आपल्या वडिलांच्या स्मृतिदिनी, स्व. सिंधुताई सपकाळ यांच्या द मदर ग्लोबल फाऊंडेशन या अनाथ आश्रमाला आर्थिक देणगी!

नवी मुंबई(प्रतिनिधी)- मरावे परी कर्तिरूपी जगावे या प्रमाणे करावे गावातील. दयानंद भास्कर तांडेल यांनी आपले वडील कै. भास्कर तुकाराम तांडेल यांच्या पाचव्या स्मृतिदिनी अनाथांची माय स्व. सिंधुताई सपकाळ यांच्या द मदर ग्लोबल फाऊंडेशन या अनाथ आश्रमाला रु.१२१२१२/- देणगी स्वरूपात देऊन, आपल्या वडिलांच्या सामाजिक कार्याच्या वसा पुढे सुरू ठेवला आहे. बेलापुर पट्टीतील करावे या गावाची धार्मिक, वारकरी संप्रदाय व संस्कृतिक अशी ओळख आहे. त्यातच तांडेल कुटुंब धार्मिक, सामजिक शैक्षणिक कार्यासाठी परिचित आहे.


कै. भास्कर तुकाराम तांडेल यांच्या सामजिक कामाचा वसा हा त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलगा दयानंद तांडेल यांनी पुढे चालू ठेवला आहे. आपल्या वडिलांच्या पाचव्या स्मृतिदिन निमित्त त्यांना अनाथांची माय म्हणून ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळयांच्या द मदर ग्लोबल फाऊंडेशन या अनाथ आश्रमाला रु.१२१२१२/- देणगी स्वरूपात दिली.


यावेळी स्व. सिंधुताई सपकाळ यांचे चिरंजीव श्री. विनय सिंधुताई सपकाळ, स्थानिक नगरसेवक विनोद म्हात्रे, सिडको एम्प्लॉईज युनियनचे माजी अध्यक्ष निलेश तांडेल, समाजसेवक सुभाष म्हात्रे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : शेती, शेतरस्त्याच्या भांडणात आता ई-मेलवर मिळालेली नोटीस ग्राह्य

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय; बाधित शेतकऱ्यांना मिळणार 'मोफत' पोलीस संरक्षण मुंबई : ग्रामीण

Devendra Fadnavis : नीती आयोगाच्या निर्देशांकांवर पुढील ४ वर्षांत परिणामकारक कामाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल

Pavana Dam : पवना धरण ९३ टक्क्यांहून अधिक भरले; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मावळ : मावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

Ashadhi Wari Charan Seva : ‘चरणसेवा’ने जपले लाखो वारकऱ्यांचे आरोग्य; १४ जिल्ह्यांतील ४.९६ लाख वारकऱ्यांना थेट लाभ

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या उपक्रमाचा २४ जुलै रोजी समारोप; १४०

Maharashtra Cyber ​​Cell : महाराष्ट्र सायबर सेल कात टाकणार

- केंद्र सरकारच्या धर्तीवर 'हायटेक' रचना; सर्व यंत्रणा येणार एका छताखाली मुंबई : वाढत्या सायबर गुन्ह्यांवर वेगाने

Nitesh Rane : चिपी विमानतळाला जलमार्गांनी जोडणार

मंत्री नितेश राणे यांची घोषणा; १५ ऑगस्टपासून नवी मुंबई-चिपी विमानसेवा सुरू होणार मुंबई : "सिंधुदुर्ग जिल्ह्याचा