Ramtek News : काँग्रेस नेत्यांनी दबाव टाकल्याचा आरोप करत किशोर गजभिये अपक्ष लढणार

रामटेकमध्ये काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का


रामटेक : रामटेक लोकसभा मतदारसंघातील (Ramtek Loksabha) काँग्रेसच्या (Congress) अडचणी थांबत नसल्याचे चित्र आहे. काँग्रेसने रश्मी बर्वे (Rashmi Barve) यांना उमेदवारी जाहीर केली मात्र त्यांचं जात प्रमाणतपत्र पडताळणीत अपात्र ठरल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. हा काँग्रेससाठी एक धक्का होता. त्यानंतर आता रामटेकमध्येच काँग्रेसला दुसरा मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे नेते असलेले किशोर गजभिये (Kishor Gajbhiye) यांनी आपण याच मतदारसंघातून अपक्ष लढणार असल्याचं तसेच काँग्रेसच्या सदस्यत्वाचा लवकरच राजीनामा देणार असल्याचं म्हटलं आहे.


माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट करताना किशोर गजभिये म्हणाले, "रामटेक लोकसभा मतदारसंघातून मी माझा उमेदवारी अर्ज भरला होता. हा अर्ज आधिक स्विकृत झालेला आहे. यामध्ये निवडणूक चिन्हही मला मिळालं आहे. जे मुक्त चिन्ह आहेत त्यातील प्रेशर कुकर हे चिन्ह मला मिळालं आहे."


मला जिंकायचं आहे त्यामुळं कोणाला फटका बसतोय याची चिंता मी कशाला करु? मी सध्या काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला नाही. पण लवकरच देणार आहे. मी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी माझ्यावर दबाव होताच, त्यासाठी लोकांनी प्रयत्नही करुन पाहिले. पण यावर मी आत्ता जास्त भाष्य करणार नाही, असंही यावेळी गजभिये यांनी सांगितलं.



गजभिये यांनी का केली बंडखोरी?


किशोर गजभिये यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, माजी मंत्री सुनील केदार यांनी त्यांच्या नावाला कडाडून विरोध दर्शवला होता. त्यांनी रश्मी बर्वे यांच्या नावाचा आग्रह धरला होता. केदारांचा हट्ट काँग्रेसच्या नेत्यांनी पुरवल्याने गजभिये यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी वंचित बहुजन विकास आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला.


वंचित बहुजन आघाडीने त्यांना उमेदवारी देण्याचं जाहीरसुद्धा केलं होतं. पण अचानक वंचितच्या वतीनं भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर चहांदे यांनीही उमेदवारी दाखल केली. त्यामुळे वंचितकडूनही गजभिये यांना डावलण्यात आलं. त्यामुळं त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला.


२०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसने रामटेकमधून किशोर गजभिये यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी सुनील केदार आणि माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी त्यांच्या नावाला उघडपणे विरोध केला होता.

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य