जगभरात नोकऱ्यांमध्ये होतेय कपात, या सेक्टर्समध्ये सुरक्षित आहेत नोकऱ्या

मुंबई: जगभरात अनेक ठिकाणी नोकऱ्यांमध्ये कपात होत आहे. जागतिक स्तरावर आर्थिक सुस्ती आणि आर्टिफिशिय इंटेलिजन्समुळे टेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांमध्ये मोठी कपात केली जात आहे. २०२३च्या अखेरीस सुरू झालेली ही कपात अद्याप सुरूच आहे. याशिवाय नव्या नोकरीच्या संधीही गायब आहेत. दरम्यान, एकीकडे असे सुरू असले तरी अशी काही सेक्टर आहेत ज्यांच्यावर या आर्थिक सुस्तीचा परिणाम होत नाही आहे आणि तेथे नोकऱ्यांमध्ये कपात होत नाही आहे.



कॉस्ट कटिंग आणि वर्कफोर्स मॅनेजमेंटच्या नावाने काढले जातायत लोक


आयटी कंपन्यांमध्ये नोव्हेंबर २०२३ पासून कपात सुरू होती. अल्फाबेट इंकने वर्ष २०२४च्या सुरूवातीला कर्मचाऱ्यांची कपात करून वाईट बातमी दिली होती. याशिवाय अॅपल, अॅमेझॉन, मेटा, डेल, एरिकसन, सिस्को आणि सॅप सारख्या मोठ्या कंपन्या सातत्याने लोकांना बाहेरचा रस्ता दाखवत आहे.



या क्षेत्रात नोकरीची चांगली शक्यता


२०२४ वर्षात सोशल सर्व्हिस, हेल्थकेअर, रिटेल,फूड, हॉटेल आणि रिअल इस्टेटसारख्या सेक्टरमध्ये कपात हा शब्द ऐकूही येत नाही आहे. येथे नव्या लोकांची भरती सुरू आहे. सोबतच चांगले अप्रेजल देऊन प्रतिभावान लोकांना घेतले जात आहे. मार्केटमध्ये फार्मा कंपन्यांनी चांगली कामगिरी केली आहे. सोबतच हॉस्पिटल्समध्ये डॉक्टर, नर्स आणि इतर मेडिकल स्टाफची मागणी वाढत आहे. सरकारही हेल्थकेअर सेक्टरमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्यासाठी मदत करत आहे.



रिटेल आणि हॉटेल इंडस्ट्रीही वेगाने वाढतेय


आकड्यांनुसार भारतीय रिटेल सेक्टरमध्ये आवश्यक गोष्टींची डिमांड २०२७ पर्यंत १.१ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचू शकते. हा आकडा वेगाने वाढत आहे. २०३४ पर्यंत हा आकडा २ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

महापालिकेच्यावतीने मुंबई क्लीन लीग स्पर्धा; स्वच्छता विषयक स्पर्धेच्या नोंदणीचा अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत शुभारंभ

मुंबई: मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या अनुषंगाने, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने

मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : "मुंबई महानगर प्रदेशात जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात

आमदार हेमंत पाटील यांनी मांडली 'लव्ह जिहाद' आणि 'लोकसंख्या नियंत्रणाची' आग्रही भूमिका

विधान परिषदेत धर्मांतर विरोधी विधेयकावर चर्चा मुंबई : विधान परिषदेत आज धर्मांतर विरोधी विधेयकावर अत्यंत

धर्मांतर हा श्रद्धेचा विषय, व्यवहाराचा नाही!"; विधान परिषदेत आमदार प्रवीण दरेकरांची ठाम भूमिका

मुंबई: "धर्म हा केवळ मानवी श्रद्धेचा भाग असून त्याचा व्यवहारासाठी किंवा स्वार्थासाठी वापर करणे चुकीचे आहे.

राज्यातील कालबाह्य ८० कायदे रद्द

विधेयक मंजूर; मुंबई फटक्यांची शिक्षा रद्द करण्याचा अधिनियम रद्द मुंबई : महाराष्ट्रातील कालबाह्य झालेले ८०

नायजेरियन नागरिकांविरोधात लवकरच धडक मोहीम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वैध कागदपत्रे नसलेल्यांना हद्दपार करणार मुंबई : राज्यात विशेषतः मुंबईनजीकच्या उपनगरांमध्ये बेकायदेशीरपणे