बंगळूरु : राहुल गांधी संसदेत म्हणायचे की, जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवू नका, रक्ताच्या नद्या वाहतील. पण, आमच्या सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० हटवले. राहुल बाबा, आता रक्ताच्या नद्या सोडा, तिकडे दगड फेकण्याचीही कुणाची हिम्मत होत नाही. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भक्कम नेतृत्वात लढत आहोत, तर दुसरीकडे घराणेशाही असलेली भ्रष्ट इंडीया आघाडी असल्याचे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इंडिया आघाडी, राहूल गांधींसह काँग्रेसवर घणाघाती टीका केली.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रमुख नेते देशभरात विविध ठिकाणी सभा, कार्यक्रम घेत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी बंगळुरुमध्ये सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच, कर्नाटकात भाजप सर्व २८ जागा जिंकेल, असा विश्वासही व्यक्त केला.
यावेळी शाह यांनी राहुल गांधींच्या परदैश दौऱ्यावरही टीका केली. ते म्हणाले, ‘संपूर्ण जगात नरेंद्र मोदी एकमेव व्यक्ती आहेत, ज्यांनी २३ वर्षांपासून मुख्यमंत्री आणि पंतप्रधान असताना एकही दिवस सुट्टी न घेता अहोरात्र जनतेची सेवा केली आहे. तर दुसरीकडे राहुल बाबा आहेत. हे दर उन्हाळ्यात परदेशात फिरायला जातात आणि इकडे काँग्रेसवाले सहा महिने त्यांना शोधत बसतात.’
एका बाजूला नरेंद्र मोदी आहेत, ज्यांनी २३ वर्षे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून काम केले. २३ वर्षात विरोधकांना मोदींवर २५ पैशांचाही भ्रष्टाचाराचा आरोप करता आला नाही. २३ वर्षांपासून मोदींनी पारदर्शकतेचा आदर्श देशात ठेवला आहे. दुसरीकडे भ्रष्टाचाराची ही ‘अहंकारी’ आघाडी आहे. काँग्रेसने सोनिया-मनमोहन यांच्या काळात १२ लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…