Savitri Jindal: काँग्रेस पक्षाला आणखी एक भगदाड! भारतातील सर्वात श्रीमंत महिलेने सोडला पक्ष

चंदीगढ : लोकसभा निवडणूकीच्या (Loksabha Election) पाशर्वभूमीवर बडे-बडे नेते काँग्रेस (congress) पक्षाची साथ सोडून देत आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्ष चांगलाच अडचणीत सापडला आहे. त्यातच आता भारतातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल (savitri jindal) यांनीदेखील काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे.


नुकतेच काँग्रेस नेते नवीन जिंदाल यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपाकडून त्यांना कुरुक्षेत्र मतदारसंघातून उमेदवारीही दिली आहे. तर आता नवीन जिंदाल यांची आई सावित्री जिंदाल यांनी काँग्रेस पक्षाचा सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेस पक्ष सोडून दिला आहे. अशी माहिती सावित्री जिंदाल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.


''मी १० वर्षे आमदार म्हणून हिसारच्या जनतेचे प्रतिनिधित्व केले आणि मंत्री म्हणून नि:स्वार्थपणे हरियाणा राज्याची सेवा केली. हिसारची जनता हे माझे कुटुंब आहे आणि माझ्या कुटुंबाच्या सल्ल्यानुसार मी आज काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. काँग्रेस नेतृत्वाच्या पाठिंब्याबद्दल आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचा मी सदैव ऋणी राहीन ज्यांनी मला नेहमीच पाठिंबा आणि आदर दिला'', असे सावित्री जिंदाल यांनी सांगितले.




Comments
Add Comment

S-400 Air Defence Systems : भारतीय हवाई दलाची ताकद वाढणार! रशियाकडून आणखी ५ 'S-४००' आणि 'पँटसिर' क्षेपणास्त्र प्रणाली खरेदीला मंजुरी

नवी दिल्ली : मध्य-पूर्व आशियात सध्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि 'कामिकाझे' (Kamikaze) ड्रोनचा वापर करून युद्ध पेटलेले

Gujrat Viral Video : काळ आला होता पण वेळ...गुजरातच्या वलसाडमधील लिफ्टचा भीषण अपघात; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

वलसाड : गुजरातच्या वलसाड येथील 'सरदार हाईट्स' या गुजरात हाऊसिंग बोर्ड संकुलात आज सकाळी काळजाचा ठोका चुकवणारी एक

पश्चिम आशियातील संघर्षावर भारताने दिली अधिकृत प्रतिक्रिया

नवी दिल्ली : इराण आणि आखाती प्रदेशात २८ फेब्रुवारी २०२६ पासून संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष सुरू झाल्याचे समजताच

मध्य पूर्वेतल्या बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत ऊर्जेसंदर्भात पूर्णपणे सज्ज

विविध स्रोतांकडून कच्चे तेल आणि पेट्रोलियम खरेदी, पुरवठ्याच्या स्थितीवर देखरेखीसाठी 24×7 नियंत्रण कक्ष नवी

पुँछमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

नवी दिल्ली : भारतीय शौर्याचे प्रतीक आणि कोट्यवधी भारतीयांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य

खामेनींच्या मृत्यूनंतर भारतात हाय अलर्ट, जम्मू काश्मीरमध्ये बंदोबस्तात वाढ

नवी दिल्ली : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आणि भारतात हाय अलर्ट जाहीर झाला आहे.