शरद पवारांना धक्का! श्रीनिवास पाटील यांची लोकसभा रिंगणातून माघार

सातारा : विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते श्रीनिवास पाटील (MP Srinivas Patil) यांनी लोकसभा निवडणुकीतून (Lok Sabha Election 2024) माघार घेतली आहे. प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा मतदारसंघात या गोष्टीमुळे मोठे वळण आले आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठकीत श्रीनिवास पाटील यांनी उमेदवारी नाकारल्याची माहिती मिळत आहे. सातारा लोकसभेच्या रिंगणातून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतली आहे.


सातारा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून श्रीनिवास पाटील, सारंग पाटील, बाळासाहेब पाटील, सुनील माने, सत्यजितसिंह पाटणकर यांच्या नावाची चर्चा होती. श्रीनिवास पाटील यांच्याशिवाय सारंग पाटील यांनी देखील निवडणुकीसाठी तयारी सुरु केली होती. श्रीनिवास पाटील यांचा सारंग पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी असा प्रस्तावही मांडला होता. मात्र तब्येत ठीक नसल्यानं मी निवडणूक लढवू इच्छित नाही, असं पाटील यांनी शरद पवारांना कळवलं आहे.


पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत. उमेदवार कोण असावा? याबाबत ते विधानसभा मतदारसंघनिहाय बैठकीत निर्णय घेणार आहेत. आता सातारा लोकसभा निवडणुकीत उमेदवारी कुणाला द्यायची, असा प्रश्न शरद पवार यांच्यासमोर निर्माण झाला आहे. कार्यकर्त्यांनी श्रीनिवास पाटील उभे राहिल्यास त्यांचं काम करु अन्यथा शरद पवारांनी इथून उभं राहावं अशी मागणी केली आहे. लोकसभा निवडणूका तोंडावर आलेल्या असताना श्रीनिवास पाटील यांनी ऐनवेळी घेतलेली माघार शरद पवारांसाठी धक्का ठरली आहे. यापुढे शरद पवार सातारा मतदारसंघासाठी काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

Pune Crime:  घर आवरताना उघड झाला धक्कादायक प्रकार; पुण्यात महिलेचे ११ लाखांचे दागिने गायब

पुणे: पुण्यातील (Pune Crime) एका कुटुंबाला घरातील वस्तू आवरताना मोठा धक्का बसला आहे. कपाटातील दागिने तपासताना लाखो

Akanksha Chaturvedi Sucide : पेपरफुटीचा मानसिक धक्का; नागपुरातील NEET विद्यार्थिनीने संपवले आयुष्य

नागपूर : NEET परीक्षा पेपरफुटी (Paper Leak) प्रकरणामुळे नागपुरातील १८ वर्षीय विद्यार्थिनी आकांक्षा ऊर्फ स्नेहा

Kolhapur Accident : मुंबईला जाण्यासाठी निघाले पण त्याआधीच घडला भयंकर अपघात; एका क्षणात संपलं चौघांचं कुटुंब!

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur Accident) जिल्ह्यातील आजरा तालुक्यात एक भीषण रस्ता अपघात (Road Accident) झाला. या अपघातात एकाच

Wipro Office Religious Harassment : TCS नंतर आता विप्रोही वादाच्या भोवऱ्यात? धर्म बदलण्यास नकार दिल्याने नोकरी गमवावी लागली; पुण्यातील माजी कर्मचारीचा गंभीर आरोप

पुणे : नाशिकमधील TCS कार्यालयात कथित धार्मिक छळ आणि धर्मांतराच्या दबावाच्या आरोपांनंतर आता पुण्यातील आयटी कंपनी

Shrirampur ATS Raid : पाकिस्तानी गँगस्टरच्या सोशल मीडिया नेटवर्कचा महाराष्ट्रात शिरकाव? श्रीरामपूरमध्ये ATS ची मोठी कारवाई, चार जण ताब्यात

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात मोठी कारवाई करत चार संशयितांना

Minister Makarand Jadhav-Patil : राज्यात नवे पुनर्वसन धोरण येणार

मंत्री मकरंद जाधव-पाटील; कालानुरूप सर्व बदल समाविष्ट करणार मुंबई : राज्यातील दरडप्रवण गावांचे कायमस्वरूपी