नागरिकांनो, काळजी घ्या! उन्हाचा पारा वाढणार, IMDने दिली माहिती

मुंबई: भारतीय हवामान विभागाने उन्हाळ्याबाबत आपले अंदाज व्यक्त केले आहे. आयएमडीने व्यक्त केलेल्या शक्यतेनुसार या उन्हाळ्यात उन्हाचा पारा खूप वाढणार असून उष्णतेच्या लाटा अधिक असण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या मते एप्रिल ते जूनपर्यंत देशातील अधिकतर भागात तापमान सामान्यपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.


दरम्यान, पूर्व, उत्तरपूर्व आणि उत्तर पश्चिम भारतातील काही भागात सामन्यपेक्षा कमी तापमान असण्याची शक्यता आहे. तर उत्तर-पूर्व आणि उत्तर पश्चिमच्या काही भागांना सोडल्यास देशातील अधिकांश भागात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.



हवामान विभागाने दिली माहिती


एप्रिल महिन्याबाबत जारी केलेल्या पूर्वानुमानानुसार भारताच्या अधिकांश भागात सामान्यपेक्षा अधिक तापमान राहील. तर पूर्व, उत्तर-पूर्व आणि उत्तर पश्चिम भारतातील एक अथवा दोन भाग सोडले तर किमान तापमान सामन्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.


उन्हाच्या वाढत्या पारासोबत देशभरात उष्णतेच्या लाटांमध्येही वाढ होऊ शकते. हवामान विभागाचे म्हणणे आहे की दक्षिण प्रायद्वीच्या अधिकांश भाग मध्य भारत, उत्त पश्चिमच्या मैदानी भागात सामान्यपेक्षा अधिक उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे. तर एप्रिल महिन्यात अधिक उष्णता असणार असल्याचे सांगितले जात आहे.

Comments
Add Comment

PM Modi Karnataka Visit : पंतप्रधान मोदींची आदिचुंचनगिरीत पवित्र भेट; श्री गुरु भैरवैक्य मंदिरात घेतलं दर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच बुधवार १५ एप्रिल रोजी एका दिवसाच्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान

Vedanta plant in Chhattisgarh : छत्तीसगड : वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलरचा भीषण स्फोट; १४ कामगारांचा मृत्यू, १९ गंभीर जखमी

छत्तीसगड : छत्तीसगडमधील शक्ती जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील सिंहितराई स्थित वेदांता

ECOSOC India Elected : संयुक्त राष्ट्रसंघात भारताचा दबदबा! तीन जागतिक समित्यांमध्ये भारताची निवड

- २०२७-३० साठी मोठं राजनैतिक यश मुंबई : २ एप्रिल २०२६ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या इकोनॉमिक अँड सोशल कॉन्सिल कॉनशील

PM Modi - Trump Phone Call : पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात मंगळवार १३ एप्रिल रोजी सुमारे ४० मिनिटे दूरध्वनीवर चर्चा

Chhattisgarh : वीज प्रकल्पात बॉयलरचा स्फोट, अनेकांचा मृत्यू

शक्ती : छत्तीसगडमधील शक्ती जिल्ह्यात वेदांता कंपनीच्या वीज निर्मिती प्रकल्पात बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटात नऊ

पर्यावरणप्रेमी की पर्यावरणाला हानीकारक आहे EV ?

नवी दिल्ली : दिल्ली सरकारने ‘ईव्ही धोरण २.०’ अंतर्गत विद्युत वाहनांना प्रदूषणाविरुद्ध प्रभावी पर्याय म्हणून