प्रहार    

जगभरात नोकऱ्यांमध्ये होतेय कपात, या सेक्टर्समध्ये सुरक्षित आहेत नोकऱ्या

  120

जगभरात नोकऱ्यांमध्ये होतेय कपात, या सेक्टर्समध्ये सुरक्षित आहेत नोकऱ्या

मुंबई: जगभरात अनेक ठिकाणी नोकऱ्यांमध्ये कपात होत आहे. जागतिक स्तरावर आर्थिक सुस्ती आणि आर्टिफिशिय इंटेलिजन्समुळे टेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांमध्ये मोठी कपात केली जात आहे. २०२३च्या अखेरीस सुरू झालेली ही कपात अद्याप सुरूच आहे. याशिवाय नव्या नोकरीच्या संधीही गायब आहेत. दरम्यान, एकीकडे असे सुरू असले तरी अशी काही सेक्टर आहेत ज्यांच्यावर या आर्थिक सुस्तीचा परिणाम होत नाही आहे आणि तेथे नोकऱ्यांमध्ये कपात होत नाही आहे.



कॉस्ट कटिंग आणि वर्कफोर्स मॅनेजमेंटच्या नावाने काढले जातायत लोक


आयटी कंपन्यांमध्ये नोव्हेंबर २०२३ पासून कपात सुरू होती. अल्फाबेट इंकने वर्ष २०२४च्या सुरूवातीला कर्मचाऱ्यांची कपात करून वाईट बातमी दिली होती. याशिवाय अॅपल, अॅमेझॉन, मेटा, डेल, एरिकसन, सिस्को आणि सॅप सारख्या मोठ्या कंपन्या सातत्याने लोकांना बाहेरचा रस्ता दाखवत आहे.



या क्षेत्रात नोकरीची चांगली शक्यता


२०२४ वर्षात सोशल सर्व्हिस, हेल्थकेअर, रिटेल,फूड, हॉटेल आणि रिअल इस्टेटसारख्या सेक्टरमध्ये कपात हा शब्द ऐकूही येत नाही आहे. येथे नव्या लोकांची भरती सुरू आहे. सोबतच चांगले अप्रेजल देऊन प्रतिभावान लोकांना घेतले जात आहे. मार्केटमध्ये फार्मा कंपन्यांनी चांगली कामगिरी केली आहे. सोबतच हॉस्पिटल्समध्ये डॉक्टर, नर्स आणि इतर मेडिकल स्टाफची मागणी वाढत आहे. सरकारही हेल्थकेअर सेक्टरमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्यासाठी मदत करत आहे.



रिटेल आणि हॉटेल इंडस्ट्रीही वेगाने वाढतेय


आकड्यांनुसार भारतीय रिटेल सेक्टरमध्ये आवश्यक गोष्टींची डिमांड २०२७ पर्यंत १.१ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचू शकते. हा आकडा वेगाने वाढत आहे. २०३४ पर्यंत हा आकडा २ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

बीडीडी चाळ वासियांना मिळालेली घरे; मुंबईकरांच्या घराच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीडीडी चाळ ५५६ पुनर्वसन सदनिका चावी वितरण समारंभ मुंबई : मुंबईकरांच्या हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती

महिलांची जोखीम ओळखण्याची क्षमता समाजसुरक्षेसाठी महत्त्वाची — ॲड. राहुल नार्वेकर

सणासुदीच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता समित्यांनी सज्ज राहावे —  नीलम गोऱ्हे मुंबई : विधानपरिषद

लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार

मुंबईच्या विकासाला नवे पंख: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण मुंबई : काही

डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डबेवाल्यांना दिलासा

मुंबई : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला डबेवाला समाजासाठी ऐतिहासिक घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विघटनवादी शक्तींना दूर सारून विद्यार्थ्यांनी एकात्मतेसह अखंडतेचा ध्यास धरावा – मंगलप्रभात लोढा

मुंबई : भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या फाळणीच्या दाहकतेचा निषेध करत राज्यातल्या हजारो आयटीआयमध्ये विभाजन

टीटीएफ २०२५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचा सहभाग महाराष्ट्राचे दालन ठरले ‘सर्वोत्कृष्ट’

मुंबई : वांद्रे येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे  ‘ट्रॅव्हल ट्रेड फेअर २०२५’  (टीटीएफ) या पर्यटनाशी निगडीत