Reserve Bank of India : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! रविवारीही राहणार बँका सुरु

  70

काय आहे कारण?


नवी दिल्ली : बँकांचे व्यवहार (Transactions of banks) करण्याकरता भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) एक मोठा निर्णय घेतला आहे. मार्च महिन्याचा शेवटचा दिवस आणि रविवार असताना देखील बँका सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे ३१ मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सरकारला सर्व व्यवहारांचा हिशेब ठेवण्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून आरबीआयने (RBI) हा निर्णय घेतला आहे.


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याबाबतचे परिपत्रक जारी केलं आहे. यामध्ये रविवारी बँका सुरु ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. ३१ मार्चला आर्थिक वर्ष (Financial Year) संपणार आहे. त्यामुळे वर्षाच्या शेवटच्या दिवशी बँकांना भरपूर काम असणार आहे. त्यामुळे ३१ मार्चला रात्री उशीरापर्यंत बँकांचे कामकाज चालणार आहे. मात्र, यादिवशी रात्री उशीरापर्यंत बँकांचे सार्वजनिक व्यवहार होणार नाहीत.



१ एप्रिलला बँका राहणार बंद


३१ मार्चला रात्री उशीरापर्यंत कर्मचारी बँकांमध्ये काम करणार आहेत. कारण, संपूर्ण आर्थिक व्यवहार पूर्ण झाल्याशिवाय बँकांचं कामकाज पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे १ एप्रिलच्या दिवशी सोमवारी सर्व बँक कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय देखील आरबीआयने घेतला आहे. याबाबतची माहिती आरबीआयच्या परिपत्रकात देण्यात आली आहे.


Comments
Add Comment

Uttarkashi : उत्तरकाशीत पूर आपत्तीची झळ अधिक तीव्र; पुराच्या तडाख्यात ६० बेपत्ता, मदतकार्यासाठी शर्यत सुरू

उत्तरकाशी : मंगळवारी उत्तराखंडमधील उत्तरकाशीत एक धक्कादायक घटना घडली. उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यात

Eknath Shinde : शिंदेंची दौड पुन्हा दिल्लीत! शाह-मोदी भेटीत शिवसेनेच्या नाराजीचा हिशेब?

नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे आठवड्याभरात दुसऱ्यांदा दिल्लीत दाखल

भारत, विंडीज-आफ्रिकेसोबत कसोटी मालिका खेळणार

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार सामने नवी दिल्ली : भारताने इंग्लंडसोबत पाच कसोटी सामन्यांची मालिका बरोबरीत

नोवाक जोकोविचची ‘सिनसिनाटी ओपन’मधून माघार

नवी दिल्ली : ग्रँडस्लॅम विजेता नोवाक जोकोविचला आगामी यूएस ओपनपूर्वी आणखी एक धक्का बसला आहे. त्याने सिनसिनाटी

Amit Shah: अमित शहांनी लालकृष्ण अडवाणींचा विक्रम मोडला! भूषविले सर्वाधिक काळ गृहमंत्रीपद

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावे एक विक्रम प्रस्थापित झाला आहे. सर्वाधिक काळ देशाचे

DRDO गेस्ट हाऊसच्या मॅनेजरला हेरगिरी प्रकरणात अटक

नवी दिल्ली: ज्योती मल्होत्रानंतर भारतातील गुप्तचर यंत्रणानी आणखी एका हेराला अटक केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर