MNS Mahayuti : महायुतीची मुंबईत महत्त्वाची बैठक; राज ठाकरेही राहिले उपस्थित

जागावाटपासाठी बोलावली बैठक?


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महायुतीच्या (Mahayuti) महत्त्वाच्या नेत्यांसोबत वाढत चाललेल्या भेटीगाठी यांमुळे मनसे (MNS) महायुतीत सामील होण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. राज ठाकरे यांना थेट दिल्ली दरबारी देखील बोलावण्यात आलं होतं. तिथे त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यासोबत चर्चा झाली. त्यानंतर युतीबाबत राज ठाकरेंनी भाष्य केलं नाही. मात्र, आज पुन्हा एकदा राज ठाकरे महायुतीच्या नेत्यांसोबत निदर्शनास आले आहेत. महायुतीची मुंबईत महत्त्वाची बैठक सुरु आहे, ज्यात राज ठाकरेही उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे युतीबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.


महायुतीची हॉटेल ताज लँड्समध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासमवेत राज ठाकरे यांनी देखील हजेरी लावली आहे. राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा सुरु आहे. ही बैठक जागावाटपासाठी बोलावण्यात आली आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.


महायुतीत मनसे सामील झाली तर ठाकरे नाव महायुतीत अधिकृतपणे जोडले जाईल. त्यामुळे आता यापुढे नेमका काय निर्णय घेतला जाणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

मार्चच्या 'या' तारखेपासून बेस्ट बससेवेत बदल; काही मार्गांमध्ये फेरबदल तर काही ठिकाणी एसी सेवा

मुंबई : मुंबईकरांची सेवा करणारी बेस्ट बसच्या मार्गात आणि तिच्या फेऱ्यांमध्ये मुंबईकरांच्या सोयीनुसार परिवहन

1 March Rules Change : १ मार्चपासून बदलणार तुमच्या आयुष्याशी संबंधित 'हे' नियम; रेल्वे तिकीट बुकिंग पासून ते LPG सुद्धा...

येत्या १ मार्चपासून सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत.

दोन वर्षांत दादर-पुणे हिरकणी बसच्या ७८ टक्के फेऱ्यांमध्ये घट…

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या दादर – पुणे मार्गावरील हिरकणी बसच्या फेऱ्यांमध्ये कमालीची घसरण झाली आहे. दोन

मुंबईत ७०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ?

उबाठाच्या प्रस्तावाला सत्ताधारी भाजप- शिवसेनेची मंजुरी मुंबई : मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना

होळीसाठी मुंबई-रत्नागिरी दरम्यान ६ अतिरिक्त गाड्या

'दिवा-चिपळूण' गाडीच्या तारखेत बदल पनवेल-रत्नागिरी मार्गावर मेमू स्पेशल धावणार मुंबई : येत्या होळी सणानिमित्त

राज्य शासनाकडे पालिकेची ११ हजार कोटींची थकबाकी

वसुलीसाठी नेमलेली समिती कागदावरच? मुंबई : मुंबईतील राज्य शासनाच्या अखत्यारितील विविध कार्यालयांकडून सहाय्यक