चीनने अरूणाचलमधील ३० ठिकाणांची नावे बदलली, परराष्ट्र मंत्री म्हणाले- काहीही फरक पडणार नाही

  56

नवी दिल्ली: अरूणाचल प्रदेशवर आपला दावा ठोकण्याच्या आणखी एका प्रयत्नात चीनने भारतातील पूर्वोत्तर राज्यामध्ये एलएसीसोबत विविध ठिकाणच्या ३० नव्या स्थानांची चौथी यादी जाहीर केली. परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे दावे फेटाळून लावत म्हटले की अरूणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि नेहमीच राहील. हे पहिल्यांदाच घडलेले नाही की चीनने भारतीय क्षेत्रातील ठिकाणांची नावे बदलण्याचा प्रयत्न केला.


चीनच्या नागरी मंत्रालयाचे हे कृत्य अरूणाचल प्रदेशातील स्थानांवर दावा ठोकण्याचा नवीन प्रयत्न आहे. चीनने अरूणाचल प्रदेशमधील काही ठिाकणांची भौगोलिक नावांची यादी जाहीर केली. चीनने ज्या ३० ठिकाणांची नावे बदलली त्यात १२ डोंगर, चार नद्या, एक तलाव, एक डोंगराळ भाग, ११ राहण्याची ठिकाणे आणि जमीनीच्या तुकड्याचा समावेश आहे. चीनने या नावांना चीनच्या अक्षरांमध्ये लिहिले आहे.


२०१७मध्ये बीजिंगने अरूणाचल प्रदेशातील सहा जागांसाठी स्टँडर्डाईज्सत नावांची प्रथम यादी जाहीर केली होती. यानंतर २०२१मध्ये १५ स्थानांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली होती. यानंतर २०२३मध्ये ११ अतिरिक्त स्थानांची एक यादी जाहीर करण्यात आली होती


यातच भारताने मात्र चीनचे हे दावे फेटाळून लावले आहेत. भारताने म्हटले आहे की अरूणाचल प्रदेश हे राज्य भारताचा अविभाज्य भाग होता आणि नेहमीच राहील. येथील ठिकाणांना आपली नावे दिल्याने तो भाग आपला होत नाही. याबाबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले, जर मी तुमच्या घराचे नाव बदलले तर ते माझे होईल का? अरूणाचल प्रदेश हे भारताचे राज्य होते, आहे आणि नेहमीच राहील. नाव बदलण्याने कोणताही परिणाम होत नाही. आमचे सैन्य नियंत्रण रेषेवर तैनात आहे.

Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार

"अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो" अंतराळवीर शुभांशू शुक्लाने मारल्या पंतप्रधान मोदींशी गप्पा

अंतराळातील सर्वात मोठे आव्हान काय आहे? पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लासोबत संवाद नवी

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.