नवी दिल्ली : बँकांचे व्यवहार (Transactions of banks) करण्याकरता भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) एक मोठा निर्णय घेतला आहे. मार्च महिन्याचा शेवटचा दिवस आणि रविवार असताना देखील बँका सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे ३१ मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सरकारला सर्व व्यवहारांचा हिशेब ठेवण्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून आरबीआयने (RBI) हा निर्णय घेतला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याबाबतचे परिपत्रक जारी केलं आहे. यामध्ये रविवारी बँका सुरु ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. ३१ मार्चला आर्थिक वर्ष (Financial Year) संपणार आहे. त्यामुळे वर्षाच्या शेवटच्या दिवशी बँकांना भरपूर काम असणार आहे. त्यामुळे ३१ मार्चला रात्री उशीरापर्यंत बँकांचे कामकाज चालणार आहे. मात्र, यादिवशी रात्री उशीरापर्यंत बँकांचे सार्वजनिक व्यवहार होणार नाहीत.
३१ मार्चला रात्री उशीरापर्यंत कर्मचारी बँकांमध्ये काम करणार आहेत. कारण, संपूर्ण आर्थिक व्यवहार पूर्ण झाल्याशिवाय बँकांचं कामकाज पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे १ एप्रिलच्या दिवशी सोमवारी सर्व बँक कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय देखील आरबीआयने घेतला आहे. याबाबतची माहिती आरबीआयच्या परिपत्रकात देण्यात आली आहे.
उच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती मुंबई : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग…
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर डायरेक्टोरेट ऑफ इर्फोसमेन्ट (ईडी)ने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोनिया गांधी व…
मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी…
दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं…
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…