Health: चुकूनही प्लास्टिकच्या डब्यात पॅक करू नका गरम जेवण, नाहीतर...

मुंबई: आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे लोक घाईघाईने काम करतात. जे लोक सकाळी ऑफिसला जातात त्यांच्यासाठी तर सकाळची वेळ खूपच धावपळीची असते. अनेकदा सकाळी लोक नाश्ताही करू शकत नाहीत. याशिवाय टिफीन घेऊनही ते घाईघाईत घराबाहेर पडतात.


अशातच काही गोष्टींबाबत लक्ष देणे गरजेचे आहे. अनेकदा लोक घाईघाईने घराबाहेर पडतात तेव्हा गरम खाणे टिफीनमध्ये भरतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का प्लास्टिकच्या डब्यात गरम खाणे पॅक केल्याने आरोग्यावर किती मोठे नुकसान होते ते.



प्लास्टिकमध्ये गरम जेवण पॅक करण्याचे तोटे


प्लास्टिकच्या डब्ब्यात गरम जेवण पॅक केल्याने शरीरास मोठे नुकसान होते. जेव्हा तुम्ही असे करता तेव्हा प्लास्टिकमधील रासायनिक घटक जेवणासोबत मिसळतात आणि ते शरीरात जाऊन अनेक आजार निर्माण करतात. यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते. याशिवाय प्लास्टिकमधील काही केमिकल्स मुलांच्या विकासामध्ये अडथळा निर्माण करतात.



या आजारांचा असतो धोका


प्लास्टिकमधील काही केमिकल्समुळे हार्मोनचे संतुलन बिघडू शकते. यामुळे डायबिटीजसारखा आजार होण्याची शक्यता असते. जर तुम्ही दररोज असे करता तर थायरॉईडचा धोका अधिक वाढतो. प्लास्टिकमधील काही केमिकल्समुळे स्किन अॅलर्जीही होऊ शकते. अनेकदा गरमागरम जेवण पॅक केल्याने प्लास्टिक वितळण्याची शक्यता असते. यामुळे बॅक्टेरिया पसरण्याचा धोका वाढतो. यापासून बचाव करण्यासाठी तुम्ही काच अथवा स्टीलच्या डब्याचा वापर करू शकता.

Comments
Add Comment

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे

तोंड येण्याची समस्या का होते? कारणे आणि घरगुती उपाय

मुंबई : तोंड येणे म्हणजे तोंडात किंवा जिभेवर येणारे छोटेसे पण वेदनादायक फोड. ही एक सामान्य समस्या असली, तरी