Reserve Bank of India : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! रविवारीही राहणार बँका सुरु

काय आहे कारण?


नवी दिल्ली : बँकांचे व्यवहार (Transactions of banks) करण्याकरता भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) एक मोठा निर्णय घेतला आहे. मार्च महिन्याचा शेवटचा दिवस आणि रविवार असताना देखील बँका सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे ३१ मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सरकारला सर्व व्यवहारांचा हिशेब ठेवण्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून आरबीआयने (RBI) हा निर्णय घेतला आहे.


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याबाबतचे परिपत्रक जारी केलं आहे. यामध्ये रविवारी बँका सुरु ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. ३१ मार्चला आर्थिक वर्ष (Financial Year) संपणार आहे. त्यामुळे वर्षाच्या शेवटच्या दिवशी बँकांना भरपूर काम असणार आहे. त्यामुळे ३१ मार्चला रात्री उशीरापर्यंत बँकांचे कामकाज चालणार आहे. मात्र, यादिवशी रात्री उशीरापर्यंत बँकांचे सार्वजनिक व्यवहार होणार नाहीत.



१ एप्रिलला बँका राहणार बंद


३१ मार्चला रात्री उशीरापर्यंत कर्मचारी बँकांमध्ये काम करणार आहेत. कारण, संपूर्ण आर्थिक व्यवहार पूर्ण झाल्याशिवाय बँकांचं कामकाज पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे १ एप्रिलच्या दिवशी सोमवारी सर्व बँक कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय देखील आरबीआयने घेतला आहे. याबाबतची माहिती आरबीआयच्या परिपत्रकात देण्यात आली आहे.


Comments
Add Comment

Trending News : कमळाच्या देठातून श्वास घेत 5 तास लपला; सराईत चोरटा अखेर सापडला

लखनऊ : उत्तर प्रदेशातील एका चोरट्याला पकडण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) राबवलेली कारवाई अत्यंत थरारक ठरली.

Amazon Layoffs : ॲमेझॉनमध्ये पुन्हा नोकर कपातीची टांगती तलवार; १४,००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात?

नवी दिल्ली : जागतिक स्तरावर ई-कॉमर्स आणि क्लाउड कॉम्प्युटिंगमध्ये मक्तेदारी निर्माण करणारी कंपनी ॲमेझॉन (Amazon)

Ancient manuscripts : प्राचीन हस्तलिखिते मिळणार आता एका क्लिकवर

'ज्ञानभारतम्' मोहिमेला प्रारंभ; हस्तलिखितांच्या नोंदीसाठी पुणे-नागपूर मुख्य केंद्र मुंबई : भारताच्या प्राचीन

Ahmedabad Toodler Death : डोशाच विषारी पीठ की जाणीवपूर्व केलेला विषप्रयोग ? पोलिसांचा संशय बळावला

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमधील चांदखेडा येथे झालेल्या दुहेरी मृत्यूने सर्वाना धक्का बसला आहे. एकाच

Subansiri News : महागड्या विजेचा फटका: आसाम आणि मेघालयचा सुबनसिरी प्रकल्पातील अतिरिक्त वीज घेण्यास नकार

नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी जलविद्युत योजना असलेल्या २००० मेगावॅट क्षमतेच्या 'लोअर सुबनसिरी' (Subansiri Lower HEP)

Gujrat News : रात्री डोसा खाल्ला अन् होत्याच नव्हतं झालं...हसतेखेळते कुटुंब उद्ध्वस्त!

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमधील चांदखेडा परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका कुटुंबाने