BJP: राहुल गांधींविरोधात भाजपाची निवडणूक आयोगाकडे तक्रार

मॅच फिक्सिंग आणि ईव्हीएम हॅकिंगसारखे आरोप प्रकरण


नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीने रविवारी दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर ‘लोकशाही वाचवा' सभेचे आयोजन केले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या सभेतून भाजपावर मॅच फिक्सिंग व ईव्हीएम हॅकिंगसारखे आरोप केले. राहुल गांधींच्या याच वक्तव्याविरोधात भाजपाने निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली आहे.


राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निवडणुकीत मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप केला होता. भाजपा त्यांच्या प्रयत्नांमध्ये यशस्वी झाला, तर देशाची घटना बदलली जाईल व लोकांचे अधिकार नष्ट होतील. ही मॅच फिक्सिंग थांबवण्यासाठी संपूर्ण ताकदीने मतदान करण्याचे आवाहन राहुल गांधी यांनी केले होते. मॅच फिक्सिंगशिवाय, ईव्हीएम (हॅकिंग), सोशल मीडिया व प्रेसवर दबाव आणल्याशिवाय ते १८० चा टप्पाही पार करू शकणार नाहीत, असा आरोपही त्यांनी केला होता.



भ्रष्टाचारात बुडालेल्या लोकांची सभा : भाजपा


दरम्यान, भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीदेखील इंडिया आघाडीच्या लोकशाही वाचवा सभेवर जोरदार टीका केली होती. सभा घ्यायला बंदी नाही, पण जमवणारे कोण? जे भ्रष्टाचारात बुडाले आहेत ते... जे जनतेचा पैसा लुटून तुरुंगात गेले आहेत ते. केजरीवाल लालूंच्या पावलावर पाऊल टाकत आहेत. असे भ्रष्टाचारी लोक पंतप्रधान मोदींच्या प्रामाणिक सरकारविरोधात एकवटले आहेत. पण, या देशातील जनता त्यांचे ऐकणार नाही. ४ जूनला सर्व काही स्पष्ट होईल, असे रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.


Comments
Add Comment

कंगना राणौत हिंदी सल्लागार समितीची सदस्य बनली,जाणून घेऊया किती वर्षांचा असेल कार्यकाळ

नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत ही आता आपल्याला चित्रपटासोबत मंत्रालयामध्ये देखील पहायला मिळणार

किश्तवाड जिल्ह्यातील रतले जलविद्युत प्रकल्पात २९ संशयित मजूर ?

श्रीनगर  : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे चिनाब नदीवर उभारल्या जाणाऱ्या ८५० मेगावॉट क्षमतेच्या ‘रतले हायड्रो

‘एगोज’च्या प्रसिद्ध ब्रँडची अंडी वादाच्या भोवऱ्यात

नवी दिल्ली  : अंड्याला आरोग्यासाठी ‘सुपरफूड’ मानले जाते, मात्र सध्या अंड्यांच्या गुणवत्तेवरून देशभरात एकच खळबळ

पत्नीकडे घर खर्चाचा हिशोब मागणे गुन्हा नाही

नवी दिल्ली  : पतीने पत्नीला घर खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी एक्सेल शीट बनवण्यास सांगणे क्रुरता नाही, तसेच या

अयोध्येच्या राम मंदिरात ७० नवे पुजारी

नवी मुंबई  : अयोध्येतील राम मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

चालक परवान्याचे वेळेत नूतनीकरण करणे अनिवार्य

नवी दिल्ली  : चालक परवान्याची मुदत ज्या दिवशी संपते, त्याच दिवसापासून संबंधित व्यक्तीचा चालक म्हणून असलेला दर्जा