Swami Samartha : श्री स्वामी समर्थ बावन्नी, स्वामींचा रंगपंचमी संदेश

  146


  • समर्थ कृपा : विलास खानोलकर


स्वामी वदती भक्तासी
काय हवे ते पुसे मजसी ||१||
भक्त बोले आली होळी
गरिबीतही कशी खावी पोळी ||२||
मुला-बाळांसह कशी करावी
रंगपंचमी कशी स्तवावी ||३||
खिशात नाही पै पैसा
पाहुण्यासी कैसे बोलावे बैसा ||४||
नाही विहिरीला पाणी
नाही नदीला पाणी ||५||
उन्हाळ्याने सुकले तळीपाणी
सुकले मुख सुके गळापाणी ||६||
पाहुनी आकाशी जीवने नकोशी
कडक उन्हाने तापली तक्तपोशी ||७||
पिके सुकली मने सुकली
हात पसरूनी माने झुकली ||८||
चाऱ्याचे दुर्भिष्य सूर्याहाती धनुष्य
वाटे आत्महत्येने संपवावे आयुष्य ||९||
आजोबा नातवंडासाठी ढकलतो आयुष्य
आजी सांभाळी नक्षत्र पुष्प ||१०||
खाटकापाशी चालली गाईवासरे
घराघरात द्रारिद्र्य असे पसरे ||११||
सावकार घिरट्या घाली दारी
काळे कभिन्न पठाण दारोदारी ||१२||
स्वामी वदे आधुनिक भक्तासी
नको काळजी ठेवू उषासी ||१३||
उषःकाल उगवेल उद्याशी
यश येईल तुझ्या पायाशी ||१४||
विश्वास ठेव त्या दत्तात्रयाशी
विश्वास ठेव त्या महादेवाशी ||१५||
विश्वास ठेव ब्रह्माविष्णूशी
विश्वास ठेव हनुमान रायाशी ||१६||
विश्वास ठेवत्या श्रीरामाशी
विश्वास ठेव त्या श्रीकृष्णाशी ||१७||
प्रसन्न अग्निदेवी होलिका
जीवनात फुलेल गुलाब कलिका ||१८||
नका जाळू हिरवी झाडे
वाढली दारोदारी लाडेलाडे ||१९||
दुर्गुणा ते जाळा मारूनी कोडे
नका करू धुरांचे लोंढे ||२०||
कपाळी गुलाल लावूनी करा रंगपंचमी
विषारी रंगाने नका करू रंगपंचमी ||२१||
नका पिऊ नवसागराची दारू
नका शोधू रात्री बेरात्री पारू ||२२||
नका खेळू पत्ते जुगार
बंद करा जन्नामन्ना जुगार ||२३||
बंद करा इंटरनेट जुगार
बंद करा बीटकॉईन जुगार ||२४||
मोबाइलचाही अतिरेक बंद करा
रामरक्षा, ज्ञानेश्वरी हाती धरा ||२५||
मनाचे श्लोक, अभंग, मनीधरा
नामदेव तुकाराम मस्तकी धरा ||२६||
वाईटमार्ग, शिव्याशाप बंद करा
आजी-आजोबांना वरिष्टांना प्रणाम करा ||२७||
आईवडील भावंडांना हृद‌यी धरा
गोरगरिबांना मदत करा ||२८||
नैसर्गिकरीत्या शेती करा
नदिनालीतळी साफ करा ||२९||
विहिरी, गावतळी स्वच्छ करा
कौलारूपाणी सांभाळ करा ||३०||
उंच बिल्डिंग पाणी जपुनी धरा
थेंब थेंबपाणी पुनर्वापर करा ||३१||
नका करू नातलगांशी कट
पुरणपोळी कट करा गट्ट ||३२||
संसारात रोजरोज नको कटकट
संसार सुखाने बिनकटकट ||३३||
राधाश्रीकृष्ण व्हा पट पट
बालगणपती व्हा पटापट ||३४||
ऐका सुदामा बलरामाची वटवट
दहीभात पोहे खा पटपट ||३५||
बालहनुमान व्हा पटपट
बालशिवाजी व्हा झट झट ||३६||
सानेगुरुजीचा व्हा श्याम चट पट
बालपणात शिरा पटापट ||३७||
छळणे, पिळणे विसरा पटापट
आनंदाने नाचा, डोला पटापट ||३८||
खळाखळा हसा पटापट
प्या हळदीदूध पटापट ||३९||
फुटाण्याचा प्रसाद वाटा झटपट
पेढे वाटा पटपट ||४०||
आनंदाचा घ्या तीर्थप्रसाद पटापट
आनंदी आनंद होईल पटापट ||४१||
होईल होळी आनंदी पटपट
रंगपंचमी आनंदी पटपट ||४२||
स्वामी सांगे विलासा मंत्र पटप‌ट
उज्ज्वल आयुष्य भेटेल झटपट ||४३||
रंगुनी रंगात रंग माझा वेगळा
मोरपिसापरी छान तो नव्हाळा ||४४||
इंद्रधनुष्यापरी मी आकाशी वेगळा
सप्तरंगात असूनी मी तो वेगळा ||४५||
ब्रह्माविष्णुमहेशातही मी वेगळा
दत्तात्रयाच्या अत्तराहू‌नी मी वेगळा ||४६||
गावागावात सुंगध माझा वेगळा
औंदुबर, वटसावित्रीचा वड वेगळा ||४७||
मी गुलाबातल्या गुलाबी रंगात
मी सोनचाप पिवळ्या रंगात ||४८||
मी सुंगधी मोगऱ्याच्या सफेद रंगात
मी सुंदर जास्वंदाच्या लाल रंगात ||४९||
मी मेहंदीच्या पानात हिरव्या रंगात
मी कण्हेरीच्या तांबड्या रंगात ||५०||
गंगेच्या पाण्यापरी मी साऱ्या रंगात
सुखदुःखाच्या वेळी मी साऱ्या ढंगात ||५१||
आदी मी अनादी मी अमर मी
आनंदी होळी संदेश देतो स्वामी ||५२||



