MNS Mahayuti : महायुतीची मुंबईत महत्त्वाची बैठक; राज ठाकरेही राहिले उपस्थित

जागावाटपासाठी बोलावली बैठक?


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महायुतीच्या (Mahayuti) महत्त्वाच्या नेत्यांसोबत वाढत चाललेल्या भेटीगाठी यांमुळे मनसे (MNS) महायुतीत सामील होण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. राज ठाकरे यांना थेट दिल्ली दरबारी देखील बोलावण्यात आलं होतं. तिथे त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यासोबत चर्चा झाली. त्यानंतर युतीबाबत राज ठाकरेंनी भाष्य केलं नाही. मात्र, आज पुन्हा एकदा राज ठाकरे महायुतीच्या नेत्यांसोबत निदर्शनास आले आहेत. महायुतीची मुंबईत महत्त्वाची बैठक सुरु आहे, ज्यात राज ठाकरेही उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे युतीबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.


महायुतीची हॉटेल ताज लँड्समध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासमवेत राज ठाकरे यांनी देखील हजेरी लावली आहे. राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा सुरु आहे. ही बैठक जागावाटपासाठी बोलावण्यात आली आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.


महायुतीत मनसे सामील झाली तर ठाकरे नाव महायुतीत अधिकृतपणे जोडले जाईल. त्यामुळे आता यापुढे नेमका काय निर्णय घेतला जाणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

राज्यातील पूरपरिस्थितीमुळे १० टक्के एसटी भाडेवाढीचा निर्णय रद्द

मुंबई : राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने केलेली १० टक्के दरवाढ रद्द

नगरपरिषद, नगरपंचायतींच्या प्रारूप मतदार यादीची 8 ऑक्टोबरला प्रसिद्धी

मुंबई : राज्यातील 247 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या व थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची

UPI UPDATE : UPI वरून 'Collect Request' बंद ,जाणून घ्या नवीन नियम !

मुंबई : UPI वापरकर्त्यांसाठी एका महत्वाची बातमी आहे. जर तुम्ही Google Pay, PhonePe, Paytm किंवा इतर कोणतेही UPI ॲप वापरत असाल, तर हे

'ठाकरे ब्रँड'ची भीती की नवी खेळी? शिंदे गटाचा ६० सेकंदाचा टीझर काय सांगतोय?

मुंबई: दसऱ्याचं वातावरण असलं तरी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सभांचा आणि टीझर्सचा धडाका सुरू आहे.

शेतकऱ्यांची सेवा हाच दसरा मेळावा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिवसेना यंदा दसऱ्यानिमित्त बांधणार पूरग्रस्तांच्या मदतीचे तोरण मेळावा घेऊन परंपरा अबाधित ठेवणार, मदत देऊन

मागील दोन वर्षापेक्षा धरण क्षेत्रात कमी साठा, पण वर्षभराची तहान भागणार....

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी जो पाणीसाठा आवश्यक असतो, तो साठा १ऑक्टोबर रोजी