MI vs RR: मुंबईच्या सलग तिसऱ्या पराभवासाठी कर्णधार पांड्याने कोणाला ठरवले जबाबदार

मुंबई: मुंबई इंडियन्सला(mumbai indians) हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात आयपीएल २०२४मध्ये(ipl 2024) सलग तिसऱ्या पराभवास सामोरे जावे लागले. मुंबईने तिसरा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध आपल्या घरच्या मैदानावर वानखेडेवर ६ विकेटनी गमावला. आतापर्यंत हार्दिकच्या नेतृत्वात मुंबईला एकही विजय मिळवता आलेला नाही.


हार्दिकला कर्णधार बनवण्यामुळे आधीच चाहते नाराज होते आणि आता संघाच्या कामगिरीमुळे ते अधिकच निराश झाले आहे. दरम्यान, पराभवाची हॅटट्रिक लावल्यानंतर मुंबईच्या कर्णधाराने कोणाला जबाबदार ठरवले आहे?


सामन्यानंतर हार्दिक पांड्या म्हणाला, ही एक कठीण रात्र. आम्हाला हवी तशी सुरूवात मिळाली नाही. मला पलटवार करायचा हता. आम्ही १५०-१६० बनवण्याच्या चांगल्या स्थितीत होते. मात्र माझ्या विकेटने त्यांना सामन्यात परतण्याची संधी दिली. मला आणखी चांगला खेळ करण्याची गरज होते. ठीक आहे आम्ही अशा विकेटची अपेक्षा केली नव्हती.


अनेकदा रिझल्ट चांगलाच लागेल असे नाही. एक संघ म्हणून आम्हाला विश्वास आहे की आम्ही अधिक चांगले करू शकतो. मात्र आम्हाला अधिक अनुशासित होण्याची गरज आहे आणि खूप आक्रमक खेळ करावा लागेल.


वानखेडे स्टेडियममध्ये खेळवलेल्या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करण्यास उतरलेल्या मुंबईच्या संघाला २० षटकांत ९ विकेट गमावत केवळ १२५ धावाच करता आल्या. संघाचे सुरूवातीचे तीन फलंदाज शून्यावर बाद झाले. यात रोहित शर्मा, नमन धीर आणि डेवाल्ड ब्राविस सामील होते. संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांना ३० धावांचा आकडा पार करता आला होता. हार्दिकने ३४ तर तिलकने ३२ धावा केल्या होत्या. त्यानंतर राजस्थानने १५.३ षटकांतच ४ विकेट गमावत विजय आपल्या नावे केला.


Comments
Add Comment

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना