तांब्याच्या बाटलीतील पाणी पिणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या याचे फायदे आणि नुकसान

  215

मुंबई: आजकाल बाजारात विविध प्रकारच्या पाण्याच्या बाटल्या मिळतात ज्यात सर्वाधिक वापर हा प्लास्टिकच्या बाटल्यांचा असतो. मात्र प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे अनेकजण प्लास्टिकच्या बाटलीऐवजी तांब्याच्या बाटलीचा पर्याय निवडतात. मात्र तुम्हाला याचे फायदे आणि नुकसान माहीत आहे का?



जाणून घ्या फायदे


तांब्याच्या बाटलीतून पाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. तांब्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरसचे गण अधिक असतात जे रोगांपासून लढण्यास मदत करतात. याशिवाय तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने त्वचा आणि केसांना खूप फायदा होतो. हृदयरोगापासून बचाव होतो. पचनक्रिया सुरळीत होते. सोबतच आपण दिवसभर एनर्जेटिक राहतो.



जाणून घ्या नुकसान


तांब्याच्या बाटलीतून पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असते मात्र अनेकदा ही नीट स्वच्छ केली नाही तर उल्टी अथवा पोटाची समस्या जाणवते. गर्भवती महिलांनी तांब्याच्या भांड्यातून पाणी पिऊ नये. जर तुम्हाला कोणती अॅलर्जी असेल तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. जास्त वेळ तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवू नका. ८ ते १२ तासच पाणी त्या बाटलीत ठेवा.

Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी