Sanjay Raut : पाठीत खंजीर खुपसण्यामध्ये संजय राऊतची पीएचडी!

संजय राऊत हा महाराष्ट्राच्या राजकारणातला सूर्याजी पिसाळ


आमदार नितेश राणे यांचा हल्लाबोल


मुंबई : 'आदरणीय प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काल एक्सवर एक ट्विट केलं आहे आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी एक फोटो दाखवला आहे. त्या फोटोत वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit bahujan Aghadi) पाठीत खंजीर खुपसणारा एक व्यक्ती दाखवला आहे आणि त्या व्यक्तीच्या खंजीरवर लिहिलं आहे 'संजय राऊत' (Sanjay Raut). त्यामुळे यावर पुन्हा पुन्हा शिक्कामोर्तब होतंय की, महाराष्ट्राच्या राजकारणातला सूर्याजी पिसाळ हा संजय राजाराम राऊतच आहे', अशी सणसणीत टीका भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात फोडाफोडी करणाऱ्या संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला.


संजय राऊतने आधी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरेंमध्ये (Raj Thackeray) भांडणं लावली, ठाकरेंचं घर फोडलं. त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) साहेबांच्या आमदारांनी जेव्हा उठाव केला की शिवसेना वाचवा तेव्हा त्या चाळीसच्या चाळीस आमदारांचा आणि तेरा खासदारांचा रोष हा संजय राऊतवरच होता. त्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) साहेबांच्या घरी अजित पवारांनी (Ajit Pawar) जी भूमिका घेतली तेव्हाही सगळा रोष संजय राऊतवरच आला आणि आता प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीतही तेच. यानंतर आता काँग्रेसही महाविकास आघाडीच्या बाहेर पडण्याच्या तयारीत आहे, अशी मला खात्री आहे. त्याला देखील संजय राऊतच जबाबदार असणार आहे, असं नितेश राणे म्हणाले.



संजय राऊत संविधानाचा मारेकरी


संजय राऊतने खंजीर खुपसण्यामध्ये पीएचडी केली आहे. तो एकटा खरा आणि बाकी सगळे खोटारडे असं चित्र आहे. एका बाजूने म्हणायचं आम्हाला संविधान वाचवायचंय आणि दुसऱ्या बाजूने प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांच्या घरचे व्यक्ती संजय राऊतलाच म्हणतात की याने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. मग संजय राऊत कोणत्या तोंडाने संविधान वाचवण्याची भाषा करतात? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला. संजय राऊत संविधानाचा मारेकरी आहे यावर प्रकाश आंबेडकरांनीच शिक्कामोर्तब केलं आहे, असं नितेश राणे म्हणाले.


Comments
Add Comment

मध्य रेल्वेचा विशेष ट्रॅफिक, पॉवर ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर अर्थात मेन लाईनवर परळ आणि करी रोड स्थानकांदरम्यानच्या प्रभादेवीवरील

Metro : दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९, डायमंड गार्डन ते मंडाले मेट्रो-२ बीचे उद्घाटन ६ एप्रिलला

मुंबई : मुंबईत मेट्रोचे जाळे झपाट्याने पसरत आहे. दरम्यान, आता दोन मेट्रो मार्गिकांचे लोकार्पण पुन्हा लांबणीवर

सात जिल्ह्यांचे कलेक्टर बदलले; २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने बदल्यांचे सत्र सुरू ठेवले असून, गुरुवारी विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे

Mumbai : अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता कारवाई

मुंबई( विशेष प्रतिनिधी) : अनधिकृत बांधकाम केल्यास किंवा त्या बांधकामांवर कारवाई करताना अडथळा आणल्यास

मीरा-भाईंदर क्षेत्रातील रिक्षा परवाने पुनर्तपासणीचे आदेश

मुंबई : मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रिक्षा परवाने व बॅच वितरणाची संपूर्ण पुनर्तपासणी करून १

राज्याच्या महसूल विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार ३५ हजार ८७६ पदांसह प्रशासकीय रचनेत मोठे बदल

मुंबई : राज्यातील महसूल प्रशासनातील कामाचा वाढता व्याप आणि नागरिकांना जलद सेवा मिळावी, या उद्देशाने महसूल