PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचा चेहरामोहराच बदलून टाकतील

उपमुख्यमंत्री फडणवीसांनी वाचली पंतप्रधानांच्या कार्याची जंत्री


परभणी : पंतप्रधान नरेंद्र (PM Narendra modi) मोदी यांनी गेल्या १० वर्षांमध्ये जगाला तोंडात बोटे घालायला लावणारी कामगिरी केली आहे. त्यांनी देशातील २५ कोटी लोकांना दारिद्य्ररेषेच्या वर आणले. गेल्या १० वर्षांमधील ही कामगिरी म्हणजे फक्त ट्रेलर आहे. येत्या ५ वर्षांमध्ये पंतप्रधान मोदी भारताचा चेहरामोहराच बदलून टाकतील, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy CM Devendra Fadanvis) यांनी पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनांचा वर्षाव गेला. महायुतीचे परभणी लोकसभेचे उमेदवार महादेव जानकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी देवेंद्र फडणवीस याठिकाणी आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी परभणीकरांना महादेव जानकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले.


यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात मुक्तकंठाने पंतप्रधान मोदी यांची तारीफ केली. आधी महादेव जानकर यांचे कौतुक केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या १० वर्षांमध्ये पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देशात कशाप्रकारे आमुलाग्र बदल केले, याची जंत्रीच वाचली.


गेल्या १० वर्षांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी भारत बदलल्याचे फडणवीस यांनी सांगितले. २०१४ पर्यंत प्रत्येकजण गरिबीविषयी बोलायचा, पण देशात पहिल्यांदा कोणी खऱ्या अर्थाने गरीब कल्याणाचा अजेंडा राबवला असेल तर ते पंतप्रधान मोदी आहेत. गेल्या १० वर्षांमधील भारताची कामगिरी पाहून संपूर्ण जग आश्चर्याने तोंडात बोटे घालत आहे. गेल्या १० वर्षांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी देशातील २५ कोटी लोकांना गरिबीच्या रेषेच्या वर काढले. जगातील अर्थतज्ज्ञ म्हणतात की, भारतामध्ये हे काय आश्चर्य झाले. जे विकसित देशांना जमले नाही, ते मोदींनी करुन दाखवले असल्याचे फडणवीस यांनी यावेळी म्हणाले.



हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है


मोदीजींनी हे कसे केले, हा प्रश्न सगळ्यांना पडला. पंतप्रधान मोदींना हे जमले कारण, त्यांनी मुठभर लोकांसाठी काम केले नाही. त्यांनी गरिबांच्या घरात वीज,पाणी,सिलेंडर या सुविधा मिळतील, हे पाहिले. तसेच आमच्या महिलांना शौचालय, मुद्रा लोन, शिष्यवृत्ती आणि कौशल्य विकासातंर्गत तरुणांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, यासाठी मोदीजींनी सातत्याने प्रयत्न केले. मोदीजी म्हणतात की, १० वर्षांमध्ये देशात झालेले हे परिवर्तन हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है. त्यामुळे पुढील पाच वर्षांमध्ये भारत आणि महाराष्ट्र ज्याप्रकारे बदलणार आहे, त्याची कल्पनाही आपण करु शकत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.


Comments
Add Comment

Malegaon : चाळीसगाव फाटा ते शिवतीर्थ नवीन जलवाहिनीस महासभेत मंजुरी

Malegaon : ऐन पावसाळ्यात वारंवार जलवाहिनी फुटल्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत होते. यासंदर्भातील

Tribal Development : आदिवासींच्या उत्पादनांसाठी जागतिक बाजारपेठेचे दार उघडले

- राज्य शासनाचा पुढाकार; 'शबरी नॅचरल्स' ब्रँडचे नाशिकच्या दिंडोरीत प्रक्रिया युनिट मुंबई : राज्यातील आदिवासी

Nagpur Crime : लॉजवर घेऊन गेला अन् 30 तास हात पाय बांधून नको ते केलं, नागपूर पोलिसांकडून आरोपीला अटक

नागपूर : नागपुरात (Nagpur) 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरण आणि गंभीर अत्याचाराच्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली

Jalgaon : जळगावकरांनो लक्ष द्या ! शिव कॉलनी पुलाच्या कामासाठी वाहतूक वळवणार; 'हे' असतील पर्यायी मार्ग

Jalgaon : जळगाव शहरातील शिव कॉलनीतील रेल्वे मार्गावरील समांतर पूल आणि भुयारी मार्गाच्या रखडलेल्या कामाला अखेर गती

State Government : आयुष्यमान भारत आणि जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहारांप्रकरणी एसआयटी

 १५ हजार ४०७ उपचारांचे दावे संशयास्पद; महिनाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई : आयुष्मान भारत-पंतप्रधान

Jalgaon Railway : रेल्वे प्रवाशांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली; ‘कोयंबतूर–जयपूर’ एसी एक्स्प्रेस पुन्हा धावणार; जळगावकरांना रेल्वेचा दिलासा

Jalgaon Railway : जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोयंबतूर–जयपूर साप्ताहिक विशेष एसी