रक्ताच्या नद्या सोडा, पण दगड मारण्याचीही कुणाची हिम्मत नाही; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची राहूल गांधींवर टीका

बंगळूरु : राहुल गांधी संसदेत म्हणायचे की, जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवू नका, रक्ताच्या नद्या वाहतील. पण, आमच्या सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० हटवले. राहुल बाबा, आता रक्ताच्या नद्या सोडा, तिकडे दगड फेकण्याचीही कुणाची हिम्मत होत नाही. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भक्कम नेतृत्वात लढत आहोत, तर दुसरीकडे घराणेशाही असलेली भ्रष्ट इंडीया आघाडी असल्याचे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इंडिया आघाडी, राहूल गांधींसह काँग्रेसवर घणाघाती टीका केली.


आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रमुख नेते देशभरात विविध ठिकाणी सभा, कार्यक्रम घेत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी बंगळुरुमध्ये सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच, कर्नाटकात भाजप सर्व २८ जागा जिंकेल, असा विश्वासही व्यक्त केला.


यावेळी शाह यांनी राहुल गांधींच्या परदैश दौऱ्यावरही टीका केली. ते म्हणाले, ‘संपूर्ण जगात नरेंद्र मोदी एकमेव व्यक्ती आहेत, ज्यांनी २३ वर्षांपासून मुख्यमंत्री आणि पंतप्रधान असताना एकही दिवस सुट्टी न घेता अहोरात्र जनतेची सेवा केली आहे. तर दुसरीकडे राहुल बाबा आहेत. हे दर उन्हाळ्यात परदेशात फिरायला जातात आणि इकडे काँग्रेसवाले सहा महिने त्यांना शोधत बसतात.'


एका बाजूला नरेंद्र मोदी आहेत, ज्यांनी २३ वर्षे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून काम केले. २३ वर्षात विरोधकांना मोदींवर २५ पैशांचाही भ्रष्टाचाराचा आरोप करता आला नाही. २३ वर्षांपासून मोदींनी पारदर्शकतेचा आदर्श देशात ठेवला आहे. दुसरीकडे भ्रष्टाचाराची ही ‘अहंकारी’ आघाडी आहे. काँग्रेसने सोनिया-मनमोहन यांच्या काळात १२ लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.

Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात