LokSabha Election 2024: माजी हवाईदल प्रमुख आरकेएस भदौरिया यांचा भाजपात प्रवेश

नवी दिल्ली: जसजसे निवडणूक जवळ येत आहे तसतसे नेते तसेच अधिकाऱ्यांचे पक्षप्रवेश वाढत चालले आहेत. आज रविवारी २४ मार्चला हवाईदलाचे माजी प्रमुख आरकेएस भदौरिया आणि वायएसआर काँग्रेस पक्षाचे नेते वरप्रसाद राव वेल्लापल्ली हे भारतीय जनता पक्षात(BJP) सामील झाले.


दोघांनीही केंद्रीय मंत्री अनुराग सिंग ठाकूर आणि भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. या निमित्ताने वरप्रसादर राव वेल्लापल्ली म्हणाले की त्यांना गर्व आहे की त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. त्यांनी यावेळी पंतप्रधान मोदींच्या कार्यशैलीचे कौतुक केले.


आरकेएस भदौरिया म्हणाले, मोदींच्या नेतृत्वात भारतातील लोकांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. मोदींचे अद्भुत नेतृत्व विकसित भारत बनवण्यास मदत करेल. या निमित्त अनुराग सिंग ठाकूर यांनी माजी हवाईदल प्रमुख आरकेएस भदौरिया आणि वारा प्रसाद राव यांचे जगातील सर्वात मोठ्या पक्षात स्वागत केले.


भदौरिया हे २०१९ ते २०२१ या कालावधीदरम्यान हवाई दलाच्या प्रमुख पदावर तैनात होते. दरम्यान, अशी चर्चा रंगत आहे की भदौरिया यांना भाजपकडून गाझियाबाद लोकसभेचे तिकीट दिले जाऊ शकते. कारण भाजपने पश्चिम उत्तर प्रदेशातील गाझियाबाद आणि मेरठ येथून लोकसभेसाठी उमेदवाराची घोषणा केलेली नाही.

Comments
Add Comment

Barabanki Road Accident : वेगमर्यादेचा बळी! बाराबंकीत ट्रक-अर्टिगाच्या धडकेत ६ ठार, ८ गंभीर जखमी; कारचा अक्षरशः चक्काचूर!

बाराबंकी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बाराबंकी (Barabanki) जिल्ह्यात सोमवारी रात्री भीषण रस्ते अपघात झाल्याची घटना समोर

Bengaluru News : क्रूरतेचा कळस! मोलकरणीनं लिफ्टमध्ये कुत्र्याच्या पिल्लाला आपटून संपवलं; मोलकरणीचं खोटं नाटक CCTV फूटेजमुळे उघड

बंगळुरु : कर्नाटकची राजधानी बंगळुरु (Bengaluru) येथील बागलूर (Bagaluru) मधील एका अपार्टमेंटमध्ये मुक्या जनावरासोबत अतिशय

Naxalite Surrender : 'सुनीता'चा माओवादी संघटनेला रामराम! १४ लाखांचे इनाम असलेली महिला नक्षलवादी अखेर शरण

बालाघाट : नक्षलग्रस्त भागातून एक मोठी आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) बालाघाट

राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला, तर कंत्राटदाराला दंड; केंद्र सरकारचा निर्णय

निर्धारित कालावधीत एकापेक्षा जास्त अपघात झाल्यास होणार कारवाई नवी दिल्ली  : रस्ते अपघात आणि मृत्यू रोखण्यासाठी,

'पप्पू, टप्पू आणि अप्पू' - महाआघाडी म्हणजे गांधीजींची तीन माकडं!

योगी आदित्यनाथ यांचा बिहारमधून राहुल, तेजस्वी, अखिलेशवर हल्लाबोल दरभंगा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या

राहुल गांधींनी केला छठी मैय्याचा अपमान; बिहारमध्ये प्रचंड बहुमताने एनडीए सरकार स्थापन होईल - अमित शाह

पाटणा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी शेओहर आणि सीतामढी जिल्ह्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)