Travel Destination: एप्रिलमध्ये फिरण्यासाठी हे हिल स्टेशन आहेत बेस्ट

मुंबई: एप्रिल महिन्यात उन्हाच्या झळा कडक होतात. याचमुळे अनेक जण थंड वातावरण असलेल्या ठिकाणी जाणे पसंत करतात. मात्र अनेकदा सुट्ट्यांमुळे आणि बजेटच्या कारणामुळे जाऊ शकत नाहीत. तुम्हीही या उन्हाळ्यात थंड वातावरण असलेल्या ठिकाणी जाण्याचा विचार करत आहेत तर बजेट फ्रेंडली हिल स्टेशन तुम्हाला सांगत आहे. उन्हाळा हा असा ऋतू आहे जेव्हा मुलांचे आई-वडील टेन्शन फ्री असतात कारण त्यांना सुट्टी असते आणि अशा वेळेस कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लान बनवता येतो.


दक्षिण भारतातील सुंदर डोंगराळ भाग म्हणजे उटी त्याला उधागमंडलम असेही म्हटले जाते. ते तामिळनाडूच्या निलगिरी पर्वतरागांमध्ये स्थित आहे. तेथील थंड आणि आल्हाददायक वातावरणामुळे संपूर्ण वर्षभर या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते. येथील हिरवळ आणि उंचच उंच पर्वतांची सुंदरता यामुळे पर्यटक या ठिकाणी आकर्षित होतात.



कूर्ग


कूर्ग हे सुंदर शहर कर्नाटक राज्यात स्थित आहे. येथे धबधबे, डोंगराळ भाग, कॉफीच्या बागा प्रसिद्ध आहेत. येथे तुम्ही कॉफीच्या बागांमध्ये फिरू शकता. येथे ट्रेकिंग, कँपिंग आणि रिव्हर राफ्टिंग यासारखे गेम्सही आहेत. कोडगू येथे फिरण्यासाठी योग्य काळ हा ऑक्टोबर ते जून पर्यंत आहे.



मुन्नार


केरळमधील मुन्नार हे अतिशय प्रसिद्ध आणि पर्यटकाच्या आकर्षणाचे ठिकाण आहे. येथील चहाचे मळे अतिशय प्रसिद्ध आहेत. याशिवाय डोगरांमध्ये ट्रेकिंग करण्याची मजाच काही वेगळी असते. मु्न्नारला भेट देण्याची योग्य वेळ ही सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत आणि जानेवारी ते मेपर्यंत आहे. यावेळेस येथील वातावरण अतिशय आल्हाददायक असते. येथील जवळचे विमानतळ कोची आहे आणि रेल्वे स्टेशन एर्नाकुलम आहे.

Comments
Add Comment

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि