मुंबई : २४ मार्च रोजी होलिका दहनानंतर संपूर्ण देशात २५ मार्च रोजी होळी खेळली जात आहे. संपूर्ण देश होळीच्या रंगात रंगत आहेत. परंतु, भारतातील अशा काही भागात २५ मार्चऐवजी २६मार्च रोजी होळी खेळली जाते.
बिहारमध्ये २४ मार्चला होलिका दहन झाले, मात्र तिथे २६ मार्चला रंगांची होळी साजरी केली जाईल. २५ मार्चला जवळपास अर्धा दिवस पौर्णिमा तिथी असेल. त्यामुळे उदय तिथीनुसार चैत्र प्रतिपदा तिथी २६ मार्चला येणार आहे. त्यामुळे बिहारमध्ये प्रत्यक्षात त्याच दिवशी होळी खेळली जाणार असल्याचे हिंदू धर्मातील जाणकारांचे म्हणणे आहे.
बिहारशिवाय, उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये मंगळवारी २६ मार्चला होळी साजरी केली जाणार आहे. तर होलिका दहन येथे २४ मार्च रोजी करण्यात आले आहे. २५ मार्चला संपूर्ण देशात धुलिवंदनात साजरा होत असताना, दरवर्षीप्रमाणे यंदाही गोरखपूरमध्ये होलिकोत्सव एक दिवसानंतर म्हणजेच २६ मार्चला होणार आहे.
ज्योतिषींनी सांगितल्याप्रमाणे, होलिका दहन फाल्गुन शुक्ल पौर्णिमा २४ मार्च रविवारी रात्री १०.२७ नंतर केले गेले. सोमवार २५ मार्च रोजी सकाळी ११.३१ नंतर पौर्णिमा तिथी पडेल. अशा स्थितीत चैत्र शुक्ल पक्षातील सूर्योदय व्याप्पिनी प्रतिपदा तिथीला दैनंदिन कामातून संन्यास घेऊन पितरांचे स्मरण करून वंदन केल्याने सर्व प्रकारच्या दु:खापासून मुक्ती मिळते. मंगळवार २६ मार्च रोजी चैत्र कृष्ण पक्षाच्या दिवशी सूर्योदयावेळी प्रतिपदा तिथी प्राप्त झाल्यामुळे गोरखपूरमध्ये पहाटेपासून दिवसभर होळी साजरी केली जाईल. बिहार आणि गोरखपूर तसेच काशीच्या पंचांगानुसार २६ मार्चला होळी खेळली जाईल.
सिंधू नदीला पाकिस्तानची लाईफलाईन समजले जाते. अरबी समुद्राला जाऊन मिळणारी सिंधू नदी पाकिस्तानातील अनेक राज्यांमधून…
उन्हाळ्यात थंडावा देण्यासाठी आपल्या घरातली बाग किंवा कुंड्यांमधली झाडं मदत करतात. पण या उन्हाच्या झळा…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी गोळीबार करुन २६ पर्यटकांना ठार…
नवी दिल्ली/वॉशिंग्टन : पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही संताप उसळला आहे.…
उन्हाळा आला की आपल्याला आहारात बदल करावा लागतो. त्यात मधुमेहींना आणखी बंधनं असतात. कारण, रक्तातली…
सिंधू नदीला पाकिस्तानची लाईफलाईन समजले जाते. अरबी समुद्राला जाऊन मिळणारी सिंधू नदी पाकिस्तानातील अनेक राज्यांमधून…