MI vs RR: मुंबईच्या सलग तिसऱ्या पराभवासाठी कर्णधार पांड्याने कोणाला ठरवले जबाबदार

मुंबई: मुंबई इंडियन्सला(mumbai indians) हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात आयपीएल २०२४मध्ये(ipl 2024) सलग तिसऱ्या पराभवास सामोरे जावे लागले. मुंबईने तिसरा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध आपल्या घरच्या मैदानावर वानखेडेवर ६ विकेटनी गमावला. आतापर्यंत हार्दिकच्या नेतृत्वात मुंबईला एकही विजय मिळवता आलेला नाही.


हार्दिकला कर्णधार बनवण्यामुळे आधीच चाहते नाराज होते आणि आता संघाच्या कामगिरीमुळे ते अधिकच निराश झाले आहे. दरम्यान, पराभवाची हॅटट्रिक लावल्यानंतर मुंबईच्या कर्णधाराने कोणाला जबाबदार ठरवले आहे?


सामन्यानंतर हार्दिक पांड्या म्हणाला, ही एक कठीण रात्र. आम्हाला हवी तशी सुरूवात मिळाली नाही. मला पलटवार करायचा हता. आम्ही १५०-१६० बनवण्याच्या चांगल्या स्थितीत होते. मात्र माझ्या विकेटने त्यांना सामन्यात परतण्याची संधी दिली. मला आणखी चांगला खेळ करण्याची गरज होते. ठीक आहे आम्ही अशा विकेटची अपेक्षा केली नव्हती.


अनेकदा रिझल्ट चांगलाच लागेल असे नाही. एक संघ म्हणून आम्हाला विश्वास आहे की आम्ही अधिक चांगले करू शकतो. मात्र आम्हाला अधिक अनुशासित होण्याची गरज आहे आणि खूप आक्रमक खेळ करावा लागेल.


वानखेडे स्टेडियममध्ये खेळवलेल्या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करण्यास उतरलेल्या मुंबईच्या संघाला २० षटकांत ९ विकेट गमावत केवळ १२५ धावाच करता आल्या. संघाचे सुरूवातीचे तीन फलंदाज शून्यावर बाद झाले. यात रोहित शर्मा, नमन धीर आणि डेवाल्ड ब्राविस सामील होते. संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांना ३० धावांचा आकडा पार करता आला होता. हार्दिकने ३४ तर तिलकने ३२ धावा केल्या होत्या. त्यानंतर राजस्थानने १५.३ षटकांतच ४ विकेट गमावत विजय आपल्या नावे केला.


Comments
Add Comment

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात

पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून

सुपरसंडे : पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताची दमदार सुरुवात

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामन्याला सुरुवात झाली आहे. नाणेफेक जिंकून

ICC Women's World Cup 2025 भारत-पाकिस्तान महिला विश्वचषक सामन्यात टॉस दरम्यान गोंधळ, मॅच रेफरीकडून गंभीर घोटाळा

कोलंबो : कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि

भारत पाकिस्तान सामन्यावेळी हस्तांदोलन झाले की नाही ?

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्याच्या

IND vs PAk : वर्चस्व राखण्यासाठी 'हरमनसेना' सज्ज; पाकिस्तानचा 'झिरो' रेकॉर्ड मोडणार?

कोलंबो : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये रविवार, ५ ऑक्टोबर रोजी क्रिकेट चाहत्यांना