बदलत्या हवामानात स्वत:ला हायड्रेट ठेवणे गरजेचे, डिहायड्रेशन टाळण्यासाठी लावा या सवयी

  87

मुंबई: बदलत्या हवामानात आपण अनेकदा पाणी कमी पितो आणि यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होतो. यामुळे आपल्या आरोग्यास नुकसान पोहोचते. डिहायड्रेशनपासून वाचायचे असेल तर काही सवयी आजच लावून घ्यायला हव्या.


पुरुषांनी कमीत कमी ३.७ लिटर लिक्विड घेणे गरजेचे असते तर महिलांनी २.६ लीटर, जर तुमचे पाणी पिण्याचे प्रमाण योग्य आहे तर तुमचे शरीर चांगले कार्य करते. तसेच यामुळे तुम्ही शारिरीक आणि मानसिकरित्या अॅक्टिव्ह राहता.


अनेकांना बऱ्याचदा डिहायड्रेशनची समस्या सतावते. यामुळे त्यांना चक्कर येणे, थकवा जाणवणे, उल्टी येणे, डोळ्यासमोर अंधारी येणे या समस्या सतावतात. अशातच तुम्हाला स्वत:ला हायड्रेट ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी काही सवयी आजच लावून घ्या.


तहान लागल्यास लगेचच पाणी प्या. जर तुम्ही तहानेकडे दुर्लक्ष केलं तर ते महागात पडू शकतं.


सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी पिण्याची सवय लावा.


जर तुमचे तोंड सतत सुकत असेल तर तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता आहे. यावेळेस भरपूर पाणी प्या. तोंड सुकत आहे असे वाटल्यास लगेचच पाणी प्या.


दिवसभरात ८ ते १० ग्लास पाण्याचे सेवन करणे गरजेचे असते. मात्र बदलत्या हवामानात जितके पाणी प्याल तितका फायदा होईल.


जेव्हा तुम्ही वर्कआऊट कराल तेव्हा पाणी पिणेही वाढवा. व्यायामादरम्यान शरीरातून पाणी बाहेर टाकले जाते. यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात प्या.

Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी