MI vs RR: मुंबईच्या सलग तिसऱ्या पराभवासाठी कर्णधार पांड्याने कोणाला ठरवले जबाबदार

  84

मुंबई: मुंबई इंडियन्सला(mumbai indians) हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात आयपीएल २०२४मध्ये(ipl 2024) सलग तिसऱ्या पराभवास सामोरे जावे लागले. मुंबईने तिसरा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध आपल्या घरच्या मैदानावर वानखेडेवर ६ विकेटनी गमावला. आतापर्यंत हार्दिकच्या नेतृत्वात मुंबईला एकही विजय मिळवता आलेला नाही.


हार्दिकला कर्णधार बनवण्यामुळे आधीच चाहते नाराज होते आणि आता संघाच्या कामगिरीमुळे ते अधिकच निराश झाले आहे. दरम्यान, पराभवाची हॅटट्रिक लावल्यानंतर मुंबईच्या कर्णधाराने कोणाला जबाबदार ठरवले आहे?


सामन्यानंतर हार्दिक पांड्या म्हणाला, ही एक कठीण रात्र. आम्हाला हवी तशी सुरूवात मिळाली नाही. मला पलटवार करायचा हता. आम्ही १५०-१६० बनवण्याच्या चांगल्या स्थितीत होते. मात्र माझ्या विकेटने त्यांना सामन्यात परतण्याची संधी दिली. मला आणखी चांगला खेळ करण्याची गरज होते. ठीक आहे आम्ही अशा विकेटची अपेक्षा केली नव्हती.


अनेकदा रिझल्ट चांगलाच लागेल असे नाही. एक संघ म्हणून आम्हाला विश्वास आहे की आम्ही अधिक चांगले करू शकतो. मात्र आम्हाला अधिक अनुशासित होण्याची गरज आहे आणि खूप आक्रमक खेळ करावा लागेल.


वानखेडे स्टेडियममध्ये खेळवलेल्या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करण्यास उतरलेल्या मुंबईच्या संघाला २० षटकांत ९ विकेट गमावत केवळ १२५ धावाच करता आल्या. संघाचे सुरूवातीचे तीन फलंदाज शून्यावर बाद झाले. यात रोहित शर्मा, नमन धीर आणि डेवाल्ड ब्राविस सामील होते. संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांना ३० धावांचा आकडा पार करता आला होता. हार्दिकने ३४ तर तिलकने ३२ धावा केल्या होत्या. त्यानंतर राजस्थानने १५.३ षटकांतच ४ विकेट गमावत विजय आपल्या नावे केला.


Comments
Add Comment

R Ashwin IPL Retirement: आर. अश्विनने आयपीएलला दिला निरोप! म्हटले "प्रत्येक शेवट ही एक..."

चेन्नई: भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण

मिस्टर ३६०' एबी डिव्हिलियर्सचे आरसीबीमध्ये पुनरागमनाचे संकेत, पण नव्या भूमिकेत!

बंगळुरू: रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाचा लाडका खेळाडू, 'मिस्टर ३६०'

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये