देशातील या भागात २६ तारखेला साजरी होणार होळी; जाणून घ्या कारण

  40

मुंबई : २४ मार्च रोजी होलिका दहनानंतर संपूर्ण देशात २५ मार्च रोजी होळी खेळली जात आहे. संपूर्ण देश होळीच्या रंगात रंगत आहेत. परंतु, भारतातील अशा काही भागात २५ मार्चऐवजी २६मार्च रोजी होळी खेळली जाते.



बिहारमध्ये २४ मार्चला होलिका दहन झाले, मात्र तिथे २६ मार्चला रंगांची होळी साजरी केली जाईल. २५ मार्चला जवळपास अर्धा दिवस पौर्णिमा तिथी असेल. त्यामुळे उदय तिथीनुसार चैत्र प्रतिपदा तिथी २६ मार्चला येणार आहे. त्यामुळे बिहारमध्ये प्रत्यक्षात त्याच दिवशी होळी खेळली जाणार असल्याचे हिंदू धर्मातील जाणकारांचे म्हणणे आहे.


बिहारशिवाय, उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये मंगळवारी २६ मार्चला होळी साजरी केली जाणार आहे. तर होलिका दहन येथे २४ मार्च रोजी करण्यात आले आहे. २५ मार्चला संपूर्ण देशात धुलिवंदनात साजरा होत असताना, दरवर्षीप्रमाणे यंदाही गोरखपूरमध्ये होलिकोत्सव एक दिवसानंतर म्हणजेच २६ मार्चला होणार आहे.


ज्योतिषींनी सांगितल्याप्रमाणे, होलिका दहन फाल्गुन शुक्ल पौर्णिमा २४ मार्च रविवारी रात्री १०.२७ नंतर केले गेले. सोमवार २५ मार्च रोजी सकाळी ११.३१ नंतर पौर्णिमा तिथी पडेल. अशा स्थितीत चैत्र शुक्ल पक्षातील सूर्योदय व्याप्पिनी प्रतिपदा तिथीला दैनंदिन कामातून संन्यास घेऊन पितरांचे स्मरण करून वंदन केल्याने सर्व प्रकारच्या दु:खापासून मुक्ती मिळते. मंगळवार २६ मार्च रोजी चैत्र कृष्ण पक्षाच्या दिवशी सूर्योदयावेळी प्रतिपदा तिथी प्राप्त झाल्यामुळे गोरखपूरमध्ये पहाटेपासून दिवसभर होळी साजरी केली जाईल. बिहार आणि गोरखपूर तसेच काशीच्या पंचांगानुसार २६ मार्चला होळी खेळली जाईल.

Comments
Add Comment

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र

PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेत आता मिळणार इतके व्याज, सरकारने केली घोषणा

नवी दिल्ली: भारत सरकारने स्मॉल सेव्हिंग स्कीम्सवरील व्याजदर कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेत आतापर्यंत

व्होट जिहादचे उत्तर हिंदूंनी एकत्रितपणे दिले : डॉ. विखे

अ.नगर : आ.संग्राम जगताप हे एक हिंदुत्वाचा विचार आहे.त्यांना समर्थन देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहे.माझ्या

नांदगाव राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

माजी नगरसेवक वाल्मीक टिळेकर यांचा शेकडो सर्मथकांसह शिवसेनेत प्रवेश नांदगाव : नांदगाव नगरपालिकेचे राष्ट्रवादी