कै.भास्करराव स्मृतिप्रीत्यर्थ शास्त्रीय मैफीलीचे आयोजन

नवी मुंबई : शास्त्रीय संगीताचा वारसा लाभलेले आणि शास्त्रीय संगीताची परंपरा आपल्या गायकीतून निर्माण करणारे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायक पंडित डॉ. प्रकाश संगीत यांनी आपले वडील आणि गुरू, कै. भास्करराव संगीत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रविवार 31 मार्च रोजी, सायंकाळी 6 वाजता, वाशी येथील योग विद्या निकेतनमधे शास्त्राrय संगीत मैफीलीचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध बासरीवादक पं. संतोष संत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.


दरम्यान, ग्वाल्हेर घराण्याची गायकी आत्मसात करण्यासाठी त्यांनी ग्वाल्हेरला जाऊन कुंडल गुरू आणि राजाभैया पूछवाले यांच्याकडे गायकीचे धडे गिरवले. स्वातंत्र्यपूर्व काळात वर्धा या आपल्या मूळ गावी परतल्यानंतर भास्कररावांनी ब्रिटिश सरकारची नोकरी न पत्करता आर्थिक धस सोसून खाजगी शाळेत संगीत अध्यापनाला सुरुवात केली.


1940 साली त्यांनी शिवानंद संगीत विद्यालयाची स्थापना करून संगीत प्रचार आणि प्रसार करत शेकडो विद्यार्थी तयार केले. भास्करराव संगीत सेवाग्रामला, तिथल्या आश्रमवासियांना भजनावली शिकवण्यासाठी जात असत. निस्पृहपणे अनेक वर्षे त्यांनी हे दायित्व स्वीकारून आनंदाने पार पाडले.


सदर कार्यक्रमात पं. डॉ. प्रकाश संगीत स्वत, तसेच त्यांचे सुपुत्र डॉ. चैतन्य शास्त्राrय गायन सादर करणार आहेत. सदर कार्यक्रम विनामुल्य असून अधिक माहितीसाठी नंदिनी नारायणी, मो.नं. 9511649570 यांच्याशी संपर्क साधावा.

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : शेती, शेतरस्त्याच्या भांडणात आता ई-मेलवर मिळालेली नोटीस ग्राह्य

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय; बाधित शेतकऱ्यांना मिळणार 'मोफत' पोलीस संरक्षण मुंबई : ग्रामीण

Devendra Fadnavis : नीती आयोगाच्या निर्देशांकांवर पुढील ४ वर्षांत परिणामकारक कामाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल

Pavana Dam : पवना धरण ९३ टक्क्यांहून अधिक भरले; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मावळ : मावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

Ashadhi Wari Charan Seva : ‘चरणसेवा’ने जपले लाखो वारकऱ्यांचे आरोग्य; १४ जिल्ह्यांतील ४.९६ लाख वारकऱ्यांना थेट लाभ

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या उपक्रमाचा २४ जुलै रोजी समारोप; १४०

Maharashtra Cyber ​​Cell : महाराष्ट्र सायबर सेल कात टाकणार

- केंद्र सरकारच्या धर्तीवर 'हायटेक' रचना; सर्व यंत्रणा येणार एका छताखाली मुंबई : वाढत्या सायबर गुन्ह्यांवर वेगाने

Nitesh Rane : चिपी विमानतळाला जलमार्गांनी जोडणार

मंत्री नितेश राणे यांची घोषणा; १५ ऑगस्टपासून नवी मुंबई-चिपी विमानसेवा सुरू होणार मुंबई : "सिंधुदुर्ग जिल्ह्याचा