MNS Mahayuti : महायुतीची मुंबईत महत्त्वाची बैठक; राज ठाकरेही राहिले उपस्थित

जागावाटपासाठी बोलावली बैठक?


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महायुतीच्या (Mahayuti) महत्त्वाच्या नेत्यांसोबत वाढत चाललेल्या भेटीगाठी यांमुळे मनसे (MNS) महायुतीत सामील होण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. राज ठाकरे यांना थेट दिल्ली दरबारी देखील बोलावण्यात आलं होतं. तिथे त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यासोबत चर्चा झाली. त्यानंतर युतीबाबत राज ठाकरेंनी भाष्य केलं नाही. मात्र, आज पुन्हा एकदा राज ठाकरे महायुतीच्या नेत्यांसोबत निदर्शनास आले आहेत. महायुतीची मुंबईत महत्त्वाची बैठक सुरु आहे, ज्यात राज ठाकरेही उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे युतीबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.


महायुतीची हॉटेल ताज लँड्समध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासमवेत राज ठाकरे यांनी देखील हजेरी लावली आहे. राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा सुरु आहे. ही बैठक जागावाटपासाठी बोलावण्यात आली आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.


महायुतीत मनसे सामील झाली तर ठाकरे नाव महायुतीत अधिकृतपणे जोडले जाईल. त्यामुळे आता यापुढे नेमका काय निर्णय घेतला जाणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

नेव्ही नगरमध्ये सुरक्षारक्षकाच्या हातावर तुरी देत अज्ञात व्यक्ती रायफल व काडतुसे घेऊन फरार !

मुंबई : मुंबईतील कुलाबा येथील नौदलाच्या प्रवेशबंदी असलेल्या ठिकाणी शनिवारी संध्याकाळी एक मोठी घटना घडली.

घरबसल्या मिळणार रस्‍ते सिमेंट काँक्रिटीकरण कामांची सविस्तर माहिती

नागरिकांसाठी https://roads.mcgm.gov.in/publicdashboard/ या विशेष लिंकवर रस्‍ते कामांची माहिती उपलब्‍ध मुंबई : ‘खड्डेमुक्त मुंबई’ या

‘नमो शेतकरी योजने’चा सातवा हप्ता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित

मुंबई : "शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान किसान योजने’चा सातवा

व्हॉट्सअ‍ॅप वेब बिघडला! – स्क्रोल न झाल्याने वापरकर्ते हैराण

मुंबई : सोशल मीडिया वापरकर्त्यांनी व्हॉट्सअ‍ॅप वेब पेजच्या एका नवीन समस्येची तक्रार केली आहे , जिथे ते त्यांच्या

गणेशोत्सवानंतर पावसाची विश्रांती, पण या दिवसापासून जोर वाढणार

मुंबई : गणेशोत्सवानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. पण ही विश्रांती काही दिवसांपुरतीच मर्यादीत आहे. पावसाचा जोर

Lalbaugcha Raja Visarjan 2025 : लालबागचा राजा मंडळाची पहिली मोठी अ‍ॅक्शन; कोळी बांधवाला थेट कोर्टात खेचणार, नेमकं प्रकरण काय?

मुंबई : दरवर्षीप्रमाणे या वर्षीही लालबागचा राजा गणेशोत्सव संपल्यानंतर गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आला.