90 years of RBI : आरबीआयच्या ९० व्या वर्धापन दिन सोहळ्याला पंतप्रधान मोदी यांची उपस्थिती

मुंबईतील एनसीपीए येथे कार्यक्रमाचे आयोजन


मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) यावर्षी ९० व्या वर्षात पदार्पण करत आहे. या ९० व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईच्या नरिमन पॉइंट (Nariman Point) येथील एनसीपीए (NCPA) या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधानांसह अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman), आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikanta Das), राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) देखील उपस्थित आहेत. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नरिमन पॉइंट परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना १ एप्रिल १९३५ रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा १९३४ अंतर्गत करण्यात आली आणि १ जानेवारी १९४९ रोजी तिचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. या ९० वर्षांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी संबोधित करणार आहेत. सध्या पंतप्रधान मोदी लोकसभा निवडणुकीचा प्रचार करत आहेत. ते सातत्याने जाहीर सभा घेत असून, त्यांच्या सरकारने केलेल्या कामांची माहिती लोकांना देत आहेत.


रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया केंद्र सरकार, राज्य सरकारे, व्यापारी बँका, राज्य सहकारी बँकांसाठी बँकर म्हणून काम करते. रुपयाच्या विनिमय मूल्याची स्थिरता राखण्यात RBI महत्त्वाची भूमिका बजावते आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या भारताच्या सदस्यत्वाच्या बाबतीत सरकारचे एजंट म्हणून काम करते. रिझव्र्ह बँक विविध प्रकारची विकासात्मक आणि प्रचारात्मक कामेही करते. याशिवाय, रिझर्व्ह बँक भारत सरकारचे कर्ज कार्यक्रम देखील हाताळते.


भारतात, एक रुपयाची नाणी आणि नोटा सोडून इतर चलन जारी करण्याचा एकमेव अधिकार रिझर्व्ह बँकेला आहे. केंद्र सरकारचे एजंट म्हणून, रिझर्व्ह बँक एक रुपयाच्या नोटा आणि नाणी तसेच सरकारने जारी केलेली छोटी नाणी देखील प्रसारित करते.

Comments
Add Comment

Mumbai: तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या..

मुंबई: राज्याचं प्रशासन सेवेतलं सर्वोच्च स्थान, केंद्रबिंदु असलेल्या मंत्रालयात काही दिवसांपूर्वी एका

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे होणार १० पदरी; टोल वसुली....

२०६० पर्यंत टोल वसुली सुरूच  मुंबई : वाढत्या वाहतुकीमुळे कायम कोंडीचा सामना करणाऱ्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवे वर

रस्ते तसेच रेल्वे कन्व्हर्टची सफाई रिमोट कंट्रोल मशिन्सद्वारे

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने रस्ते आणि रेल्वे कल्व्हर्ट यांच्या सफाईसाठी रिमोट कंट्रोल स्वींग लोडर मशीनचा

BMC : मुंबईसाठी तब्बल १३,५०० मोठ्या आकाराच्या कचरा पेट्यांची खरेदी

सार्वजनिक कचरा पेट्यांची संख्या कमी करताना या ठेवणार कुठे? मुंबई : मुंबईतील मोठ्या आकाराच्या कचरा कुंड्या हटवून

Navi Mumbai: नवी मुंबईतील भोंदूची विकृती उघड; काळी जादू करण्यासाठी महिलांना विवस्त्र व्हायला सांगत...

नवी मुंबई: राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. अशातच आता नवी मुंबईतून अशीच एक धक्कादायक

Ashok Kharat Case : भोंदूबाबा प्रकरणातील स्त्रिया मानसिक धक्क्यात; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे.....

मुंबई : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतले आहे, भोंदूबाबा सोबतचे