Sanjay Raut : पाठीत खंजीर खुपसण्यामध्ये संजय राऊतची पीएचडी!

संजय राऊत हा महाराष्ट्राच्या राजकारणातला सूर्याजी पिसाळ


आमदार नितेश राणे यांचा हल्लाबोल


मुंबई : 'आदरणीय प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काल एक्सवर एक ट्विट केलं आहे आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी एक फोटो दाखवला आहे. त्या फोटोत वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit bahujan Aghadi) पाठीत खंजीर खुपसणारा एक व्यक्ती दाखवला आहे आणि त्या व्यक्तीच्या खंजीरवर लिहिलं आहे 'संजय राऊत' (Sanjay Raut). त्यामुळे यावर पुन्हा पुन्हा शिक्कामोर्तब होतंय की, महाराष्ट्राच्या राजकारणातला सूर्याजी पिसाळ हा संजय राजाराम राऊतच आहे', अशी सणसणीत टीका भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात फोडाफोडी करणाऱ्या संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला.


संजय राऊतने आधी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरेंमध्ये (Raj Thackeray) भांडणं लावली, ठाकरेंचं घर फोडलं. त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) साहेबांच्या आमदारांनी जेव्हा उठाव केला की शिवसेना वाचवा तेव्हा त्या चाळीसच्या चाळीस आमदारांचा आणि तेरा खासदारांचा रोष हा संजय राऊतवरच होता. त्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) साहेबांच्या घरी अजित पवारांनी (Ajit Pawar) जी भूमिका घेतली तेव्हाही सगळा रोष संजय राऊतवरच आला आणि आता प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीतही तेच. यानंतर आता काँग्रेसही महाविकास आघाडीच्या बाहेर पडण्याच्या तयारीत आहे, अशी मला खात्री आहे. त्याला देखील संजय राऊतच जबाबदार असणार आहे, असं नितेश राणे म्हणाले.



संजय राऊत संविधानाचा मारेकरी


संजय राऊतने खंजीर खुपसण्यामध्ये पीएचडी केली आहे. तो एकटा खरा आणि बाकी सगळे खोटारडे असं चित्र आहे. एका बाजूने म्हणायचं आम्हाला संविधान वाचवायचंय आणि दुसऱ्या बाजूने प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांच्या घरचे व्यक्ती संजय राऊतलाच म्हणतात की याने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. मग संजय राऊत कोणत्या तोंडाने संविधान वाचवण्याची भाषा करतात? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला. संजय राऊत संविधानाचा मारेकरी आहे यावर प्रकाश आंबेडकरांनीच शिक्कामोर्तब केलं आहे, असं नितेश राणे म्हणाले.


Comments
Add Comment

महाराष्ट्रात १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांची काळजी घ्यावी; पाऊस आणि वाऱ्यापासून पिकांना सुरक्षित ठेवावे मुंबई :

ई-रिक्षां व ई-बाईकसाठीही परमिट (परवाना ) बंधनकारक करण्याचा निर्णय -- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सींसाठी नवीन परमिट देण्याची प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून तात्पुरती स्थगित

Railway LPG Shortage : इंधन संकटाचा रेल्वे खानपान सेवेला फटका; वडापाव-समोसे मेन्यूमधून गायब होणार?

मुंबई : एलपीजीच्या सध्याच्या कमतरतेचा परिणाम रेल्वे स्थानकांमधील रेस्टॉरंट्सवर होऊ लागला आहे, अनेक

येत्या ३१ मार्च २०२६ पूर्वी पाण्याचे बिल न भरल्यास पाण्याची लाइन कापणार

मुंबई: महानगरपालिकेमार्फत नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यात येत असून सर्व जलजोडणीधारकांनी प्रलंबित

स्थापत्य समिती शहर अध्यक्षपदी यामिनी जाधव, उपनगरे समिती अध्यक्षपदी संगिता शर्मा यांची निवड

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या स्थापत्य समिती (शहर) अध्यक्षपदी शिवसेनेच्या यामिनी यशवंत जाधव तर उपाध्यक्षपदी

महापालिका शाळांमध्ये पोषक आहार अद्याप तरी सुरळीतच; संस्थांना सिलिंडर पुरवण्यासाठी रेशनिंग कंट्रोलला महापालिका प्रशासनाच्या सूचना

मुंबई: मुंबईत इंधनाचा तुटवडा जाणवू लागल्यानंतर महापालिका शाळांमध्ये गॅस सिलिंडरमुळे मुलांच्या तोंडची खिचडी