रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या मालमत्ता कर वसुली पथकाने थकीत १२२ इमले आणि सदनिका सील केल्या. त्याचबरोबर १०८ नळ जोडण्या तोडल्या. चालू आणि थकीत घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी रत्नागिरी नगर परिषदेच्या ८ वसुली पथकांनी करवसुलीसाठी जोरदार मोहीम राबवली. एकूण १४ कोटी रुपये मागणीपैकी तब्बल ८ कोटी २५ लाख रुपयांची करवसुली झाली असल्याचे वसुली विभागाचे प्रमुख नरेश आखाडे यांनी सांगितले.
शहरामध्ये सुमारे २९ हजार मालमत्ता आहेत. थकीत मालमत्तांची करवसुली करण्यासाठी रनपने घरोघरी किंवा मालमत्ताधारकांकडे जाण्यास सुरुवात केली. लोकसभा निवडणुकीच्या कामाची जबाबदारी पडणार असल्याने यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासून करवसुलीला प्राधान्य देण्यात आले.
मुख्याधिकारी तुषार बाबर यांनीही वसुली पथकासोबत जाऊन थकीत मालमत्ता कर भरण्याची विनंती केली. शहरातील २९ हजार मालमत्ताधारकांपैकी ज्यांचे कर ५ हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचे होते त्यांच्याकडे वसुलीसाठी पथके जात होती. ८ कोटी २५ लाख रुपयांची करवसुली झाली असून, अनेकांनी धनादेश दिले आहेत, ते बँकेत टाकून वटल्यानंतर ही करवसुली रक्कम वाढणार आहे.
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईत महिलेसोबत नेमकं काय घडले? मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, बलात्कार, आत्महत्या, मर्डर अशा अनेक…
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…