जगभरात नोकऱ्यांमध्ये होतेय कपात, या सेक्टर्समध्ये सुरक्षित आहेत नोकऱ्या

मुंबई: जगभरात अनेक ठिकाणी नोकऱ्यांमध्ये कपात होत आहे. जागतिक स्तरावर आर्थिक सुस्ती आणि आर्टिफिशिय इंटेलिजन्समुळे टेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांमध्ये मोठी कपात केली जात आहे. २०२३च्या अखेरीस सुरू झालेली ही कपात अद्याप सुरूच आहे. याशिवाय नव्या नोकरीच्या संधीही गायब आहेत. दरम्यान, एकीकडे असे सुरू असले तरी अशी काही सेक्टर आहेत ज्यांच्यावर या आर्थिक सुस्तीचा परिणाम होत नाही आहे आणि तेथे नोकऱ्यांमध्ये कपात होत नाही आहे.



कॉस्ट कटिंग आणि वर्कफोर्स मॅनेजमेंटच्या नावाने काढले जातायत लोक


आयटी कंपन्यांमध्ये नोव्हेंबर २०२३ पासून कपात सुरू होती. अल्फाबेट इंकने वर्ष २०२४च्या सुरूवातीला कर्मचाऱ्यांची कपात करून वाईट बातमी दिली होती. याशिवाय अॅपल, अॅमेझॉन, मेटा, डेल, एरिकसन, सिस्को आणि सॅप सारख्या मोठ्या कंपन्या सातत्याने लोकांना बाहेरचा रस्ता दाखवत आहे.



या क्षेत्रात नोकरीची चांगली शक्यता


२०२४ वर्षात सोशल सर्व्हिस, हेल्थकेअर, रिटेल,फूड, हॉटेल आणि रिअल इस्टेटसारख्या सेक्टरमध्ये कपात हा शब्द ऐकूही येत नाही आहे. येथे नव्या लोकांची भरती सुरू आहे. सोबतच चांगले अप्रेजल देऊन प्रतिभावान लोकांना घेतले जात आहे. मार्केटमध्ये फार्मा कंपन्यांनी चांगली कामगिरी केली आहे. सोबतच हॉस्पिटल्समध्ये डॉक्टर, नर्स आणि इतर मेडिकल स्टाफची मागणी वाढत आहे. सरकारही हेल्थकेअर सेक्टरमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्यासाठी मदत करत आहे.



रिटेल आणि हॉटेल इंडस्ट्रीही वेगाने वाढतेय


आकड्यांनुसार भारतीय रिटेल सेक्टरमध्ये आवश्यक गोष्टींची डिमांड २०२७ पर्यंत १.१ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचू शकते. हा आकडा वेगाने वाढत आहे. २०३४ पर्यंत हा आकडा २ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

महिलांसाठी मुंबई देशातील टॉप ५ शहरांमध्ये; बेंगळुरू पुन्हा एकदा अव्वल!

मुंबई  : भारतातील महिलांसाठी राहण्यायोग्य आणि करिअरसाठी पोषक शहरांच्या यादीत मुंबईने आपले स्थान अधिक भक्कम

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई होणार

मुंबई : महानगरपालिका निवडणुकांसाठीचे मतदान आणि मतमोजणीकरिता पुरेशा प्रमाणात अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Devendra Fadnavis BMC Election 2026 : उद्धव आणि राज ठाकरेंचा जीव फक्त मुंबईतच का अडकलाय? फडणवीसांनी पुराव्यासह काढला भ्रष्टाचाराचा पाढा, नक्की काय म्हणाले?"

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)

वाढत्या बेकायदा घुसखोरांमुळे चौफेर सामाजिक संकटांचा धोका - नामवंत तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त

मुंबई  : तीन शेजारी देशांमधून भारतात घुसणाऱ्या असंख्य बेकायदा स्थलांतरितांमुळे भारताची सुरक्षा आणि विकास हे

Nitesh Rane : नालासोपारा मध्ये मंत्री नितेश राणे यांच्या प्रचार सभांचा झंझावात!

नालासोपारा : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील

भुयारी मेट्रो मार्गिकेमध्ये नेटवर्कची गैरसोय कायम !

तोडगा काढण्यात एमएमआरसीएल ढिम्म मुंबई : आरे ते कफ परेड या मेट्रो-३ भुयारी मेट्रोच्या संपूर्ण मार्गिकेमध्ये