BJP: राहुल गांधींविरोधात भाजपाची निवडणूक आयोगाकडे तक्रार

मॅच फिक्सिंग आणि ईव्हीएम हॅकिंगसारखे आरोप प्रकरण


नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीने रविवारी दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर ‘लोकशाही वाचवा' सभेचे आयोजन केले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या सभेतून भाजपावर मॅच फिक्सिंग व ईव्हीएम हॅकिंगसारखे आरोप केले. राहुल गांधींच्या याच वक्तव्याविरोधात भाजपाने निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली आहे.


राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निवडणुकीत मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप केला होता. भाजपा त्यांच्या प्रयत्नांमध्ये यशस्वी झाला, तर देशाची घटना बदलली जाईल व लोकांचे अधिकार नष्ट होतील. ही मॅच फिक्सिंग थांबवण्यासाठी संपूर्ण ताकदीने मतदान करण्याचे आवाहन राहुल गांधी यांनी केले होते. मॅच फिक्सिंगशिवाय, ईव्हीएम (हॅकिंग), सोशल मीडिया व प्रेसवर दबाव आणल्याशिवाय ते १८० चा टप्पाही पार करू शकणार नाहीत, असा आरोपही त्यांनी केला होता.



भ्रष्टाचारात बुडालेल्या लोकांची सभा : भाजपा


दरम्यान, भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीदेखील इंडिया आघाडीच्या लोकशाही वाचवा सभेवर जोरदार टीका केली होती. सभा घ्यायला बंदी नाही, पण जमवणारे कोण? जे भ्रष्टाचारात बुडाले आहेत ते... जे जनतेचा पैसा लुटून तुरुंगात गेले आहेत ते. केजरीवाल लालूंच्या पावलावर पाऊल टाकत आहेत. असे भ्रष्टाचारी लोक पंतप्रधान मोदींच्या प्रामाणिक सरकारविरोधात एकवटले आहेत. पण, या देशातील जनता त्यांचे ऐकणार नाही. ४ जूनला सर्व काही स्पष्ट होईल, असे रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.


Comments
Add Comment

भारत - अमेरिका व्यापार कराराशी सबंधित महत्त्वाची बैठक पुढे ढकलली

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिका यांच्यातील मुक्त व्यापार कराराची बोलणी आधी २३ फेब्रुवारी रोजी होणार होती. ही चर्चा

जम्मू काश्मीरमधील किश्तवाडमध्ये दोन दहशतवादी ठार, दहशतवाद्यांचा तळ केला उद्ध्वस्त

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील किश्तवाडमध्ये चतरू भागात सुरक्षा पथक आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. सुरक्षा

कौतुकास्पद! भारतीय वंशाच्या महिलेची मायक्रोसॉफ्ट गेमिंगच्या सीईओपदी नियुक्ती

भारतीय वंशाच्या आशा शर्मा यांची मायक्रोसॉफ्टच्या गेमिंग विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून तमिळनाडूमधून सहा आतंकवाद्यांना अटक

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला मोठे यश मिळाले आहे. दिल्ली पोलीस स्पेशल सेलने तमिळनाडूमधून सहा संशयित

Srinagar Accident : सीआरपीएफच्या बंकर वाहनाचा अपघात; सात जवान जखमी

जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे सीआरपीएफच्या जवानांना घेऊन जाणारे बुलेटप्रूफ बंकर वाहन कालव्यामध्ये

AI Impact Summit 2026 ची सांगता; तब्बल ८८ देश आणि संघटनांनी केली घोषणापत्रावर स्वाक्षरी

नवी दिल्ली : दिल्लीतील भारत मंडपममध्ये आयोजित इंडिया एआय इम्पॅक्ट समिट-२०२६ ची सांगता झाली. यावेळी इंडिया एआय