मुंबई: आजकाल बाजारात विविध प्रकारच्या पाण्याच्या बाटल्या मिळतात ज्यात सर्वाधिक वापर हा प्लास्टिकच्या बाटल्यांचा असतो. मात्र प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे अनेकजण प्लास्टिकच्या बाटलीऐवजी तांब्याच्या बाटलीचा पर्याय निवडतात. मात्र तुम्हाला याचे फायदे आणि नुकसान माहीत आहे का?
तांब्याच्या बाटलीतून पाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. तांब्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरसचे गण अधिक असतात जे रोगांपासून लढण्यास मदत करतात. याशिवाय तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने त्वचा आणि केसांना खूप फायदा होतो. हृदयरोगापासून बचाव होतो. पचनक्रिया सुरळीत होते. सोबतच आपण दिवसभर एनर्जेटिक राहतो.
तांब्याच्या बाटलीतून पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असते मात्र अनेकदा ही नीट स्वच्छ केली नाही तर उल्टी अथवा पोटाची समस्या जाणवते. गर्भवती महिलांनी तांब्याच्या भांड्यातून पाणी पिऊ नये. जर तुम्हाला कोणती अॅलर्जी असेल तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. जास्त वेळ तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवू नका. ८ ते १२ तासच पाणी त्या बाटलीत ठेवा.
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…