देशातील या भागात २६ तारखेला साजरी होणार होळी; जाणून घ्या कारण

मुंबई : २४ मार्च रोजी होलिका दहनानंतर संपूर्ण देशात २५ मार्च रोजी होळी खेळली जात आहे. संपूर्ण देश होळीच्या रंगात रंगत आहेत. परंतु, भारतातील अशा काही भागात २५ मार्चऐवजी २६मार्च रोजी होळी खेळली जाते.



बिहारमध्ये २४ मार्चला होलिका दहन झाले, मात्र तिथे २६ मार्चला रंगांची होळी साजरी केली जाईल. २५ मार्चला जवळपास अर्धा दिवस पौर्णिमा तिथी असेल. त्यामुळे उदय तिथीनुसार चैत्र प्रतिपदा तिथी २६ मार्चला येणार आहे. त्यामुळे बिहारमध्ये प्रत्यक्षात त्याच दिवशी होळी खेळली जाणार असल्याचे हिंदू धर्मातील जाणकारांचे म्हणणे आहे.


बिहारशिवाय, उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये मंगळवारी २६ मार्चला होळी साजरी केली जाणार आहे. तर होलिका दहन येथे २४ मार्च रोजी करण्यात आले आहे. २५ मार्चला संपूर्ण देशात धुलिवंदनात साजरा होत असताना, दरवर्षीप्रमाणे यंदाही गोरखपूरमध्ये होलिकोत्सव एक दिवसानंतर म्हणजेच २६ मार्चला होणार आहे.


ज्योतिषींनी सांगितल्याप्रमाणे, होलिका दहन फाल्गुन शुक्ल पौर्णिमा २४ मार्च रविवारी रात्री १०.२७ नंतर केले गेले. सोमवार २५ मार्च रोजी सकाळी ११.३१ नंतर पौर्णिमा तिथी पडेल. अशा स्थितीत चैत्र शुक्ल पक्षातील सूर्योदय व्याप्पिनी प्रतिपदा तिथीला दैनंदिन कामातून संन्यास घेऊन पितरांचे स्मरण करून वंदन केल्याने सर्व प्रकारच्या दु:खापासून मुक्ती मिळते. मंगळवार २६ मार्च रोजी चैत्र कृष्ण पक्षाच्या दिवशी सूर्योदयावेळी प्रतिपदा तिथी प्राप्त झाल्यामुळे गोरखपूरमध्ये पहाटेपासून दिवसभर होळी साजरी केली जाईल. बिहार आणि गोरखपूर तसेच काशीच्या पंचांगानुसार २६ मार्चला होळी खेळली जाईल.

Comments
Add Comment

'राजा शिवाजी' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मोठी घटना! दिग्दर्शक रितेश देशमुखने दिलेले वचन केले पूर्ण

सातारा: अभिनेता रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' या आगामी चित्रपटाच्या दरम्यान एका कलाकाराचा मृत्यू झाला. सौरभ शर्मा

बुद्धिबळ जगताला धक्का, ग्रँडमास्टर डॅनियल नारोडित्स्की यांचे २९व्या वर्षी निधन

शार्लोट चेस सेंटर : प्रसिद्ध अमेरिकन बुद्धिबळ ग्रँडमास्टर आणि ऑनलाइन प्रशिक्षक डॅनियल नारोडित्स्की यांचे

दह्यात मिसळा ही एकच गोष्ट, खराब कोलेस्टेरॉल होईल झटक्यात कमी

How To Control Bad Cholesterol: आजच्या धावपळीच्या आणि असंतुलित आहाराच्या जीवनशैलीमुळे अनेकांना आरोग्यविषयक समस्या भेडसावत आहेत.

बिर्याणी पडली महागात! ग्राहकाने केली हॉटेल मालकाची हत्या, वाचा सविस्तर

झारखंड: रांचीमध्ये एक अशी घटना घडली आहे, जी कळताच तुम्हाला धक्का बसेल. शाकाहारी बिर्याणी ऐवजी मांसाहारी बिर्याणी

‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Marathi Movie: ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’ आणि ‘फसक्लास दाभाडे’ या चित्रपटांच्या प्रचंड यशानंतर निर्माती क्षिती

शरद पवारांच्या पक्षाला मोठा धक्का, उपाध्यक्षांचा आकस्मिक मृत्यू

चाळीसगाव : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजीव देशमुख (राजू