्या अखेरीस तापमानाचा पारा

Jalgaon : जळगाव जिल्ह्यात २ पोलीस अधिकारी तर १ कर्मचारी तडकाफडकी निलंबित

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील बोदवड पोलीस ठाण्याचे (Bodwad Police Station) दोन अधिकारी व एका पोलीस कर्मचाऱ्यावर तडकाफडकी निलंबनाची

Pune Metro News : पुणेकरांनो लक्ष द्या! मेट्रो कामामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल; कात्रजमधील पीएमपी बसथांबा हलवला

पुणे : पुणे शहरात मेट्रो प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून भविष्यातील वाहतूक व्यवस्था अधिक जलद, सुरक्षित

CM Devendra Fadnavis : कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर; 'मुंबई टेक वीक'ची देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घोषणा

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे भविष्यातील परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. जीवनाच्या प्रत्येक

Accident News: कपडे खरेदीसाठी निघाले अन् वाटेतच घात झाला ! पती, पत्नीसह चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

वर्धा : नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील (Nagpur-Hyderabad National Highway) हिंगणघाट नजीक आज  भीषण अपघात घडला आहे.