vilaskhanolkardo@gmail.com

Comments
Add Comment

३ ऑगस्टला ब्रह्म मुहूर्तावर सूर्य आश्लेषा नक्षत्रात करणार प्रवेश, 'या' ५ राशींसाठी येणार आनंदाचे दिवस!

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे राशी आणि नक्षत्रांमधील बदल मानवी जीवनावर मोठा प्रभाव टाकतात. लवकरच सूर्य

खरी मैत्री काय असते ?

मैत्रीचे नाते या जगात सर्वात सुंदर मानले जाते, कारण या नात्यात रंग दिसत नाही, सौंदर्य नाही, पैसा नाही आणि भेदभाव

Vastu Tips: या दिशेला चुकूनही ठेवू नका पैसे, नाहीतर येऊ शकते आर्थिक संकट

मुंबई: वास्तूशास्त्रानुसार, घरात पैसे कोणत्या दिशेला ठेवले जातात, याला खूप महत्त्व आहे. जर पैसे चुकीच्या दिशेला

१ ऑगस्टला सूर्य-बुध युतीमुळे 'बुधादित्य योग'; 'या' राशींचे नशीब फळफळणार!

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या स्थितीतील बदल आणि त्यांच्या युतीचा मानवी जीवनावर मोठा प्रभाव पडतो. १

Vastu Tips: 'या' वस्तू कधीही मोफत घेऊ नका, अन्यथा होईल मोठे आर्थिक नुकसान!

मुंबई: आपल्या दैनंदिन जीवनात अनेकदा आपण काही वस्तू दुसऱ्यांकडून मोफत घेतो किंवा भेट म्हणून स्वीकारतो. पण

वास्तु टिप्स: पत्नीच्या 'या' ५ चांगल्या सवयी पतीला बनवू शकतात भाग्यवान आणि धनवान!

मुंबई : भारतीय संस्कृतीत पत्नीला गृहलक्ष्मी मानले जाते. पतीच्या यशात पत्नीचा मोठा वाटा असतो, असे अनेकदा म्हटले