अन्यथा राष्ट्रवादीदेखील महायुतीचा धर्म तोडणार

राष्ट्रवादीचे प्रवक्ते पराजपेंचा शिवसेनेला इशारा


ठाणे : लोकसभा मतदार संघात जर महायुतीचा धर्म तोडत राहिले तर शिवसेना ज्या मतदार संघात लढणार आहे, तिथे राष्ट्रवादी महायुतीचा धर्म तोडू शकतात, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी शिवसेना शिंदे गटाला दिला आहे.


गेल्या काही दिवसांपासून बारामतील लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात टीका सुरू केल्या आहेत. मतदार संघात लोकसभा लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, आता यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दोन दिवसापूर्वी विजय शिवतारे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठकही झाली होती, यानंतरही शिवतारे यांनी निवडणूक लढणार, असेच जाहीर केले आहे.


दरम्यान, बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेला इशारा दिला. आनंद परांजपे म्हणाले पुढे म्हणाले की, आम्हाला कोणत्याही प्रकार महायुतीचे वातावरण गढूळ होईल, असे वक्तव्य करायचे नाही. सातत्याने विजय शिवतारे वक्तव्य करत आहेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्यांचेच नेते ऐकत नाहीत, असा मेसेज जात आहे. शिवसेनेच्या विजय शिवतारे यांच्याकडून सातत्याने बारामती लोकसभा मतदार संघाचे वातावरण खराब करण्याचे काम सुरू आहे, असेही आनंद परांजपे म्हणाले.


संग्राम थोपटे हे काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले आहेत. काँग्रेसच्या कोट्यातून त्यांना मंत्रिपद का मिळाले नाही हा प्रश्न त्यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारायला पाहिजे, असेही परांजपे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस बारामती लोकसभेत प्रचार करत आहे. भाजपच्या चंद्रकांतदादा पाटील यांनीही काही दिवसापूर्वी बैठक घेतली. आता महायुतीतील फक्त विजय शिवतारे विरोधात वक्तव्य करत आहेत, असेही आनंद परांजपे म्हणाले.

Comments
Add Comment

पूरग्रस्त पंजाबमध्ये ‘रिलायन्स’ची दहा सूत्री मदतयोजना

मुंबई : पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी रिलायन्सने येथे व्यापक दहा सूत्री मदतयोजना सुरू केली आहे. अमृतसर आणि

मागील २-३ वर्षांत मराठा समाजाला जास्त निधी मिळाला

ओबीसी उपसमितीच्या बैठकीत भुजबळ आक्रमक मुंबई : ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी

देशात तब्बल इतक्या टक्के लोकांचे लग्नच झालेले नाही, आकडेवारी वाचून व्हाल हैराण

नवी दिल्ली : भारतात एकूण लोकसंख्येपैकी ५०.५% लोक अविवाहित असून बहुतांश राज्यांत मुलींचे लग्न १८ वर्षांनंतरच होत

वसई स्काय वॉकचा काही भाग कोसळला

वसई : वसई - विरार महानगरपालिका हद्दीत सध्या धोकादायक बांधकामे,उद्यान, नाल्यावरील स्लॅब कोसळण्याचा घटना सतत घडत

Health: दही कधी खावे? वजन घटवण्यासाठी योग्य वेळ कोणती?

मुंबई : वजन घटवण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी दही एक उत्तम पर्याय आहे. पण अनेकदा प्रश्न पडतो की दही दिवसा खाणे

सागरी मंडळाच्या प्रकल्पांना विविध परवानगी मिळवण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करा

मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या सर्वसंबंधितांना सूचना मुंबई : महाराष्ट्र सागरी महामंडळाच्या