Health: चुकूनही प्लास्टिकच्या डब्यात पॅक करू नका गरम जेवण, नाहीतर...

  76

मुंबई: आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे लोक घाईघाईने काम करतात. जे लोक सकाळी ऑफिसला जातात त्यांच्यासाठी तर सकाळची वेळ खूपच धावपळीची असते. अनेकदा सकाळी लोक नाश्ताही करू शकत नाहीत. याशिवाय टिफीन घेऊनही ते घाईघाईत घराबाहेर पडतात.


अशातच काही गोष्टींबाबत लक्ष देणे गरजेचे आहे. अनेकदा लोक घाईघाईने घराबाहेर पडतात तेव्हा गरम खाणे टिफीनमध्ये भरतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का प्लास्टिकच्या डब्यात गरम खाणे पॅक केल्याने आरोग्यावर किती मोठे नुकसान होते ते.



प्लास्टिकमध्ये गरम जेवण पॅक करण्याचे तोटे


प्लास्टिकच्या डब्ब्यात गरम जेवण पॅक केल्याने शरीरास मोठे नुकसान होते. जेव्हा तुम्ही असे करता तेव्हा प्लास्टिकमधील रासायनिक घटक जेवणासोबत मिसळतात आणि ते शरीरात जाऊन अनेक आजार निर्माण करतात. यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते. याशिवाय प्लास्टिकमधील काही केमिकल्स मुलांच्या विकासामध्ये अडथळा निर्माण करतात.



या आजारांचा असतो धोका


प्लास्टिकमधील काही केमिकल्समुळे हार्मोनचे संतुलन बिघडू शकते. यामुळे डायबिटीजसारखा आजार होण्याची शक्यता असते. जर तुम्ही दररोज असे करता तर थायरॉईडचा धोका अधिक वाढतो. प्लास्टिकमधील काही केमिकल्समुळे स्किन अॅलर्जीही होऊ शकते. अनेकदा गरमागरम जेवण पॅक केल्याने प्लास्टिक वितळण्याची शक्यता असते. यामुळे बॅक्टेरिया पसरण्याचा धोका वाढतो. यापासून बचाव करण्यासाठी तुम्ही काच अथवा स्टीलच्या डब्याचा वापर करू शकता.

Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी