चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट, ४ मुलांचा मृत्यू, आई-वडील गंभीर जखमी

लखनऊ: उत्तर प्रदेशातील मेरठ येथे एका घरात मोबाईल चार्ज करताना शॉर्ट सर्किट झाल्याने मोठा अपघात घडला. शॉट सर्किट झाल्यानंतर मोबाईलचा स्फोट झाला. यामुळे घरात आग लागली आणि ६ जणांचे कुटुंब गंभीररित्या होरपळले. यात दुर्घटनेत ४ मुलांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची स्थिती गंभीर आहे. ही घटना पल्लवपुरम ठाणे क्षेत्रातील जनता कॉलनीमध्ये घडली. शनिवारी रात्री ही दुर्घटना घडली.



मोबाईलच्या स्फोटाने चार मुलांचा मृत्यू


मूळचा मुझ्झफरनगर येथे राहणारे जॉनीचे कुटुंब जनता कॉलनीमध्ये भाड्याच्या घरात राहत होते. तो वेठबिगारीच्या कामाला होता. होळीमुळे शनिवारी तो घरीच होता. त्याची पत्नी बबिता जेवण बनवत होती. त्यांची मुलगी सारिका(१०), निहारिका(८), मुलगा गोलू(६) आणि मुलगा कालू(५) खोलीत होते.


या खोलीच्या बोर्डावर मोबाईल चार्जिंगला लावला होता. विजेच्या बोर्डामध्ये लावलेल्या चार्जरमध्ये अचानक शॉट सर्किट झाले आणि ठिणगी उडून तेथील बेडवर पडली आणि आग लागली. आगीने लगेचच विक्राळ रूप धारण केले. आगीने वेढल्याने बबिता, सारिका आणि जॉनी यांनी मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र ते या आगीत गंभीररित्या होरपळले.


जोरजोरात आवाज ऐकून शेजारी आले. सर्वांना एक एक करून बाहेर काढले. सर्वांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथून त्यांना मेरठच्या लाल लजपतराय मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले.



आई-वडिलांची प्रकृती गंभीर


उपचारादरम्यान मेडिकल कॉलेजमध्ये निहारिक आणि कालू यांनी प्राण सोडले. बाकी सर्वांवर उपचार सुरू होते.मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृ्त्यू झाला. पत्नी-पतीची स्थिती नाजूक झाली आहे.

Comments
Add Comment

Hindu religion : धर्मांतरित हिंदूंच्या मनात जर खरी श्रद्धा असेल, तर त्यांना मंदिरात प्रवेश करण्याचा आणि पूजा करण्याचा अधिकार

नवी दिल्ली : जर एखादी व्यक्ती जन्माने हिंदू (Hindu) नसतानाही तिला मंदिरात प्रवेश नाकारला जाऊ शकतो का? याबाबत ती

थायलंडमध्ये भारतीय युद्धनौकांचा संयुक्त सराव; सागरी सुरक्षेसाठी वाढला समन्वय

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील आयएनएस उदयगिरी, आयएनएस शक्ती आणि आयएनएस कवरत्ती या युद्धनौकांनी

अरुणाचल प्रदेशात ढगफुटी आणि भूस्खलन; १४ गावांतील ३१०० हून अधिक नागरिक बाधित

इटानगर : अरुणाचल प्रदेशातील लोअर सियांग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या ढगफुटी आणि भूस्खलनामुळे

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी