Sanjay Raut : पाठीत खंजीर खुपसण्यामध्ये संजय राऊतची पीएचडी!

संजय राऊत हा महाराष्ट्राच्या राजकारणातला सूर्याजी पिसाळ


आमदार नितेश राणे यांचा हल्लाबोल


मुंबई : 'आदरणीय प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काल एक्सवर एक ट्विट केलं आहे आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी एक फोटो दाखवला आहे. त्या फोटोत वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit bahujan Aghadi) पाठीत खंजीर खुपसणारा एक व्यक्ती दाखवला आहे आणि त्या व्यक्तीच्या खंजीरवर लिहिलं आहे 'संजय राऊत' (Sanjay Raut). त्यामुळे यावर पुन्हा पुन्हा शिक्कामोर्तब होतंय की, महाराष्ट्राच्या राजकारणातला सूर्याजी पिसाळ हा संजय राजाराम राऊतच आहे', अशी सणसणीत टीका भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात फोडाफोडी करणाऱ्या संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला.


संजय राऊतने आधी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरेंमध्ये (Raj Thackeray) भांडणं लावली, ठाकरेंचं घर फोडलं. त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) साहेबांच्या आमदारांनी जेव्हा उठाव केला की शिवसेना वाचवा तेव्हा त्या चाळीसच्या चाळीस आमदारांचा आणि तेरा खासदारांचा रोष हा संजय राऊतवरच होता. त्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) साहेबांच्या घरी अजित पवारांनी (Ajit Pawar) जी भूमिका घेतली तेव्हाही सगळा रोष संजय राऊतवरच आला आणि आता प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीतही तेच. यानंतर आता काँग्रेसही महाविकास आघाडीच्या बाहेर पडण्याच्या तयारीत आहे, अशी मला खात्री आहे. त्याला देखील संजय राऊतच जबाबदार असणार आहे, असं नितेश राणे म्हणाले.



संजय राऊत संविधानाचा मारेकरी


संजय राऊतने खंजीर खुपसण्यामध्ये पीएचडी केली आहे. तो एकटा खरा आणि बाकी सगळे खोटारडे असं चित्र आहे. एका बाजूने म्हणायचं आम्हाला संविधान वाचवायचंय आणि दुसऱ्या बाजूने प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांच्या घरचे व्यक्ती संजय राऊतलाच म्हणतात की याने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. मग संजय राऊत कोणत्या तोंडाने संविधान वाचवण्याची भाषा करतात? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला. संजय राऊत संविधानाचा मारेकरी आहे यावर प्रकाश आंबेडकरांनीच शिक्कामोर्तब केलं आहे, असं नितेश राणे म्हणाले.


Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात