Savitri Jindal: काँग्रेस पक्षाला आणखी एक भगदाड! भारतातील सर्वात श्रीमंत महिलेने सोडला पक्ष

चंदीगढ : लोकसभा निवडणूकीच्या (Loksabha Election) पाशर्वभूमीवर बडे-बडे नेते काँग्रेस (congress) पक्षाची साथ सोडून देत आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्ष चांगलाच अडचणीत सापडला आहे. त्यातच आता भारतातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल (savitri jindal) यांनीदेखील काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे.


नुकतेच काँग्रेस नेते नवीन जिंदाल यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपाकडून त्यांना कुरुक्षेत्र मतदारसंघातून उमेदवारीही दिली आहे. तर आता नवीन जिंदाल यांची आई सावित्री जिंदाल यांनी काँग्रेस पक्षाचा सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेस पक्ष सोडून दिला आहे. अशी माहिती सावित्री जिंदाल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.


''मी १० वर्षे आमदार म्हणून हिसारच्या जनतेचे प्रतिनिधित्व केले आणि मंत्री म्हणून नि:स्वार्थपणे हरियाणा राज्याची सेवा केली. हिसारची जनता हे माझे कुटुंब आहे आणि माझ्या कुटुंबाच्या सल्ल्यानुसार मी आज काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. काँग्रेस नेतृत्वाच्या पाठिंब्याबद्दल आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचा मी सदैव ऋणी राहीन ज्यांनी मला नेहमीच पाठिंबा आणि आदर दिला'', असे सावित्री जिंदाल यांनी सांगितले.




Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे