मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी अटक झाली. लवकरच मानेला पट्टा लावणाऱ्याला अटक झाली, तर आश्चर्य वाटण्याची गरज नसल्याचा हल्लाबोल आमदार नितेश राणे यांनी केला. याबाबतचे ट्विटही राणे यांनी सोशल मीडियावर केले.
आमदार राणे म्हणाले की, दिल्ली सरकारच्या मद्यधोरण गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने गुरुवारी रात्री आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. या प्रकरणी संजय राऊत यांनी सकाळी भाजपा नेत्यांवर आगपाखड केली आहे. त्याला राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राणे यांनी केजरीवाल यांच्या मातोश्रीवरील भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. केजरीवाल यांची भेट कशासाठी होती? असा सवाल करत ती भेट राजकीय होती की, मद्य घोटाळ्यात मातोश्री कनेक्शन दडले होते? असा आरोप राणे यांनी केला.
महाविकास आघाडीचे सरकार असताना दिल्ली सरकारने मद्यधोरणावर शिक्कामोर्तब केले होते. तेव्हा उद्धव ठाकरे सरकारने राज्यात ५० टक्के कर सवलत जाहीर केली होती. त्यामुळे मातोश्रीच्या भेटीत खोक्यांची की कंटेनरची चर्चा झाली? असा सवालही राणे यांनी उपस्थित केला. तसेच मद्य घोटाळ्याचे मातोश्री कनेक्शन काय आहे? याचे उत्तर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी द्यावे, असे आव्हान राणे यांनी दिले.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…