Amol Kirtikar : ठाकरे गट चिंतेत! अमोल कीर्तीकरांना ईडीचं दुसरं समन्स

  150

खिचडी घोटाळा प्रकरणी होणार चौकशी


मुंबई : लोकसभा निवडणुका (Loksabha Elections) जवळ आलेल्या असताना विरोधी पक्षांतील नेत्यांचा काळा बाजार उघडकीस येत आहे. ईडी (ED) या नेत्यांच्या मागे हात धुवून लागली असल्याने विरोधी पक्षांची कोंडी झाली आहे. त्यातच आता ठाकरे गटाकडून (Thackeray Group) वायव्य मुंबई मतदारसंघासाठी तिकीट मिळालेले आमदार अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) यांना ईडीने समन्स (ED Summons) बजावले आहे. मागच्या चौकशीला गैरहजर राहिल्यामुळे त्यांना ईडीकडून दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आलं आहे.


ईडीने समन्स पाठवून अमोल किर्तीकरांना ८ एप्रिल रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना काळातील खिचडी वितरणात (Covid khichadi scam) झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी कीर्तीकर यांना समन्स बजावण्यात आलं आहे. यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेनेही त्यांची या प्रकरणात चौकशी केली होती.


काही दिवसांपूर्वी युवासेनेचे पदाधिकारी सूरज चव्हाण यांना खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर अमोल किर्तीकरांना ईडीने धाडलेलं हे दुसरं समन्स आहे. गेल्या चौकशीला पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे कीर्तीकर गैरहजर राहिले होते. ईडीने अत्यंत शॉर्ट नोटीस देऊन समन्स दिल्याने हजर होण्यात अडचण होत असल्याचं कीर्तीकरांनी पत्रात नमूद केलं होतं. तसेच, वकिलांकडून पत्र देऊन हजर राहण्यासाठी मुदतवाढ मागितल्याचं वकीलांनी सांगितलं होतं.


अमोल कीर्तिकर हे वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार आहेत. या मतदारसंघात अमोल कीर्तीकरांची मोठी ताकद आहे. अशातच त्यांना ईडीचं समन्स आल्याने ठाकरे गटाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.



काय आहे खिचडी घोटाळा?


मुंबई महानगरपालिकेचा १०० कोटींचा कोविड घोटाळा आता समोर आला आहे. गरीब, स्थलांतरीत कामगारांसाठी, ज्यांचे स्वत:चे मुंबईत घर नाही त्यांना लॉकडाऊन काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. भारत सरकारचंही त्याला समर्थन होतं. या स्थलांतरीत कामगारांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट ५२ कंपन्यांना मुंबई महानगरपालिकेने दिलं होतं. सुरुवातीच्या ४ महिन्यात ४ कोटी खिचडी पॅकेट वाटण्यात आले होते, असं मनपाचं म्हणणं आहे. पण यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सध्या चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment

Ganeshotsav 2025: वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने साकारले ५२ फूटी काशी विश्वनाथ मंदिर

मुंबई: दरवर्षी प्रसिध्द मंदिरांची हुबेहुब आरास साकारणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच मराठी चित्रपट ‘अरण्य’ च्या पोस्टरचे अनावरण करण्यात

मुंबईत अंधेरीमध्ये पाच मजली मासळी बाजार बांधणार ?

मुंबई : मुंबईत अंधेरीमध्ये जे. बी. नगर येथे पाच मजली मासळी बाजार बांधण्याचा १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरी

आरक्षणाची लढाई लढावी, पण... नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

मुंबई : जे रक्ताने मराठे असतात ते कधीही आईविषयी अपशब्द वापरणार नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श

मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत मनोज जरांगेंचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना

मरिनड्राईव्हच्या समुद्रात तरुणीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या मरिनड्राईव्ह परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नरिमन पॉईंट येथील समुद्रात एका तरुणीचा