Alibag crime : खालापूरमधून गावठी रिव्हॉल्व्हरसह पाच जिवंत काडतुसे जप्त

एक आरोपी अटकेत, न्यायालयाकडून दोन दिवसांची पोलीस कोठडी


अलिबाग : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस सतर्क झाले असून, खालापूरमधून (Khalapur) एका आरोपीकडून गावठी रिव्हॉल्व्हरसह पाच जिवंत काडतुसे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जप्त केली आहेत. या प्रकरणी आरोपी नरेश धोंडू देशमुख याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.


स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना २८ मार्च २०२४ रोजी सायंकाळी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार खालापूर पोलीस ठाणे हद्दीत चौक फाटा परिसरात एक इसम अवैधरित्या स्वतःकडे गावठी रिव्हॉल्व्हर बाळगून फिरत आहे. त्यानंतर पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन व कर्मचाऱ्यांचे पथक नेमून घटनास्थळी पाठविले. या पथकाने सदर इसमाचा शोध घेतला असता, तो इसम संशयितरित्या फिरताना आढळून आला. पथकाने लागलीच संशयितास ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने त्याचे नाव नरेश धोंडू देशमुख असे सांगितले. या पथकाने दोन पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे एक गावठी रिव्हॉल्व्हर व पाच जिवंत काडतुसे मिळून आली. याबाबत खालापूर पोलीस ठाण्यात गु.र.नं १६२/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस हवालदार सुधीर मोरे करीत असून, या गुन्हयातील आरोपी नरेश धोंडू देशमुख याला अटक करण्यात आली आहे. या आरोपीला न्यायालयासमोर उभे केले असता, आरोपीला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.



रसायनी पोलिसांकडून गांजा जप्त


दुसऱ्या घटनेत रसायनी पोलीस ठाणे हद्दीतील वाशिवली भागात २८ मार्चला रसायनी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक बांगर, सपोनि लहांगे व सहकारी अशी गस्त घालीत असताना दुपारच्या वेळेत वाशिवली येथील डॉ. पारनेरकर महाविद्यालयाच्या मैदानाच्या बाजूस असलेल्या एका मोहाच्या झाडाजवळ आरोपी ज्ञानेश्वर बालाजी जाधव (वाशिवली, तालुका खालापूर) याच्या ताब्यात पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये १ किलो ८५ ग्रॅम वजनाचा गांजा सुट्ट्या स्वरूपात विक्री करताना आढळून आला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेत अटक करून त्याच्याकडून ११ हजार रुपये किमतीचा गांजा हा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सपोनि लहांगे हे करीत आहे. आरोपीला न्यायालयासमोर उभे केले असता, त्याला १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.


दरम्यान, लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी म्हणून जिल्ह्यात गुन्हेगारांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे, तसेच जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना तसे आदेश दिलेले आहेत. त्या दृष्टीने जिल्ह्यात अवैध शस्त्रे, अंमली पदार्थ, अवैध मद्य यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. या दोन्ही कामगिरी रायगड जिल्हयाचे जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनी पोमन, सहायक फौजदार राजेश पाटील, प्रसाद पाटील, पोलिस हवालदार संदीप पाटील, राकेश म्हात्रे, सुधीर मोरे, झेमसे यांच्या तपास पथकाने केली आहे.

Comments
Add Comment

Minister Adv. Ashish Shelar : चित्रपट उद्योगासाठी प्रोत्साहन धोरणाचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई : राज्यातील चित्रपट उद्योगाला चालना देण्यासाठी तसेच निर्माते आणि निर्मिती संस्थांच्या विविध अडचणी व

Nitesh Rane : कोकण रेल्वेच्या प्रकल्पग्रस्तांना रोजगारात प्राधान्य द्या!

पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश; प्रकल्पबाधितांची स्वतंत्र यादी तयार करण्याच्या रेल्वे प्रशासनाला

LPG Cylinder Booking And Delivery New Rule : LPG ग्राहकांनो लक्ष द्या! गॅस बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; कंपन्यांकडून अलर्ट जारी

मुंबई : देशभरातील एलपीजी (LPG) गॅस ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. गॅस वितरणातील पारदर्शकता

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांची तब्बल ६ तास चौकशी! काय म्हणाल्या चाकणकर...?

- भोंदू अशोक खरात प्रकरणात SIT कडून सवालांचा भडिमार मुंबई : राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali

Heat Wave in Maharashtra : उष्णतेचा वाढता कहर! राज्यात उष्माघाताच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; आरोग्य विभाग सतर्क

राज्यभरात उन्हाचा तडाखा (Heat Wave in Maharashtra) दिवसेंदिवस तीव्र होत असून, त्याचा गंभीर परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर

Pratap Sarnaik : “व्यवसायिक वाहन चालकांनी व्यवहारिक मराठी शिकणे ही काळाची गरज”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रतिपादन

मुंबई : “महाराष्ट्रात व्यवसायिक प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक चालकाला व्यवहारिक मराठी येणे अत्यावश्यक आहे.