तांब्याच्या बाटलीतील पाणी पिणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या याचे फायदे आणि नुकसान

मुंबई: आजकाल बाजारात विविध प्रकारच्या पाण्याच्या बाटल्या मिळतात ज्यात सर्वाधिक वापर हा प्लास्टिकच्या बाटल्यांचा असतो. मात्र प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे अनेकजण प्लास्टिकच्या बाटलीऐवजी तांब्याच्या बाटलीचा पर्याय निवडतात. मात्र तुम्हाला याचे फायदे आणि नुकसान माहीत आहे का?



जाणून घ्या फायदे


तांब्याच्या बाटलीतून पाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. तांब्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरसचे गण अधिक असतात जे रोगांपासून लढण्यास मदत करतात. याशिवाय तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने त्वचा आणि केसांना खूप फायदा होतो. हृदयरोगापासून बचाव होतो. पचनक्रिया सुरळीत होते. सोबतच आपण दिवसभर एनर्जेटिक राहतो.



जाणून घ्या नुकसान


तांब्याच्या बाटलीतून पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असते मात्र अनेकदा ही नीट स्वच्छ केली नाही तर उल्टी अथवा पोटाची समस्या जाणवते. गर्भवती महिलांनी तांब्याच्या भांड्यातून पाणी पिऊ नये. जर तुम्हाला कोणती अॅलर्जी असेल तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. जास्त वेळ तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवू नका. ८ ते १२ तासच पाणी त्या बाटलीत ठेवा.

Comments
Add Comment

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे