Viचा नवा रिचार्ज, १६९ रूपयांच्या किंमतीत ९० दिवसांची सर्व्हिस

मुंबई: Vodafone Idea (Vi) चा भारतात मोठा युजरबेस आहे. जिओ आणि एअरटेलनंतर Vodafone Idea (Vi) भारताची तिसऱ्या नंबरची सगळ्यात मोठी प्रायव्हेट टेलिकॉम कंपनी आहे. आता या टेलिकॉम कंपनीने भारतात नवा प्रीपेड प्लान लाँच केला आहे. याची किंमत १६९ रूपये आहे.


Vodafone Idea (Vi) या किफायतशीर प्लानच्या मदतीने युजर्स आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करेल. या प्लानमध्ये इंटरनेट डेटा आणि एंटरटेनमेंटची सुविधा मिळते. हा ADD-ON Data Pack आहे.



Viचा १६९ रूपयांचा रिचार्ज प्लान


Vi चा हा नवा प्रीपेड प्लान आहे. याची किंमत १६९ रूपये आहे. या प्लानमध्ये युजर्सला २८ दिवसांच्या जागी संपूर्ण ३० दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल.



मिळणार इतका डेटा


Viच्या या प्लानमध्ये युजर्सला एकूण ८ जीबी डेटा वापरायला मिळणार आहे. यात युजर्सला कोणतेही डेली लिमिट नाही. याचा वापर ३० दिवसांपर्यंतही केला जाऊ शकतो.


या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला प्रीमियम OTT कंटेटला वापरण्याची संधी मिळेल. युजर्स अगदी सहज या प्लानमध्ये डिस्ने प्लस हॉटस्टारचा वापर ९० दिवसांपर्यंत करू शकतात.


Viच्या या नव्या प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला डेटा आणि एंटरटेनमेंटची सुविधा तर मिळणार मात्र कॉलिंग आणि एसएमएसचा फायदा नाही घेऊ कणार. कॉलिंगचा फायदा घेण्यासाठी युजर्सला १५५ रूपयांचा रिचार्ज करू शकता. याची व्हॅलिडिटी २४ दिवसांची आहे.

Comments
Add Comment

मुंबई झोपडपट्टीमुक्तीसाठी सरकारचे मोठे पाऊल!

मुंबईत ५० एकरपेक्षा मोठ्या भूखंडांवर राबवणार 'क्लस्टर रिडेव्हलपमेंट'; पहिल्या टप्प्यात १७ प्रकल्पांची निवड

कल्याण ते नवी मुंबई विमानतळापर्यंतचा प्रवास जलद होणार

डोंबिवली एमआयडीसी मेट्रो स्टेशनजवळ १०० वा यू - गर्डरची यशस्वीरीत्या उभारणी मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास

मेट्रो सिनेमा भुयारी मार्गात हवा खेळती राहणार

सचिन धानजी मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने बांधण्यात आलेल्या मेट्रो सिनेमा भुयारी मार्गातील हवा खेळती राहावी

मुंबईत चार नव्या पोलीस स्टेशनची निर्मिती होणार

मुंबई : दिवसेंदिवस गुन्हेगारी ही वाढत चालली आहे. या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आता राज्य सरकारने मोठं पाऊल

भिवंडीतील ट्रॅफिकवर कायमस्वरूपी तोडगा; १० एकर जागेवर विशेष व्यवस्था, मंत्री मेघा बोर्डीकर यांची घोषणा

नागपूर : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा मुंबईपर्यंतचा विस्तार आणि ठाणे-भिवंडी परिसरातील

मुंबईतील गोरेगावमध्ये भटक्या कुत्र्यांच्या टोळीने तोडले महिलांच्या गालांचे लचके

मुंबई : भटक्या कुत्र्यांच्या टोळीने महिलांच्या गालांचे लचके तोडल्याची धक्कादायक घटना मुंबईतील गोरेगावमध्ये