MNS Mahayuti : महायुतीची मुंबईत महत्त्वाची बैठक; राज ठाकरेही राहिले उपस्थित

  131

जागावाटपासाठी बोलावली बैठक?


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महायुतीच्या (Mahayuti) महत्त्वाच्या नेत्यांसोबत वाढत चाललेल्या भेटीगाठी यांमुळे मनसे (MNS) महायुतीत सामील होण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. राज ठाकरे यांना थेट दिल्ली दरबारी देखील बोलावण्यात आलं होतं. तिथे त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यासोबत चर्चा झाली. त्यानंतर युतीबाबत राज ठाकरेंनी भाष्य केलं नाही. मात्र, आज पुन्हा एकदा राज ठाकरे महायुतीच्या नेत्यांसोबत निदर्शनास आले आहेत. महायुतीची मुंबईत महत्त्वाची बैठक सुरु आहे, ज्यात राज ठाकरेही उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे युतीबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.


महायुतीची हॉटेल ताज लँड्समध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासमवेत राज ठाकरे यांनी देखील हजेरी लावली आहे. राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा सुरु आहे. ही बैठक जागावाटपासाठी बोलावण्यात आली आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.


महायुतीत मनसे सामील झाली तर ठाकरे नाव महायुतीत अधिकृतपणे जोडले जाईल. त्यामुळे आता यापुढे नेमका काय निर्णय घेतला जाणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेचे अधिकारी कंटाळले प्रशासनाच्या कार्यपद्धतीला

रिक्त पदांअभावी अतिरिक्त कामांची जबाबदारी आणि चौकशीचा ससेमिरा मुंबई:मुंबई महापालिकेचा कारभारात आता

दादर स्थानक परिसरात पोलिसांना न जुमानता होतो व्यवसाय

पण गावातील महिलांना दिला जातो त्रास मुंबई :मुंबई महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त विद्यमान सध्या दादरसह इतर

छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ठिकाणांना भेट देण्यासाठी विशेष ट्रेन

भारत गौरव ट्रेन टूरला १०० टक्के बुकिंगसह प्रचंड प्रतिसाद नवी दिल्ली :इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम

ई-शिवनेरी बस सेवेला मुंबईकरांची कायम पसंती

महामंडळाच्या तिजोरीत जवळपास ५० कोटीं महसूल जमा मुंबई : ई-शिवनेरी मुंबईकरांची लाडकी बनली असून एसटीचा आधुनिक

समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या संख्येत वाढ

मुंबई :नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी – आमणे हा शेवटचा टप्पा गुरुवारी सायंकाळी वाहतूक सेवेत दाखल

शालेय बस चालकांची दर आठवड्याला होणार मद्यपान चाचणी

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्य शासनाचा निर्णय मुंबई : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय बस