तळा तालुक्यातील द्रोणागिरी रस्त्याचे काम प्रगतिपथावर

  31

रस्त्याच्या सुविधेमुळे द्रोणागिरी यात्रेला भाविकांची होणार माेठी गर्दी


तळा : तळा तालुक्यातील प्रसिद्ध द्रोणागिरी देवस्थान रस्त्याचे काम प्रगतिपथावर असून रस्त्याच्या सुविधेमुळे द्रोणागिरी यात्रेला नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


द्रोणागिरी डोंगरात वसलेल्या डोनोबाच्या यात्रेसाठी दरवर्षी एप्रिलमध्ये हनुमान जयंतीला भाविक आवर्जून येत असतात. याठिकाणी असलेल्या देव डोनोबा व देवी पद्मावतीचे दर्शन घेऊन देवाची लाट पाहण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी उसळते. मात्र याठिकाणी जाण्यायेण्यासाठी योग्य सुविधा नसल्याने भाविकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. बहुतांश वयोवृद्ध नागरिकांना ईच्छा असूनही केवल वाहतुकीची सुविधा नसल्याने यात्रेसाठी येता येत नव्हते.तसेच हल्ली प्रखर उन्हातून पायी द्रोणागिरीला जाणे सर्वांनाच शक्य नसल्याने बहुतांश नागरिक यात्रेला जाणे टाळतात. यामुळेच दरवर्षी भाविकांच्या संख्येत घट होत असल्याचे पहायला मिळत होते. मात्र द्रोणागिरी देवस्थान सुधारणा करणे कामासाठी पर्यटन विकास निधी अंतर्गत पाच कोटी रुपये मंजूर होऊन सदर रस्त्याच्या कामाचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते चार महिन्यांपूर्वी भूमिपूजन करण्यात आले होते.


तसेच यावेळी एप्रिल महिन्यात असलेल्या द्रोणागिरी यात्रेच्या अगोदर हे रस्त्याचे काम पूर्ण व्हावे जेणेकरून जास्तीत जास्त भाविकांना डोंगरावर यात्रेसाठी जाता येईल अशी अपेक्षा मंत्री महोदयांनी व्यक्त केली होती. तेव्हापासून या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. एप्रिल महिन्यात द्रोणागिरी यात्रा असून त्या आधी हे काम पूर्णत्वास गेल्यास तालुक्यासह दूरदूर वरून येणाऱ्या भाविकांना डोंगरावर यात्रेला जाणे सोयीस्कर पडणार आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी द्रोणागिरीवर भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Comments
Add Comment

नदी, नाल्यांकडे दुर्लक्ष, नालेसफाईत कोट्यावधी खर्च

कांदिवली (वार्ताहर) : कांदिवली, चारकोप आणि बोरिवली गोराईतील खाडीकिनारी असलेली खारफुटी नामशेष होत असून, तिथे

विठुरायाच्या दर्शनासाठी लालपरीलाच पसंती

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी एसटी प्रशासनाकडून विशेष

Success Mantra: सकाळी उठताच लक्षात ठेवा या गोष्टी, जीवनात येणार नाही अडथळे

मुंबई: आचार्य चाणक्य हे भारताचे थोर विचारवंत होते. त्यांनी आपले अनुभव आणि ज्ञानाच्या जोरावर चाणक्य नितीमध्ये

Mohammad Shami: कोलकाता उच्च न्यायालयाकडून मोहम्मद शमीला मोठा झटका

नवी दिल्ली: कोलकाता उच्च न्यायालयाकडून क्रिकेटर मोहम्मद शमीला मोठा झटका बसला आहे. उच्च न्यायालयाने शमीला त्याची

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

टाकीचा स्लॅब कोसळून चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणी दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

आमदार निकोलेंच्या प्रश्नावर पाणीपुरवठा मंत्र्यांची कारवाई पालघर : डहाणू तालुक्यातील गट ग्रामपंचायत चळणी