Prasad Lad : नटरंगी नाच्या, जनता तुला चपलेने मारल्याशिवाय गप्प राहणार नाही!

सकाळी उठून लिपस्टीक, पावडर लावून टीव्हीवर येऊन काहीही बोलतात


प्रसाद लाड यांचा संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल


मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) अत्यंत बेताल वक्तव्यं करीत आहेत. गेले काही दिवस त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजप नेत्यांवर आपले टीकास्त्र उपसले आहे. त्यामुळे भाजप नेतेही त्यांच्यावर जोरदार पलटवार करत आहेत. आजच्या पत्रकार परिषदेत तर पंतप्रधान मोदी यांची तुलना विनोदी अभिनेता जॉनी लिव्हरशी (Johnny Lever) करत हद्द पार केली. राऊतांच्या या टीकेवर भाजपने (BJP) आक्रमक पवित्रा धारण केला आहे. भाजपचे नेते तथा आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी राऊतांचा उल्लेख 'नटरंगी नाचा' असा करत जोरदार हल्लाबोल केला.


प्रसाद लाड म्हणाले की, नरेंद्र मोदी हे देशातील १३० कोटी जनतेचा स्वाभिमान आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हीन भाषेत टीका करणाऱ्या संजय राऊत नावाचा नाच्याला हे माहीत नाही. सकाळी उठून लिपस्टीक, पावडर लावून टीव्हीवर येऊन काहीही बोललं जातं, देशाच्या पंतप्रधानांचा अपमान केला जातो, असं प्रसाद लाड म्हणाले. तसंच संजय राऊत यांना उद्देशून 'अरे नटरंगी नाच्या महाराष्ट्र, देशातील जनता तुला चपलेने मारल्याशिवाय, तुझी लायकी दाखवल्याशिवाय गप्प राहणार नाही,' असं प्रसाद लाड म्हणाले.


पुढे प्रसाद लाड म्हणाले, संजयजी तुम्ही अशा प्रकारचं हीन कृत्य परत केलं, तर मी तुम्हाला जी म्हणणार नाही. संज्या तुला सांगतो तुला मी सोडणार नाही, असा इशाराही प्रसाद लाड यांनी संजय राऊतांना दिला.


Comments
Add Comment

गोरेगाव, सांताक्रूझ दरम्यान रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

'इंडिगो'ची सर्व उड्डाणे रद्द; प्रवाशांचे हाल, इतर विमानांचे दर दुप्पट

नवी दिल्ली : इंडिगो कंपनीने अचाकन आपल्या फ्लाईट रद्द केल्याने देशातील विविध महत्त्वाच्या विमानतळाची अवस्था बस

वरळीत शिउबाठाची दादागिरी; भाजपच्या कामगार संघटनेचा फलक लावण्यास विरोध

मुंबई : विधानसभा निवडणुकीत वरळीची जागा कशीबशी जिंकलेल्या शिउबाठाला अद्याप राजकीय स्थितीचे भान आलेले दिसत नाही.

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आरे कॉलनी व दिंडोशी वन क्षेत्रातील रहिवाश्यांना घरे द्या'

मुंबई : आरेमध्ये तसेच दिंडोशी येथील वन क्षेत्रात गेली अनेक वर्ष वास्तव्य रहिवाशी हि देखील माणसे असून ते मुलभूत

फडणवीस सरकारची ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशेष संवाद मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र

डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वीकारला महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी